शहरं
Join us  
Trending Stories
1
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
2
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
3
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
4
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
5
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
6
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
7
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
8
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
9
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
10
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
11
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
12
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
13
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
14
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
15
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
16
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
17
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
18
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
19
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
20
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई

परभणी जिल्ह्यात खरिपासाठी पाच लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 8:39 PM

२०१८-१९ च्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने ५ लाख २१ हजार ८०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. यामध्ये कापसासाठी १ लाख ६५ हजार तर सोयाबीन या पिकासाठी २ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले आहे.

- मारोती जुंबडे

परभणी :  २०१८-१९ च्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने ५ लाख २१ हजार ८०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. यामध्ये कापसासाठी १ लाख ६५ हजार तर सोयाबीन या पिकासाठी २ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले आहे. पावसाने यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यामध्ये सरासरी राखल्यास प्रस्तावित क्षेत्रावर पेरणी होण्याची अपेक्षा कृषी विभागाकडून व्यक्त होत आहे.

गतवर्षीच्या खरीप हंगामामध्ये कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यासाठी ५ लाख २१ हजार ७०० हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले होते. त्यामध्ये कापसासाठी १ लाख ९१ हजार ७०० तर सोयाबीनसाठी २ लाख २२ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले होते. कमी-अधिक प्रमाणात झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापूस या प्रमुख पिकांची पेरणी केली. परंतु, जून व जुलै या दोन महिन्यामध्ये पावसाने खंड दिला. त्यामुळे सोयाबीन, मूग, उडीद ही पिके जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या हातून गेली. 

कमी-अधिक प्रमाणात झालेल्या पावसामुळे नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणारे कापूस पीक चांगलेच बहरले. या पिकातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र पहिल्याच वेचणीनंतर बोंडअळीने कापसावर हल्ला चढविला. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी पिकावर केलेला खर्चही उत्पादनातून निघाला नाही. एकंदरित गतवर्षीचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पाडून गेला. 

यावर्षी कृषी विभागाच्या वतीने एप्रिल महिन्यात २०१८-१९ या खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. यामध्ये जिल्ह्यासाठी ५ लाख २१ हजार ८०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. त्यामध्ये कापूस लागवडीसाठी १ लाख ६५ हजार तर सोयाबीन पेरणीसाठी २ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे.कडधान्यासाठी ९०९१, अन्नधान्यासाठी १२५१, तिळासाठी १० हेक्टर, सूर्यफुलासाठी २ हेक्टर, कºहाळासाठी २०० हेक्टर, गळीत धान्यासाठी २ हजार ३१६ हेक्टर, ऊस पीकासाठी २ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. यावर्षी जिल्ह्यामध्ये जूनपासून समाधानकारक पाऊस झाल्यास कृषी विभागाने प्रस्तावित केलेल्या क्षेत्रावर पेरणी होण्याची अपेक्षा कृषी विभागाकडून व्यक्त होत आहे.

२६ हजारांनी घटले कापसाचे क्षेत्रगतवर्षी कृषी विभागाने कापसासाठी १ लाख ९१ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते. त्यावर १०० टक्के कापसाची लागवडही झाली होती. परंतु, बोंडअळीच्या संकटामुळे कापूस उत्पादकांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे यावर्षी कापसाचे क्षेत्र घटणार असल्याची कल्पना कृषी विभागाला होती. त्यानुसार गतवर्षीच्या तुलनेत कृषी विभागाने २६ हजार हेक्टर क्षेत्र कापसाचे कमी करुन १ लाख ६५ हजार हेक्टर क्षेत्र कापूस लागवडीसाठी प्रस्तावित केले. 

दीड लाख मेट्रिक टन खताची मागणी यावर्षीच्या खरीप हंगामात कृषी विभागाने केलेल्या नियोजनानुसार शेतकऱ्यांना रासायनिक औषधे, खते यांची कमतरता भासू नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागानेही खताचे नियोजन केले आहे. २०१८-१९ या खरीप हंगामासाठी १ लाख ५१ हजार १९० मेट्रिक टन खताची मागणी केली आहे. यामध्ये ६५ हजार मेट्रिक टन युरिया, २१ हजार ६९० मे.टन, डीएपी ४ हजार  मे.टन,  एमओपी ५२ हजार ४५० मे.टन या खतांचा समावेश आहे. जिल्ह्यासाठी ८९ हजार ३६० मे.टन आवंटन मंजूर झाले आहे. ३१ मार्च २०१८ पर्यंत ३५ हजार १७९ मे.टन खत शिल्लक आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून मिळाली आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रparabhaniपरभणी