शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

परभणी पाणीपुरवठा करताना सेलू नगरपालिकेची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 23:34 IST

निम्न दुधना प्रकल्पाची पाणी पातळी झपाट्याने कमी झाल्याने सेलू शहराला पाणीपुरवठा करताना नगरपालिकेला चांगलीच कसरत करावी लागत आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे विजेचा वारंवार अडथळा निर्माण होत असल्याने नियोजन कोलमडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): निम्न दुधना प्रकल्पाची पाणी पातळी झपाट्याने कमी झाल्याने सेलू शहराला पाणीपुरवठा करताना नगरपालिकेला चांगलीच कसरत करावी लागत आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे विजेचा वारंवार अडथळा निर्माण होत असल्याने नियोजन कोलमडले आहे.दिवसेंदिवस शहराचा चारही बाजूने विस्तार होत असून लोकसंख्या ५० हजार झाली आहे. शहरात नगरपालिकेने जवळपास ४ हजार नागरिकांना नळजोडणी दिली आहे. यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने जमिनीतील पाणी पातळी खालावली आहे.निम्न दुधना प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरला नाही. परिणामी शहरातील नागरिकांना नगरपालिकेच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. शहराला दोन महिन्यांपासून दुधना प्रकल्पाच्या मृत साठ्यातून शहराला पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यातच नदी काठावरील अनेक गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने तसेच परभणी व पूर्णा शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी १ जून रोजी प्रकल्पाच्या मृत साठ्यातून १५ दलघमी पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. सद्यस्थितीत सेलू शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ४ दिवसापांसून वादळी वाºयासह पाऊस पडत असल्याने वीजपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.जलकुंभ भरण्यासाठी नगरपालिकेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे काही भागात २ दिवसआड सोडण्यात येणारे पाणी ३ दिवसाआड सोडण्यात येत आहे. मृतसाठ्यातून पाणी सोडल्याने दुधना प्रकल्पातील बॅकवॉटर परिसरातील १ कि.मी. अंतरावरील जमीन उघडी पडली आहे. दरम्यान, पाणीपुरवठा करताना नगरपालिका प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे.एकच विहीर पाण्याखाली : १४ विहिरी पडल्या उघड्या४शहराला निम्न दुधना प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येतो. वाढीव पाणीपुरवठा योजनेचे पंपहाऊस प्रकल्पाजवळील देवला या गावालगत आहे. पंपहाऊसपर्यंत पाणी आणण्यासाठी प्रकल्पात १५ इंटेकवेल घेण्यात आल्या आहेत. प्रकल्पातून पाणी सोडल्यानंतर १४ इंटेकवेल कोरड्या पडल्या आहेत. सद्यस्थितीत केवळ एकच विहीर पाण्यात आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करताना अडचणी निर्माण होत आहेत.४शहराला पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी देवला येथील शेतकऱ्यांनी स्वत:हून विद्युत मोटारी काढून घेतल्या आहेत. प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाला असला तरी शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. शहराला पाणी कमी पडू दिले जाणार नाही, असे नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.साडे तीन एमएलडी लागते पाणी४शहराला दररोज तब्बल साडेतीन एमएलडी पाणी लागते. नगरपालिकेकडून ६ झोन करून परिसरानुसार २ दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. मात्र विजेचा वारंवार अडथळा निर्माण होतो. त्यामुळे जलकुंभ भरताना वेळ लागत आहे. परिणामी २ ऐवजी काही भागात ३ दिवसाआड पाणी येत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईMuncipal Corporationनगर पालिका