शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
4
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
5
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
6
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
7
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
8
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
9
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
10
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
11
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
12
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
13
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
14
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
15
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
16
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
17
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
18
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
19
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
20
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले

पालम तालुक्यात पावसाचा हाहाकार; शेकडो घरात शिरले पाणी, पुरात अडकली बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 19:15 IST

rain in parabhani : पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने चालकाला बस पाण्यातच सोडून प्रवाशांना खाली उतरवावे लागले.

ठळक मुद्देबनवस येथे १०० घरांत पाणी शिरलेपालम-ताडकळ महामार्ग बंद

पालम : पालम तालुक्यात गोदावरी, लेंडी, गळाटीस सर्वच नद्या नाले, ओढ्यांना पूर आलेला आहे. पुरामुळे सहा सप्टेंबर रोजी च्या दुपारपासून तेरा गावांचा संपर्क तुटला. गळाटी नदीपलीकडील सायळा, उमरथडी, खुर्लेवाडी, धनेवाडी तर लेंडी नदीपलीकडील फळा, फरकंडा, सोमेश्वर, घोडा, आरखेड, पुयनी, आडगाव, खडी, वनभुजवाडी आणि गणेशवाडीचा संपर्क होऊ शकत नाही. दुसरीकडे अनेक गावांत पाणी शिरले आहे. जवळा येथील जिल्हा परिषदेच्या आठ खोल्यांमध्ये पाणी शिरले आहे. येथील अनेक घरांत पाणीच पाणी झाले आहे. चाटोरी ते माळेगाव दरम्यानचा राज्य महामार्ग देखील पुराच्या पाण्यामुळे तीन तास बंद होता. हीच गत तालुक्यातील बहुतांश गावात झाली आहे. 

पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने चालकाला बस पाण्यातच सोडून प्रवाशांना खाली उतरवावे लागले. ही घटना गंगाखेड ते पालम राष्ट्रीय महामार्ग 361-एफ वरील केरवाडी गावालगत घडली. सदर बस जेसीबीच्या सहाय्याने पाण्याबाहेर काढण्याचे कार्य सुरू होते. राष्ट्रीय महामार्गावरील केरवाडी गावालगत गळाटी नदीवर पूल आहे. येथील पुलावरून गळाटी नदीचे पाणी वाहत असताना पालमकडून येणाऱ्या बसचालकाला पाण्याचा अंदाज लागला नाही. म्हणून चालकाने पूल पार करण्यासाठी बस पुढे नेली असता पाणी वाढत गेले. त्यामुळे चालकाने बस तिथेच थांबवून प्रवाशांना खाली उतरविण्याचा निर्णय घेतला. जवळपास 16 प्रवासी या बसमध्ये होते. ते जवळच्या केरवाडी गावात आले. परंतु बस पुराच्या पाण्यातच असून पाणी वाढत आहे. त्यानंतर बसचालकाने केरवाडी गावातून जेसीबी आणून ही बस पाण्याबाहेर काढण्याचा निर्णय घेतला. हे कार्य सुरू होते.

बनवस येथे १०० घरांत पाणी शिरलेपालम तालुक्यात मागील २४ तासापासून संततधार पाऊस सुरूच असल्याने पावसाने हाहाकार माजविला आहे. पालम गंगाखेड राष्ट्रीय महामार्गसह पालम-ताडकळस राज्य महामार्गही बंद असून तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. बनवस येथे १०० घरांत पाणी शिरले असून अनेक गावांमधील घरे पाण्याखाली आहेत. हा पूर १९९८ पेक्षाही मोठा आहे.

पालम-ताडकळ महामार्ग बंद; धानोरा पूल पाण्याखालीगोदावरी नदीला 6 सप्टेंबर रोजीच्या रात्रीपासून पूर आला आहे. पुराचे पाणी वाढत जाऊन 7 सप्टेंबर रोजी दुपारपर्यंत धानोरा काळे येथील पुलाला भिडले होते. दुपारी तीन वाजता गोदावरीची पाणी पातळी 364. 60 मीटर एवढी होती. म्हणून धानोरा काळे पुलावरून गोदावरी नदीचे पाणी वाहत असल्याने या महामार्गावरील वाहतूक बंद झाली. पुलाच्या दोन्ही बाजूने काही वाहने थांबली आहेत. परंतु पाणी लवकर उतरेल, अशी शक्यता नाही. नदीकाठच्या गावांना पालम प्रशासनाने धोक्याचा इशारा दिलेला आहे.

हेही वाचा - - जोरदार पावसाने परळी- अंबाजोगाई रस्ता बंद- video : पुराच्या पाण्यात स्टंटबाजीची हौस; कुपटा येथील दोघे थोडक्यात बचावले- Video : थरारक ! नदीच्या पुरात जीप वाहून गेली; एका प्रवाशाने झाडावर चढून वाचवला जीव

टॅग्स :Rainपाऊसparabhaniपरभणी