रस्ते अर्धवट; वाहनधारक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:17 IST2021-03-08T04:17:23+5:302021-03-08T04:17:23+5:30
डेन्स पार्क संकल्पना पर्यावरणास पूरक परभणी : येथील वन विभागाच्या वतीने वृक्षलागवडीसाठी अनेक योजना राबविल्या जातात. आतापर्यंत कोट्यवधी वृक्षे ...

रस्ते अर्धवट; वाहनधारक त्रस्त
डेन्स पार्क संकल्पना पर्यावरणास पूरक
परभणी : येथील वन विभागाच्या वतीने वृक्षलागवडीसाठी अनेक योजना राबविल्या जातात. आतापर्यंत कोट्यवधी वृक्षे लावण्यात आली. मात्र, पाण्याअभावी ती जागेवरच जळून गेली. दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाने डेन्स पार्क ही संकल्पना अमलात आणली. सद्य:स्थितीत ही संकल्पना पर्यावरणास पूरक ठरताना दिसून येत आहे.
शिस्त लावण्याऐवजी दंडावरच भर
परभणी : येथील शहर वाहतूक शाखेच्या वतीने वाहनधारकांना शिस्त लावण्याऐवजी नियम मोडला म्हणून दंडच आकारण्यात येत आहे. त्यामुळे एकीकडे सिग्नल यंत्रणा धूळ खात पडून असताना दुसरीकडे शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी वाहनधारकांना शिस्त लावणे गरजेचे आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही.
हादगाव ते वाकडी रस्त्याची दुरवस्था
सेलू : तालुक्यातील हादगाव पावडे ते ब्रह्मवाकडी या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या दुरुस्तीबाबत ग्रामस्थांनी बांधकाम विभागाकडे अनेक वेळा पाठपुरावा केला आहे.
ग्रामीण भागात आठवडी बाजार फुल
परभणी : दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागातील आठवडी बाजार बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. मात्र, अनेक ठिकाणी बाजार भरविला जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या आदेशाला खो दिला जात आहे.
मजूर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त
परभणी : यावर्षीच्या रबी हंगामात शेतकऱ्यांनी जवळपास १ लाख २० हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी केली आहे. सध्या हे पीक काढणीस आले आहे. मात्र, ग्रामीण भागात या पिकाच्या काढणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठी पायपीट करावी लागत आहे. मजुरी वाढूनही मजूर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत.
डिग्रस ते मांडवा रस्त्याची दुरवस्था
परभणी : तालुक्यातील डिग्रस पाटी ते मांडवा या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत असताना बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.