शहरं
Join us  
Trending Stories
1
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
2
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
3
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
4
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
5
संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले
6
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
7
लालू यादवांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, काय झालं?
8
इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर, विषारी पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, हजारो जण बाधित
9
DSP संतोष पटेल यांनी 26 वर्षांनंतर फेडले ‘रक्ताचे ऋण’; संतु मास्टरच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली
10
आईशी भांडली, रागाने घराबाहेर पडली, नराधमाच्या तावडीत सापडली; तरुणीसोबत घडलं भयंकर
11
ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
12
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का?
13
आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!
14
कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू
15
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
16
"अहंकार दुखावल्याने त्याने मलाच सिनेमातून काढून टाकलं...", बॉलिवूड दिग्दर्शकाकडून अक्षय खन्नाची पोलखोल
17
शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक
18
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
19
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
20
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

रिफाइंडमुळे वाढते चरबी; घाणा तेलाची मागणी वाढली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:23 IST

परभणी : एकेकाळी गल्लीबोळात दिसणारे तेलाचे लाकडी घाणे बंद झाले होते. मात्र आता पुन्हा नागरिक घाण्याच्या तेलाकडे वळले असून, ...

परभणी : एकेकाळी गल्लीबोळात दिसणारे तेलाचे लाकडी घाणे बंद झाले होते. मात्र आता पुन्हा नागरिक घाण्याच्या तेलाकडे वळले असून, या तेलाला मागणी वाढली आहे.

जिल्ह्यात मध्यंतरी रिफाइंड आणि डबल रिफाइंड तेल खाण्याचे प्रस्थ वाढले होते. मात्र आता नागरिकांमध्ये बऱ्यापैकी जागृती झाली असून, संतुलित आणि सकस आहार घेण्यावर भर दिला जात आहे. त्यातूनच रिफाइंड केलेले तेल वापरण्यापेक्षा पौष्टिक मूल्य संतुलित प्रमाणात असलेले लाकडी घाण्याचे तेल वापरण्यावर नागरिकांनी भर दिला आहे. त्यातूनच या तेलाला जिल्ह्यात मागणी वाढली आहे.

रिफाइंड तेल घातक का?

n रिफाइंड तेलाच्या वापराने चरबी वाढते. त्यातच डबल रिफाइंड केलेल्या तेलातील आवश्यक असलेले गुणधर्म काढून टाकले जातात.

n त्यामुळे शरीराला आवश्यक असलेले गुणधर्म फिजिकली रिफाइंड म्हणजेच घाण्याच्या तेलातून मिळतात.

हृदय रुग्णांकडून अधिक मागणी

हृदयाच्या समस्या असणाऱ्या रुग्णांना संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. अनावश्यक चरबी वाढल्यास श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळेच घाण्याच्या तेलाचा वापर करण्यास पसंती दिली जात आहे.

लाकडी घाण्याच्या तेलाचा पर्याय

लाकडी घाण्यातून काढलेल्या तेलात शरीरासाठी आवश्यक असलेले ओमॅगा ३ हे फॅटी ॲसिड मिळते. जे रिफाइंड तेलात मिळत नाही. त्यामुळे अनेकांनी लाकडी घाण्याच्या तेलाचा पर्याय निवडला आहे. शहरात फलक लावून असे तेल विक्री होत आहे.

रिफाइंड केलेल्या तेलात ओमॅगा ६ हे फॅटी ॲसिड असते. या ॲसिडमुळे चरबी वाढते, तर दुसरीकडे घाण्याच्या तेलात नैसर्गिकरीत्या शरीराला आवश्यक असलेेले ओमॅगा ३ हे फॅटी ॲसिड मिळते. व्हिजिटेबल ऑइल, नट ऑइलही शरीरासाठी पोषक असते. त्यामुळे हे तेल आहारात वापरल्यास अनावश्यक चरबी वाढणार नाही.

- डॉ. रूपेश नगराळे, तज्ज्ञ