शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

दुसऱ्या दिवशीही बाजारपेठांत शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:16 IST

परभणी : जिल्ह्यातील नागरी भागातील बाजारपेठा रविवारी दुसऱ्या दिवशीही कडेकोट बंद ठेवण्यात आल्याने कोट्यवधी रुपयांचा व्यवहार ठप्प झाला. एकीकडे ...

परभणी : जिल्ह्यातील नागरी भागातील बाजारपेठा रविवारी दुसऱ्या दिवशीही कडेकोट बंद ठेवण्यात आल्याने कोट्यवधी रुपयांचा व्यवहार ठप्प झाला. एकीकडे बाजारपेठा बंद असताना दुसरीकडे रस्त्यावर मात्र वाहनधारकांची वर्दळ सुरूच असल्याचे पाहावयास मिळाले.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी नागरी भागात शनिवार आणि रविवार असे दोन दिवस संचारबंदी लागू केली होती. शनिवारी पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील नागरी भागातील बाजारपेठा कडकडीत बंद ठेवत व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. रविवारी बहुतांश नागरी भागात बाजारपेठ बंदच असते. मात्र, मागील काही महिन्यांपासून रविवारी बाजारपेठ बंद ठेवण्याची पद्धत बंद झाली आहे. त्यामुळे रविवारीही मोठी आर्थिक उलाढाल होते. १४ मार्च रोजी मात्र संचारबंदी लागू असल्याने व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठाने बंद ठेवली. सराफा बाजार, किराणा बाजार, कापड लाइन, भुसार मार्केट यासह सर्वच व्यापारी प्रतिष्ठाने बंद राहिली. त्यामुळे शहरातील गुजरी बाजार, शिवाजी चौक, कच्छी बाजार, नानलपेठ या नेहमी गजबज असलेल्या भागात शुकशुकाट निर्माण झाला होता.

कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. मात्र, नागरिक त्यास गांभीर्याने घेत नसल्याचे रविवारीही दिसून आले. शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांची वर्दळ सुरूच होती. या वाहनधारकांना कोणीही अडविले नाही. त्यामुळे सायंकाळपर्यंत रस्त्यांवर नागरिकांचा बिनधास्त वावर सुरू असल्याचे पाहावयास मिळाले.

दुपारच्या सुमारास रस्त्यांवर शुकशुकाट

जिल्ह्यात नागरी भागात संचारबंदी असताना दुपारी १ वाजेपर्यंत बहुतांश नागरिक घराबाहेर पडल्याचे पाहावयास मिळाले. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात ऊन वाढले आहे. त्यामुळे उन्हाचा परिणाम शहरातील वाहतुकीवर होत असल्याचे दिसत आहे. रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने, दुपारच्या सुमारास कडक ऊन पडल्याने रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रमुख रस्ते सुनसान झाल्याचे पाहायवास मिळाले.

२०० कोटींची उलाढाल ठप्प

बाजारपेठ बंद राहिल्याने शनिवार आणि रविवार या दोन दिवसांतील जिल्ह्यातील सुमारे २०० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. जिल्ह्यातील किराणा, कापड, सराफा बाजारपेठेत दररोज सुमारे १०० कोटी रुपयांपर्यंत उलाढाल होेते. त्यात अनेक किरकोळ व्यापाऱ्यांच्या व्यवसायाचाही समावेश आहे. मात्र, दोन्ही दिवस नागरी भागातील बाजारपेठ बंद राहिल्याने, साधारणत: २०० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.