शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

फिर्यादीत चुकीचा मजकूर घेतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:13 IST

परभणी : सेलू शहरातील वालूर नाका येथे झालेल्या मारहाण प्रकरणात पोलिसांनी फिर्यादीत चुकीचा मजकूर घेतला असून, आरोपींची संख्याही कमी ...

परभणी : सेलू शहरातील वालूर नाका येथे झालेल्या मारहाण प्रकरणात पोलिसांनी फिर्यादीत चुकीचा मजकूर घेतला असून, आरोपींची संख्याही कमी केली आहे. तेव्हा या प्रकरणाचा योग्य तपास करून न्याय द्यावा, अशी मागणी रेखा पवार यांच्यासह इतरांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

शाहू लक्ष्मणराव पवार यांच्या फिर्यादीवरून सेलू पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणाच्या तपासाविषयी १ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. पती गंभीर जखमी असल्याचा फायदा घेत पोलिसांनी आरोपींशी संगनमत केल्याचा आरोप निवेदनात केला आहे. त्याचप्रमाणे जाणून-बुजून फिर्यादीत चुकीचा मजकूर लिहिला. अकरा जणांनी मारहाण केली असताना केवळ चारच आरोपी दाखविले. तेव्हा या प्रकरणात पतीचा पुरवणी जबाब घेऊन फिर्यादीत समाविष्ट करावा व प्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास करावा, अशी मागणी रेखा पवार यांच्यासह रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे, आशिष वाकोडे, सुधीर साळवे, पिराजी कांबळे, कैलास पवार अर्जुन पंडित आदींनी केली आहे.