शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

प्रधानमंत्री पीकविमा योजना : परभणी जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना वाटाण्याच्या अक्षताच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 7:56 PM

१२ मंडळांतील ४९ हजार ४८३ शेतकऱ्यांनाच तुटपुंजी मदत 

ठळक मुद्देसोयाबीनच्या विम्याची प्रतीक्षा

- मारोती जुंबडे परभणी : आॅक्टोबर २०१९ मध्ये जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे पूर्णत: नुकसान झाले होते़ नुकसान झाल्याचे राज्यपाल व राज्य शासनाने मान्यही केले़ त्यामुळे सरसकट शेतकऱ्यांना मदतीचे वाटपही करण्यात आले; परंतु, अ‍ॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीने जिल्ह्यातील ३८ महसूल मंडळांपैकी केवळ १२ महसूल मंडळातील ४९ हजार ४८३ शेतकऱ्यांना ९ कोटी ६३ लाख ८७ हजार ४७८ रुपयांचाच पीक विमा दिला आहे़ त्यामुळे २६ मंडळांतील शेतकऱ्यांना विमा कंपनीने ठेंगा दाखविल्याचे समोर आले आहे़ 

२०१९-२० या खरीप हंगामात जिल्ह्यात ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, मूग, उडीद या प्रमुख पिकांचा पेरा केला होता़ नैसर्गिक संकटांच्या कचाट्यातून आपल्या पिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी जिल्ह्यातील ८ लाख २१ हजार ६८७ शेतकऱ्यांनी ४ लाख ३० हजार ४३५ हेक्टर क्षेत्रावरील उडीद, कापूस, मूग, धान, बाजरी, ज्वारी, भात व सूर्यफूल पिकांचा विमा अ‍ॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीकडे उतरविला होता़ यामध्ये ७२ हजार ९९८ शेतकऱ्यांनी २४ हजार ६२७ हेक्टर क्षेत्रावरील उडीद पिकासाठी विमा कंपनीकडे ९३ लाख ५८ हजार ३४८ रुपयांचा विमा हप्त्याची रक्कम भरली होती़ त्याचबरोबर ७० हजार ५७७ शेतकऱ्यांनी ३१ हजार ७८७ हेक्टर क्षेत्रावरील कापूस पिकाच्या विम्यापोटी ६ कौटी ८३ लाख ४३ हजार ६७५ रुपयांची विमा रक्कम कंपनीकडे वर्ग केली होती़ १ लाख ८९ हजार १३० शेतकऱ्यांनी ७५ हजार २३ हेक्टर क्षेत्रावरील मूग पिकासाठी २८ कोटी ५० लाख ८ हजार ९९८ रुपयांचा विमा हप्ता कंपनीकडे वर्ग केला होता़ त्याचबरोबर सर्वाधिक ३ लाख ७ हजार ५०२ शेतकऱ्यांनी २ लाख २७ हजार ४० हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकापोटी १९ कोटी ५२ लाख ५४ हजार ५७१ रुपयांचा वाटा कंपनीकडे भरला होता़ आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील पिकांची परिस्थितीही सुस्थितीत होती़; परंतु, आॅक्टोबर महिन्यात अतिवृष्टी व परतीच्या पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला व ३८ मंडळातील मूग व उडीद या दोन्ही पिकांचे मोठे नुकसान झाले़ शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला़ त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीची निंतात गरज असल्याचे पाहून तालुका व जिल्हा प्रशासन कामाला लागले़ जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पंचनामे केले़ जिल्ह्यात १०० टक्के पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल राज्य शासनाला पाठविला़ राज्य शासन व राज्यपालांनीही शेतकऱ्यांना प्रती हेक्टर ८ हजारांची मदत घोषित केले़ तिचे वाटपही केले़ शासकीय मदत मिळाल्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी भरलेला अ‍ॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीकडील विमा  १०० टक्के मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती; परंतु, या विमा कंपनीने ३८ मंडळांपैकी केवळ १२ मंडळातील हजार ४९ हजार ४८३ शेतकऱ्यांना ९ कोटी ६३ लाख ८७ हजार ८७८ रुपयांचाच विमा मंजूर केला आहे़ त्यामुळे १२ मंडळातील शेतकऱ्यांना यावर्षीही विमा कंपनीने ठेंगाच दाखविल्याचे समोर आले आहे़ 

उडीद पिकासाठीही वगळली १२ मंडळे२०१९-२० या खरीप हंगामात जिल्ह्यातील ७२ हजार ९९८ शेतकऱ्यांनी अ‍ॅग्रीकल्चर इन्श्ुारन्स कंपनीकडे आपल्या उडीद पिकाचा विमा उतरविला होता़ विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या हाती या पिकांतून काहीच लागले नाही़ त्यामुळे १०० टक्के शेतकऱ्यांना हा विमा मिळेल, अशी अपेक्षा होती; परंतु, या विमा कंपनीने ३८ मंडळांपैकी केवळ २२ मंडळातील १५ हजार ९७९ शेतकऱ्यांना २ कोटी ३१ लाख ९५ हजार ५४३ रुपयांचाच पीक विमा मंजूर केला आहे़ त्यामुळे मुगापाठोपाठ उडीद पिकासाठी १२ मंडळातील शेतकऱ्यांना वगळले असल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त हाते आहे़ 

या मंडळांतील शेतकरी वंचित२०१९-२० या खरीप हंगामातील मूग पिकासाठी विमा कंपनीने गंगाखेड तालुक्यातील महातपुरी, माखणी, राणीसावरगाव व गंगाखेड, जिंतूर तालुक्यातील आडगाव, बामणी, मानवत तालुक्यातील केकरजवळा, कोल्हा, पालम तालुक्यातील बनवस, चाटोरी, पालम़ परभणी तालुक्यातील दैठणा, पिंगळी, सिंगणापूऱ पाथरी तालुक्यातील बाभळगाव, हादगाव बु़, पाथरी़ पूर्णा तालुक्यातील चुडावा, कात्नेश्वर, लिमला, पूर्णा व ताडकळस़ सेलू तालुक्यातील देऊळगाव गात, सेलू तर सोनपेठ तालुक्यातील आवलगाव व सोनपेठ या मंडळातील शेतकऱ्यांना मूग पिकाच्या विम्यातून वगळले आहे़उडीद पिकासाठी गंगाखेड तालुक्यातील गंगाखेड, महातपुरी, माखणी, राणी सावरगाव, जिंतूर तालुक्यातील आडगाव, बामणी, बोरी, जिंतूर, सावंगी म्हाळसा, पाथरी तालुक्यातील बाभळगाव, हादगाव बु़, पाथरी़ पूर्णा तालुक्यातील चुडावा, कात्नेश्वर, लिमला, पूर्णा, ताडकळस़ सेलू तालुक्यातील चिकलठाणा बु़, देऊळगावगात, कुपटा, सेलू, वालूर या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना उडीद पिकासाठी  वगळण्यात आले आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे़ 

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Loanपीक कर्जparabhaniपरभणी