शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

परभणीत १६ टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:58 AM

जिल्ह्यात पाणीप्रश्न गंभीर होत चालला आहे. १६ गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून या गावांना टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. तर १०३ विहिरी अधिग्रहित करुन या विहिरींचे पाणी टंचाईग्रस्त गावासाठी खुले करुन दिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात पाणीप्रश्न गंभीर होत चालला आहे. १६ गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून या गावांना टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. तर १०३ विहिरी अधिग्रहित करुन या विहिरींचे पाणी टंचाईग्रस्त गावासाठी खुले करुन दिले आहे.जिल्ह्यात प्रकल्पांमधील पाणीसाठा कमी होत असतानाच दुसरीकडे टंचाईग्रस्त गावांची संख्याही वाढत चालली आहे. मागील आठवड्यात १२ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. त्यात आता आणखी चार गावांची भर पडली आहे. टंचाईग्रस्त गावांना पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाला धावपळ करावी लागत आहे. सद्यस्थितीत उपलब्ध झालेल्या माहिती नुसार पूर्णा तालुक्यातील ५ गावांना पाच टँकरद्वारे, पालम तालुक्यातील ३ गावे व २ वाड्यांना ६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गंगाखेड तालुक्यात ४ तर जिंतूर तालुक्यात एका गावाला टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा होत आहे. पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनाने टँकरसह विहिरीचे अधिग्रहण करण्याची कामे हाती घेतली आहेत. जिल्ह्यात १०३ विहिरींचे प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल झाले होते. या सर्व विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. गंगाखेड तालुक्यामध्ये सर्वाधिक ४१ विहिरी अधिग्रहित केल्या असून जिंतूर तालुक्यात २१, पालम २० , पूर्णा १७, पाथरी २ आणि मानवत व सेलू तालुक्यात प्रत्येक १ विहीर अधिग्रहित करण्यात आली आहे. ६२ गावे आणि २३ वाड्यांना अधिग्रहित केलेल्या विहिरींचे पाणी पुरविले जात आहे. एकंदर जिल्ह्यामध्ये टंचाई वाढत चालली असून जिल्हा प्रशासनाने ग्रामस्थांना पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी टंचाई निवारणाच्या कामांना प्राधान्य दिले आहे. आगामी काळात ग्रामीण भागातून दाखल होणाऱ्या प्रस्तावांना तातडीने मंजुरी द्यावी व ग्रामीण भागातील टंचाई निवारणासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.या गावांमध्ये टँकरचे पाणीपालम तालुक्यात मौजे रामपूर व रामपूर तांडा, नाव्हा, चाटोरी, आनंदवाडी, पूर्णा तालुक्यात पिंपळा लोखंडे, हिवरा, वाई (लासीना), लोण खु., आहेरवाडी, गंगाखेड तालुक्यात खंडाळी, विळेगाव, गुंडेवाडी, उमरा नाईक तांडा आणि जिंतूर तालुक्यामध्ये मांडवा येथे टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई