शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

परभणी जिल्ह्यात ३ हजार क्विंटल हरभऱ्याची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 18:59 IST

जिल्ह्यामध्ये नाफेडकडून ७ हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत़ त्यापैकी ५ हमीभाव खरेदी केंद्रावर १५ ते २४ एप्रिल दरम्यान ३ हजार १५३ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली आहे़

परभणी : जिल्ह्यामध्ये नाफेडकडून ७ हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत़ त्यापैकी ५ हमीभाव खरेदी केंद्रावर १५ ते २४ एप्रिल दरम्यान ३ हजार १५३ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली आहे़ दरम्यान, अनेक तूर उत्पादकांच्या तुरीची खरेदी शिल्लक असल्याने खरेदीसाठी १५ मेपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.

यावर्षीच्या रबी हंगामात शेतकऱ्यांनी पारंपरिक ज्वारी पिकास फाटा देत हरभऱ्याची विक्रमी पेरणी केली़ कृषी विभागाने केलेल्या नियोजनानुसार तब्बल १५० टक्के हरभऱ्याची पेरणी झाली़ कमी अधिक प्रमाणात झालेल्या पावसावर शेतकऱ्यांना बऱ्यापैकी उत्पन्नही मिळाले़ मात्र शेतमाल बाजारपेठेत आल्यानंतर व्यापाऱ्यांनी कवडीमोल दराने हरभऱ्याची खरेदी केली़ त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकरी अडचणीत आला़ संघटना व शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केल्यानंतर नाफेडने सात हमीभाव खरेदी केंद्रावर १५ एप्रिलपासून ४ हजार ४०० रुपये प्रतिक्ंिटल हमीभाव दराने खरेदीला सुरुवात झाली़ 

परभणी जिल्ह्यातील ७ पैकी ५ हमीभाव खरेदी केंद्रावर अवघ्या ११ दिवसांत ३ हजार १५३ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली़ परभणी येथील हमीभाव खरेदी  केंद्रावर ६९ शेतकऱ्यांचे १ हजार ६६ क्विंटल ५० किलो, सेलू येथील केंद्रावर २९ शेतकऱ्यांचे ३७७ क्विंटल, जिंतूर येथे २३ शेतकऱ्यांचा २९९ क्विंटल हरभरा, पूर्णा येथील १६ शेतकऱ्यांचा २०६ क्विंटल तर पाथरी येथील हमीभाव खरेदी केंद्रवर ९३ शेतकऱ्यांचा १ हजार २०५ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे़ नाफेडने सुरू केलेल्या ७ पैकी गंगाखेड व जिंतूर तालुक्यातील बोरी येथील हमीभाव खरेदी केंद्रावर अजूनही हरभरा खरेदीचा मुहूर्तच मिळाला नसल्याचे समोर आले आहे़ त्यामुळे ५ हमीभाव खरेदी केंद्रावर २३० शेतकऱ्यांचे ३ हजार १५३ क्विंंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली आहे़. जिल्ह्यातील २५०० हरभरा उत्पादकांनी आपला शेतमाल विक्रीसाठी हमीभाव खरेदी  केंद्राकडे नोंदणी केली आहे़ त्यातील २३० शेतकऱ्यांच्या शेतमालाची ११ दिवसांमध्ये खरेदी करण्यात आली़ मात्र अजूनही २ हजार शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करण्याचे आव्हान हमीभाव खरेदी केंद्र प्रशासनाकडे आहे. त्यामुळे येणाऱ्या १५ मेपर्यंत हमीभाव खरेदी केंद्र प्रशासनाला काट्यांची संख्या वाढवून शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करावा लागणार आहे़ 

तुरी खरेदीला २० दिवसांची मुदतवाढखाजगी बाजारपेठेत तूर उत्पादकांची अडवणूक होत असल्याने राज्य शासनाने सुरू केलेल्या नाफेडच्या हमीभाव खरेदी केंद्राकडे जिल्ह्यातील १७ हजार ३६५ तूर उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती़ मात्र राज्य शासनाने १८ एप्रिलपर्यंतच तूर खरेदी करण्याचे आदेश दिले होते़ जिल्ह्यातील ७ हमीभाव खरेदी केंद्रावर १८ एप्रिलपर्यंत ३ हजार ३२१ शेतकऱ्यांचीच ५५ हजार ४२१ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली़ उर्वरित १४ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी करूनही मुदत संपल्याने त्यांची तूर खरेदी करण्यात आली नाही़

तूर-हरभरा खरेदीचे आव्हानतुरीसह हरभऱ्याच्या खरेदीसाठी १५ मेपर्यंतची मुदत देण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी खरेदीसाठी असलेला  अल्प कालावधी आणि शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांची संख्या पाहता या काळात तूर आणि हरभऱ्याची संपूर्ण खरेदी होण्याची शक्यता कमी आहे़ सद्यस्थितीत प्रतिदिन ५० शेतकऱ्यांचाच शेतीमाल एका केंद्रावर खरेदी होत आहे़ शेतमाल विकणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मात्र हजारांमध्ये आहे़ त्यामुळे दोन्ही शेतमालांची खरेदी करताना अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार असून, एकाही शेतकऱ्याचा शेतमाल शिल्लक राहणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे़ जिल्ह्यातील परभणी, सेलू, गंगाखेड, जिंतूर, पूर्णा, पाथरी व बोरी या सात हमीभाव खरेदी केंद्रावर १४ हजार शेतकऱ्यांची  तूर खरेदी करणे बाकी आहे़ तसेच २ हजार २०० शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करावयाचा आहे़ मागचा खरेदीचा वेग पाहता शासनाने दिलेल्या १५ मेपर्यंतच्या मुदतीत तब्बल १६ हजार शेतकऱ्यांची तूर व हरभरा खरेदीचे मोठे आव्हान केंद्र प्रशासनासमोर आहे़ 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीMarket Yardमार्केट यार्ड