शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

परभणी पाणीपुरवठा करताना सेलू नगरपालिकेची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 23:34 IST

निम्न दुधना प्रकल्पाची पाणी पातळी झपाट्याने कमी झाल्याने सेलू शहराला पाणीपुरवठा करताना नगरपालिकेला चांगलीच कसरत करावी लागत आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे विजेचा वारंवार अडथळा निर्माण होत असल्याने नियोजन कोलमडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): निम्न दुधना प्रकल्पाची पाणी पातळी झपाट्याने कमी झाल्याने सेलू शहराला पाणीपुरवठा करताना नगरपालिकेला चांगलीच कसरत करावी लागत आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे विजेचा वारंवार अडथळा निर्माण होत असल्याने नियोजन कोलमडले आहे.दिवसेंदिवस शहराचा चारही बाजूने विस्तार होत असून लोकसंख्या ५० हजार झाली आहे. शहरात नगरपालिकेने जवळपास ४ हजार नागरिकांना नळजोडणी दिली आहे. यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने जमिनीतील पाणी पातळी खालावली आहे.निम्न दुधना प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरला नाही. परिणामी शहरातील नागरिकांना नगरपालिकेच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. शहराला दोन महिन्यांपासून दुधना प्रकल्पाच्या मृत साठ्यातून शहराला पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यातच नदी काठावरील अनेक गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने तसेच परभणी व पूर्णा शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी १ जून रोजी प्रकल्पाच्या मृत साठ्यातून १५ दलघमी पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. सद्यस्थितीत सेलू शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ४ दिवसापांसून वादळी वाºयासह पाऊस पडत असल्याने वीजपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.जलकुंभ भरण्यासाठी नगरपालिकेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे काही भागात २ दिवसआड सोडण्यात येणारे पाणी ३ दिवसाआड सोडण्यात येत आहे. मृतसाठ्यातून पाणी सोडल्याने दुधना प्रकल्पातील बॅकवॉटर परिसरातील १ कि.मी. अंतरावरील जमीन उघडी पडली आहे. दरम्यान, पाणीपुरवठा करताना नगरपालिका प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे.एकच विहीर पाण्याखाली : १४ विहिरी पडल्या उघड्या४शहराला निम्न दुधना प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येतो. वाढीव पाणीपुरवठा योजनेचे पंपहाऊस प्रकल्पाजवळील देवला या गावालगत आहे. पंपहाऊसपर्यंत पाणी आणण्यासाठी प्रकल्पात १५ इंटेकवेल घेण्यात आल्या आहेत. प्रकल्पातून पाणी सोडल्यानंतर १४ इंटेकवेल कोरड्या पडल्या आहेत. सद्यस्थितीत केवळ एकच विहीर पाण्यात आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करताना अडचणी निर्माण होत आहेत.४शहराला पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी देवला येथील शेतकऱ्यांनी स्वत:हून विद्युत मोटारी काढून घेतल्या आहेत. प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाला असला तरी शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. शहराला पाणी कमी पडू दिले जाणार नाही, असे नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.साडे तीन एमएलडी लागते पाणी४शहराला दररोज तब्बल साडेतीन एमएलडी पाणी लागते. नगरपालिकेकडून ६ झोन करून परिसरानुसार २ दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. मात्र विजेचा वारंवार अडथळा निर्माण होतो. त्यामुळे जलकुंभ भरताना वेळ लागत आहे. परिणामी २ ऐवजी काही भागात ३ दिवसाआड पाणी येत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईMuncipal Corporationनगर पालिका