शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

परभणीतील ६८ वाळूघाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू; वाळूटंचाई कमी होण्याची शक्यता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 17:17 IST

गोदावरी, पूर्णा, दुधना या नदी पात्रांमधील ६८ वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया महसूल विभागाने सुरु केली आहे.

परभणी : जिल्ह्यातील गोदावरी, पूर्णा, दुधना या नदी पात्रांमधील ६८ वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया महसूल विभागाने सुरु केली आहे. त्यामुळे पुढील महिन्यापासून वाळू टंचाईने हैराण झालेल्या बांधकामधारकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

परभणी जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाळू टंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील गोदावरी, पूर्णा व दुधना या तीन मोठ्या नदी पात्रांमध्ये मूबलक प्रमाणात वाळू उपलब्ध असली तरी कृत्रिम वाळू टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. जिल्ह्यात तब्बल २१ ते २२ हजार रुपयांना ३ ब्रास वाळू काळ्या बाजारात विकली जात आहे. असे असले तरी प्रशासकीय पातळीवरुन वाळूच्या काळ्या बाजारावर आळा घालण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना तोकड्या पडत आहेत. शिवाय कारवाईतील दुजाभावही प्रशासनाच्या अंगलट येत आहे.

शनिवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वाळू वरुनच लोकप्रतिनिधींनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. जिल्हाधिकारी पी. शिव शंकर हे वाळू माफियांवर कडक कारवाई करीत असले तरी त्यांना इतर अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळत नसल्याने वाळू चोरीचे प्रमाण वाढले आहे. यावर उपाय करण्यासाठी आता प्रशासनाने २०१८-१९ या आर्थिक वर्षाकरीता जिल्ह्यातील ६८ वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरु केली आहे. या संदर्भातील जाहीर प्रगटन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने काढण्यात आले आहे. त्यामध्ये पूर्णा नदीपात्रातील १४, दुधना नदीपात्रातील ७ व गोदावरी नदीपात्रातील ४७ वाळू घाटांचा समावेश आहे.

निविदा प्रक्रियेस १२ सप्टेंबरपासून सुरुवात झाली असून ३० सप्टेंबरपर्यंत याकरीता निविदा दाखल करता येणार आहेत. त्यानंतर आलेल्या निविदांची छाननी करुन अधिकची निविदा असणाऱ्यांना संबंधित वाळूघाट सुटणार आहेत. ही प्रशासकीय प्रक्रिया असली तरी प्रत्यक्षात मात्र वेगळीच परिस्थिती निर्माण होत असल्याचे गेल्या काही वर्षापासून पहावयास मिळत आहे.

जिल्ह्यातील गुंज खु. घाटात सर्वाधिक वाळूसाठाप्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या निविदा प्रक्रियेत पाथरी तालुक्यातील गुंज खु. येथील वाळू घाटात सर्वाधिक वाळू उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे. गुंज खु. येथून तब्बल ३१ हजार ९६ ब्रास वाळूच्या लिलावाची निविदा काढण्यात आली आहे. त्यानंतर पाथरी तालुक्यातीलच उमरा या गावातील वाळू घाटाच्या तब्बल ३० हजार ७४२ ब्रास वाळूची निविदा काढण्यात आली आहे. तिसऱ्या क्रमांकावर कानसूर येथील वाळूघाटातील २८ हजार ६२८ ब्रास वाळूचा लिलाव काढण्यात आला आहे. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून या तिन्ही गावांमधील वाळूसाठ्यांचा लिलाव ग्रामस्थांकडून होऊ दिला जात नाही. परिणामी या गाव परिसरातील पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. इतर ठिकाणच्या ग्रामस्थांनी आदर्श घ्यावा, असे या तीन गावाचे काम आहे. असे असले तरी प्रशासनाने मात्र या तीन गावांमधील वाळूसाठ्यांच्या लिलावाची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे या प्रशासकीय प्रक्रियेला पुन्हा एकदा ग्रामस्थांचा विरोध होणार आहे. 

लिलावात वाळू माफियांकडून होतेय रिंगवाळू माफियांकडून रिंग करुन मोठ्या वाळूघाटांचा लिलाव होऊ दिला जात नाही. त्यामुळे संबंधित वाळूघाट लिलावाविना पडून राहतात. त्यानंतर या वाळूघाटातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळूचा उपसा केला जातो. ही प्रक्रिया गेल्या वर्षभरापूर्वी मोठ्या प्रमाणात राबविली गेली. त्यामुळे महसूल विभागाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला असला तरी वाळू घाटाचा लिलाव का होऊ शकला नाही, या बाबतच्या कारणांचा शोध महसूल विभागाला घेता आलेला नाही. परिणामी लिलाव न होऊ देताच फुकटात वाळू उचलून कोट्यवधी रुपये वाळू माफियांनी कमविले. इकडे प्रशासनाने मात्र दोन-चार कारवायांची औपचारिकता पूर्ण करुन दंडापोटी महसूल वसूल केल्याचा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला. त्यामुळे यावर्षी तरी वाळू माफियांकडून रिंग होणार नाही, याची काळजी प्रशासनाला घ्यावी लागणार आहे. 

टॅग्स :sandवाळूparabhaniपरभणीParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणी