शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

परभणी पाणीपुरवठा करताना सेलू नगरपालिकेची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 23:34 IST

निम्न दुधना प्रकल्पाची पाणी पातळी झपाट्याने कमी झाल्याने सेलू शहराला पाणीपुरवठा करताना नगरपालिकेला चांगलीच कसरत करावी लागत आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे विजेचा वारंवार अडथळा निर्माण होत असल्याने नियोजन कोलमडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): निम्न दुधना प्रकल्पाची पाणी पातळी झपाट्याने कमी झाल्याने सेलू शहराला पाणीपुरवठा करताना नगरपालिकेला चांगलीच कसरत करावी लागत आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे विजेचा वारंवार अडथळा निर्माण होत असल्याने नियोजन कोलमडले आहे.दिवसेंदिवस शहराचा चारही बाजूने विस्तार होत असून लोकसंख्या ५० हजार झाली आहे. शहरात नगरपालिकेने जवळपास ४ हजार नागरिकांना नळजोडणी दिली आहे. यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने जमिनीतील पाणी पातळी खालावली आहे.निम्न दुधना प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरला नाही. परिणामी शहरातील नागरिकांना नगरपालिकेच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. शहराला दोन महिन्यांपासून दुधना प्रकल्पाच्या मृत साठ्यातून शहराला पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यातच नदी काठावरील अनेक गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने तसेच परभणी व पूर्णा शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी १ जून रोजी प्रकल्पाच्या मृत साठ्यातून १५ दलघमी पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. सद्यस्थितीत सेलू शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ४ दिवसापांसून वादळी वाºयासह पाऊस पडत असल्याने वीजपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.जलकुंभ भरण्यासाठी नगरपालिकेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे काही भागात २ दिवसआड सोडण्यात येणारे पाणी ३ दिवसाआड सोडण्यात येत आहे. मृतसाठ्यातून पाणी सोडल्याने दुधना प्रकल्पातील बॅकवॉटर परिसरातील १ कि.मी. अंतरावरील जमीन उघडी पडली आहे. दरम्यान, पाणीपुरवठा करताना नगरपालिका प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे.एकच विहीर पाण्याखाली : १४ विहिरी पडल्या उघड्या४शहराला निम्न दुधना प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येतो. वाढीव पाणीपुरवठा योजनेचे पंपहाऊस प्रकल्पाजवळील देवला या गावालगत आहे. पंपहाऊसपर्यंत पाणी आणण्यासाठी प्रकल्पात १५ इंटेकवेल घेण्यात आल्या आहेत. प्रकल्पातून पाणी सोडल्यानंतर १४ इंटेकवेल कोरड्या पडल्या आहेत. सद्यस्थितीत केवळ एकच विहीर पाण्यात आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करताना अडचणी निर्माण होत आहेत.४शहराला पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी देवला येथील शेतकऱ्यांनी स्वत:हून विद्युत मोटारी काढून घेतल्या आहेत. प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाला असला तरी शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. शहराला पाणी कमी पडू दिले जाणार नाही, असे नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.साडे तीन एमएलडी लागते पाणी४शहराला दररोज तब्बल साडेतीन एमएलडी पाणी लागते. नगरपालिकेकडून ६ झोन करून परिसरानुसार २ दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. मात्र विजेचा वारंवार अडथळा निर्माण होतो. त्यामुळे जलकुंभ भरताना वेळ लागत आहे. परिणामी २ ऐवजी काही भागात ३ दिवसाआड पाणी येत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईMuncipal Corporationनगर पालिका