शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

परतीच्या पावसाचा फटका; उभे पिक वाया गेल्याने नैराश्यात शेतकरी महिलेची आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 5:00 PM

The suicide of a farmer woman in depression Parabhani News सततच्या पावसामुळे कापसाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी महिला चिंतेत होत्या.

ठळक मुद्दे१० ऑक्टोबर रोजी दुपारी निपाणी टाकळी शिवारातील शेतात गेल्या होत्यामंगळवारी सकाळी शेतात आढळून आला मृतदेह

सेलू  : सततच्या पावसामुळे शेतातील उभ्या कापसाचे नुकसान झाल्याने एका ५५ वर्षीय शेतकरी महिलेने आत्महत्या केल्याची घटना निपाणी टाकळी शिवारात मंगळवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आले. कमलबाई बळीराम शिंपले (५५) असे मृत शेतकरी महिलेचे नाव आहे. या प्रकरणी सेलू पोलिसात नोंद करण्यात आली आहे. 

मानवत तालुक्यातील इरळद येथील शेतकरी महिला कमलबाई बळीराम शिंपले (५५) या १० ऑक्टोबर रोजी दुपारी निपाणी टाकळी शिवारातील स्वतः च्या शेतात पाहणीसाठी गेल्या होत्या. रात्री उशीर झाला तरीही त्या घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. मंगळवारी सकाळी निपाणी टाकळी शिवारातील त्यांच्या शेतात शोध घेतला असता तेथील चिंचेच्या झाडाला त्यांनी साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. 

सततच्या पावसामुळे कापसाचे मोठे नुकसान झाल्याने कमलबाई चिंतेत होत्या. आर्थिक विवंचना आल्याने त्या नैराश्यात होत्या. यातूनच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती कमलबाई यांचा मुलगा अर्जुन बळीराम शिंपले यांनी सेलू पोलीसात दिली आहे. यावरून सेलू पोलीस स्थानकात आकस्मिक मुत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक जसपालसिंग कोडतीर्थ पोलीस कर्मचारी सुनील वासलवार यांनी जाऊन पंचनामा केला आहे. अधिक तपास बीट जमादार शेख गौस हे करत आहेत.  

टॅग्स :Suicideआत्महत्याparabhaniपरभणीFarmerशेतकरी