शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

परभणी जिल्ह्यात पावसाची रिपरिप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 00:16 IST

जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून भिज पावसाला सुरुवात झाली असून, सर्वदूर होत असलेल्या या पावसामुळे जिल्ह्याची भूजल पातळी वाढून काही प्रमाणात पाणी समस्येपासून दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून भिज पावसाला सुरुवात झाली असून, सर्वदूर होत असलेल्या या पावसामुळे जिल्ह्याची भूजल पातळी वाढून काही प्रमाणात पाणी समस्येपासून दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.दीड महिन्याच्या खंडानंतर शुक्रवारपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. शुक्रवारी व शनिवारी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील पिकांना दिलासा मिळाला होता. पावसाअभावी माना टाकत असणारी पिके या पावसाने तरारली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जिवात जिव पडला. या पावसाने बळीराजा सुखावला तरी पाण्याचा प्रश्न मात्र कायम आहे. त्यामुळे जिल्हावासियांना पाणी टंचाईची धास्ती लागून राहिली आहे. सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण असले तरी पाऊस बरसला नाही. त्यामुळे मंगळवारी पाऊस होतो की नाही, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र सोमवारी मध्यरात्रीपासूनच वातावरणात बदल झाला. परभणी शहर व परिसरात सकाळी रिमझिम पावसाला सुरुवात झाली. कधी मध्यम स्वरुपाचा तर कधी रिमझीम पाऊस बरसत राहिला. या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणीच पाणी साचले आहे.परभणी शहराबरोबरच गंगाखेड तालुक्यातही सोमवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळपासून रिमझिम पाऊस होत असून, शहरातील रस्ते चिखलमय झाले आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यांत पाणी साचल्याने वाहनधारक, पादचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे.मानवत, पाथरी, सेलू, जिंतूर, पालम, पूर्णा या तालुक्यांतही दिवसभर रिमझिम पाऊस झाला. एकंदर मंगळवारी झालेल्या भिज पावसामुळे जिल्ह्यातील भूजल पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही दिवस का होईना; पाण्याची समस्या मिटण्याची आशा जिल्हावासियांना आहे.चोवीस तासांत : सरसरी ३.२६ मि.मी. पावसाची झाली नोंद४मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी ३.२६ मि.मी. पाऊस झाला. परभणी तालुक्यात २.५१ मि.मी., पालम ४.६७, पूर्णा: ३.२०, गंगाखेड : ५.७५, सोनपेठ : ४, सेलू : २, पाथरी: २.३३, जिंतूर : १.१७ आणि मानवत तालुक्यात ३.६७ मि.मी. पाऊस झाला आहे.४जिल्ह्यात आतापर्यंत १८१.८७ मि.मी. पाऊस झाला असून, मानवत तालुक्यात सर्वाधिक २३३ मि.मी. आणि पालम तालुक्यात सर्वात कमी १४८ मि.मी. पाऊस झाला आहे. त्याचप्रमाणे परभणी तालुक्यात १५९ मि.मी, पूर्णा : २०५, गंगाखेड १७१, सोनपठ : १८९, सेलू : १५८, पाथरी : १७६ आणि जिंतूर तालुक्यात १९३ मि.मी. पाऊस झाला आहे.नदी, नाले, प्रकल्प कोरडेठाकच !४परभणी जिल्ह्यात मंगळवारी सकाळी रिमझिम पावसाने हजेरी लावली असली तरी जिल्ह्यातील गोदावरी, पूर्णा या नद्या कोरड्याठाक आहेत.४या नद्यांमध्ये अद्याप पाणीच दाखल झाले नाही. त्याचप्रमाणे सर्व प्रकल्प कोरडेठाक असल्याने जिल्हावासियांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसFarmerशेतकरी