शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सरपंच पती बनले स्वच्छतादूत; घंटागाडी स्वतः चालवत घाण अन् कचरा टाकतात वेशीबाहेर

By मारोती जुंबडे | Updated: August 18, 2023 14:13 IST

सरपंच दिक्षा पैठणे, नवनाथ पैठणे व त्यांचे सहकारी यांनी स्वतः पुढाकार घेऊन स्वच्छता फेरी काढण्याचा संकल्प केला आणि मागील अडीच वर्षापासून तो अविरतपणे सुरू ठेवला आहे.

परभणी: शहरापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या धर्मापुरी गावात मागील दोन ते अडीच वर्षांपासून सरपंचपती हे दररोज गावात स्वच्छता फेरीच्या माध्यमातून कचरा संकलनाचे महत्त्वाचं काम प्रामाणिकपणे पार पडत आहेत. त्यामुळे गावात स्वच्छता राखली जात असून रस्तेही चकाचक दिसून येत आहेत.

धर्मापुरी हे गाव शहरालगत असल्यामुळे स्वच्छतेसाठी मजुरांची वाणवा आहे. स्वच्छता कामासाठी ग्रामपंचायतीला इतर उत्पन्नाचे साधने नसल्यामुळे पुरेसा निधी उपलब्ध नाही. जवळपास ५ हजार लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये मोकळ्या जागांची कमतरता निर्माण झालेली आहे. कचरा व्यवस्थापनाचा जुना प्रकार म्हणजे उकिरडे जवळपास नामशेष झालेले आहेत. त्यामुळे स्वच्छतेची जबाबदारी पार पडताना मोठी अडचण निर्माण झाली. यातून मार्ग काढण्यासाठी गावचे सरपंच दिक्षा पैठणे, नवनाथ पैठणे व त्यांचे सहकारी यांनी स्वतः पुढाकार घेऊन स्वच्छता फेरी काढण्याचा संकल्प केला आणि मागील अडीच वर्षापासून तो अविरतपणे सुरू ठेवला आहे. 

सकाळी लवकर उठून दररोज कचरा संकलनाचे काम सुरू होतं. साधारणतः एक- दोन तास गावात घरोघरी जाऊन कचरा संकलन करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे काम होत आहे. त्यामुळे गावामध्ये स्वच्छता राहण्यास मदत होत आहे. गावकरी देखील या उपक्रमास चांगले सहकार्य करीत आहेत. आपल्या घरातील कचरा इतरत्र न फेकता आप-आपल्या कचरा पेटी मध्ये गावकरी नियमितपणे जमा कचरा जमा करतात. त्यानंतर या कचरा पेटीतील कचरा उचलून सकाळी सरपंच पती हे कचरा गाडीत टाकतात. गाव शहरालगत असल्यामुळे स्वच्छता कामगारांची उपलब्धता सहजा सहजी होत नाही. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी बारावी शिकलेल्या सरपंच पती नवनाथ पैठणे यांनी स्वतःच कचरा गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आणि तो अमलात देखील आणला. त्यांच्या या उपक्रमाचं गावकऱ्यांबरोबरच पंचक्रोशीतील गावांमधून कौतुक होत आहे.

माझे गाव माझी जबाबदारीगावकऱ्यांनी निवडणुकीच्या माध्यमातून युवा पदाधिकाऱ्यांवर गावाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे गावाच्या विकास कामाबरोबरच स्वच्छतेची जबाबदारी देखील ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्याची असल्यामुळे हे आमचे कर्तव्य असल्यामुळे माझे गाव माझी जबाबदारी अशी भावना ठेवून मी हे स्वच्छतेचे काम करीत आहे. तसेच या कामासाठी गावकऱ्यांबरोबरच उपसरपंच तानाजी कदम, सोसायटीचे चेअरमन,सदस्य, मित्रमंडळी ज्येष्ठ नागरिक आजी, माजी पदाधिकारी देखील चांगल्या प्रकारे सहकार्य करीत असल्याचे दिसून आले. ग्रामस्वच्छतेची चळवळ प्रामाणिकपणे राबविणाऱ्या या पदाधिकाऱ्यांचा आदर्श अन्य गावाने देखील घ्यावा, असे मत सरपंच दिक्षा पैठणे यांनी व्यक्त केले.

स्वच्छ धर्मापुरी सुंदर धर्मापुरीसाठी प्रयत्न‘‘लोकसंख्येच्या तुलनेत गावासाठी म्हणावा तेवढा निधी मिळत नाही, अशा परिस्थितीत देखील ग्राम विकासासाठी पदाधिकारी प्रयत्नशील आहेत .गावामध्ये पाच रुपयात शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध आहे. बहुतांश रस्ते मजबुतीकरण, भूमिगत नाल्यांची कामे झालेले आहेत. अजूनही स्वच्छ धर्मापुरी सुंदर धर्मापुरी करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. हा निधी मिळाला तर आमचं गाव आमची शाळा , निश्चितपणे अधिक स्वच्छ अधिक सुंदर व्हावी, यासाठी आगामी काळात आमचा प्रयत्न राहील.- नवनाथ पैठणे, सरपंच पती

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नparabhaniपरभणीgram panchayatग्राम पंचायत