शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
5
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
6
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
7
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
8
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
9
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
10
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
11
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
12
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
13
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
14
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
15
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
16
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
17
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
18
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
19
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
20
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप

दहावीच्या निकालास उशीर झाल्यास शाळाच जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:14 IST

परभणी : यावर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे दहावीच्या परीक्षा झाल्या नसल्या, तरी निकाल द्यावयाचा आहे. हा निकाल देताना शिक्षकांसमोर अडचणी येत ...

परभणी : यावर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे दहावीच्या परीक्षा झाल्या नसल्या, तरी निकाल द्यावयाचा आहे. हा निकाल देताना शिक्षकांसमोर अडचणी येत आहेत. निकाल वेळेत न दिल्यास शाळाच जबाबदार राहणार असल्याने शाळा अन्‌ शिक्षकांवर निकाल वेळेत दाखल करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे दहावीच्या परीक्षा झाल्या नाहीत. मात्र या विद्यार्थ्यांचा निकाल देणे बंधनकारक आहे. निकाल देण्यासाठी ठराविक मूल्यमापन पद्धती निश्चित करून देण्यात आली आहे. मात्र विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना शिक्षकांचा मोठा वेळ जात आहे. विद्यार्थ्यांचा निकाल शिक्षण मंडळाकडे दाखल करण्यासाठी दिलेला अवधी संपत आला असून, अनेक शाळांनी अद्याप शिक्षण विभागाकडे निकाल दाखल केला नाही. त्यामुळे निकाल वेळेत जमा करण्यासाठी शाळाच जबाबदार राहणार असून, या प्रक्रियेला गती द्यावी लागणार आहे.

दहावी परीक्षेचा निकाल देताना नववीच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांचे ५० टक्के गुण तसेच दहावीची उपस्थिती, गृहपाठ, विविध उपक्रमांचे मूल्यमापन करून गुणदान करावयाचे आहे.

हे गुणदान करताना सरासरी १०० च्या पटीत काढावयाची आहे. यात शिक्षकांचा मोठा वेळ जात आहे.

ही सर्व प्रक्रिया करताना शिक्षकांसमोर अडचणी निर्माण होत असून, निकाल देण्यासाठी विलंब लागत आहे.