शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

परभणी जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलावास पुन्हा स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:47 AM

वाळूघाटाच्या लिलावासंदर्भात शासनाचे २०१९ चे नवीन धोरण जाहीर झाले नसल्याने जिल्ह्यातील वाळू घाटाची लिलाव प्रक्रिया पुन्हा एकदा ठप्प पडली आहे. आता या लिलावासाठी शासनाच्या धोरणाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : वाळूघाटाच्या लिलावासंदर्भात शासनाचे २०१९ चे नवीन धोरण जाहीर झाले नसल्याने जिल्ह्यातील वाळू घाटाची लिलाव प्रक्रिया पुन्हा एकदा ठप्प पडली आहे. आता या लिलावासाठी शासनाच्या धोरणाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.परभणी जिल्ह्यामध्ये साधारणत: ३३ वाळू घाट यावर्षी लिलावात ठेवण्याची तयारी प्रशासनाने केली होती. दोन वर्षांपासून वाळू घाटांचे लिलाव नसल्याने जिल्ह्यामध्ये वाळूची कृत्रिम टंचाई निर्माण झाली होती. परिणामी वाळूचे भाव गगनाला भिडले. एप्रिल महिन्यामध्ये पर्यावरण समितीसमोर घाटांचे प्रस्ताव ठेवले होते. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरु झाली. त्यात १२ वाळूघाटांचा लिलाव करण्यात आला. ३ वाळूघाट शासकीय कामकाजासाठी राखीव ठेवण्यात आले. ११ वाळूघाटांचा ताबाही निविदाधारकास देण्यात आला होता. त्यानंतर जिल्ह्यातील वाळूची टंचाई काही प्रमाणात झाल्याने बांधकाम व्यावसायिकांसह घरकूल योजनेच्या लाभार्थ्यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला होता. ३० एप्रिल रोजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून जिल्ह्यात सुरु असलेली वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया थांबविण्याचे आदेश दिले आहेत. नागपूर येथील खंडपीठात दाखल झालेल्या एका याचिकेच्या सुनावणी दरम्यान नागपूर खंडपीठाने शासनाच्या मे २०१९ च्या वाळू घाटाचे धोरण निश्चित करुन त्यानंतरच लिलाव करावेत, असे सूचित केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वाळू घाटांची प्रक्रिया ठप्प पडली आहे. जिल्हा प्रशासनाने १७ वाळू घाटांची आॅनलाईन लिलाव प्रक्रिया सुरु केली होती. तर उर्वरित १८ वाळूघाट पर्यावरण समितीकडे मंजुरीसाठी पाठविले होते. मात्र विभागीय आयुक्तांच्या निर्देशामुळे वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया ठप्प पडली आहे. त्यामुळे परभणीकरांना पुन्हा वाळूची टंचाई भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सद्यस्थितीला ११ वाळू घाटातून अधिकृत वाळू उपसा होत असला तरी उर्वरित घाटांचा लिलाव झाला नसल्याने वाळूचे भाव अजूनही वधारलेलेच आहेत. विभागीय आयुक्तांच्या निर्देशानंतरच वाळू घाटाच्या लिलावांची आशा मावळली असल्याने वाळू महागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळू