शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
3
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
4
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
5
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
6
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
7
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
8
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
9
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
10
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
11
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
12
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
13
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
14
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
15
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
16
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
17
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
18
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
19
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
20
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष

पालम तालुक्यात पावसाचा हाहाकार; शेकडो घरात शिरले पाणी, पुरात अडकली बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 19:15 IST

rain in parabhani : पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने चालकाला बस पाण्यातच सोडून प्रवाशांना खाली उतरवावे लागले.

ठळक मुद्देबनवस येथे १०० घरांत पाणी शिरलेपालम-ताडकळ महामार्ग बंद

पालम : पालम तालुक्यात गोदावरी, लेंडी, गळाटीस सर्वच नद्या नाले, ओढ्यांना पूर आलेला आहे. पुरामुळे सहा सप्टेंबर रोजी च्या दुपारपासून तेरा गावांचा संपर्क तुटला. गळाटी नदीपलीकडील सायळा, उमरथडी, खुर्लेवाडी, धनेवाडी तर लेंडी नदीपलीकडील फळा, फरकंडा, सोमेश्वर, घोडा, आरखेड, पुयनी, आडगाव, खडी, वनभुजवाडी आणि गणेशवाडीचा संपर्क होऊ शकत नाही. दुसरीकडे अनेक गावांत पाणी शिरले आहे. जवळा येथील जिल्हा परिषदेच्या आठ खोल्यांमध्ये पाणी शिरले आहे. येथील अनेक घरांत पाणीच पाणी झाले आहे. चाटोरी ते माळेगाव दरम्यानचा राज्य महामार्ग देखील पुराच्या पाण्यामुळे तीन तास बंद होता. हीच गत तालुक्यातील बहुतांश गावात झाली आहे. 

पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने चालकाला बस पाण्यातच सोडून प्रवाशांना खाली उतरवावे लागले. ही घटना गंगाखेड ते पालम राष्ट्रीय महामार्ग 361-एफ वरील केरवाडी गावालगत घडली. सदर बस जेसीबीच्या सहाय्याने पाण्याबाहेर काढण्याचे कार्य सुरू होते. राष्ट्रीय महामार्गावरील केरवाडी गावालगत गळाटी नदीवर पूल आहे. येथील पुलावरून गळाटी नदीचे पाणी वाहत असताना पालमकडून येणाऱ्या बसचालकाला पाण्याचा अंदाज लागला नाही. म्हणून चालकाने पूल पार करण्यासाठी बस पुढे नेली असता पाणी वाढत गेले. त्यामुळे चालकाने बस तिथेच थांबवून प्रवाशांना खाली उतरविण्याचा निर्णय घेतला. जवळपास 16 प्रवासी या बसमध्ये होते. ते जवळच्या केरवाडी गावात आले. परंतु बस पुराच्या पाण्यातच असून पाणी वाढत आहे. त्यानंतर बसचालकाने केरवाडी गावातून जेसीबी आणून ही बस पाण्याबाहेर काढण्याचा निर्णय घेतला. हे कार्य सुरू होते.

बनवस येथे १०० घरांत पाणी शिरलेपालम तालुक्यात मागील २४ तासापासून संततधार पाऊस सुरूच असल्याने पावसाने हाहाकार माजविला आहे. पालम गंगाखेड राष्ट्रीय महामार्गसह पालम-ताडकळस राज्य महामार्गही बंद असून तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. बनवस येथे १०० घरांत पाणी शिरले असून अनेक गावांमधील घरे पाण्याखाली आहेत. हा पूर १९९८ पेक्षाही मोठा आहे.

पालम-ताडकळ महामार्ग बंद; धानोरा पूल पाण्याखालीगोदावरी नदीला 6 सप्टेंबर रोजीच्या रात्रीपासून पूर आला आहे. पुराचे पाणी वाढत जाऊन 7 सप्टेंबर रोजी दुपारपर्यंत धानोरा काळे येथील पुलाला भिडले होते. दुपारी तीन वाजता गोदावरीची पाणी पातळी 364. 60 मीटर एवढी होती. म्हणून धानोरा काळे पुलावरून गोदावरी नदीचे पाणी वाहत असल्याने या महामार्गावरील वाहतूक बंद झाली. पुलाच्या दोन्ही बाजूने काही वाहने थांबली आहेत. परंतु पाणी लवकर उतरेल, अशी शक्यता नाही. नदीकाठच्या गावांना पालम प्रशासनाने धोक्याचा इशारा दिलेला आहे.

हेही वाचा - - जोरदार पावसाने परळी- अंबाजोगाई रस्ता बंद- video : पुराच्या पाण्यात स्टंटबाजीची हौस; कुपटा येथील दोघे थोडक्यात बचावले- Video : थरारक ! नदीच्या पुरात जीप वाहून गेली; एका प्रवाशाने झाडावर चढून वाचवला जीव

टॅग्स :Rainपाऊसparabhaniपरभणी