शहरं
Join us  
Trending Stories
1
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा

By मारोती जुंबडे | Updated: October 28, 2025 17:58 IST

देश धोकादायक वळणावर; बेरोजगारी, महागाईमुळे जनता त्रस्त; प्रकाश आंबेडकर यांचा इशारा

परभणी : देशातील सध्याची राजकीय व सामाजिक स्थिती धोकादायक दिशेने जात आहे. लोकांच्या मनातील असंतोष दिवसेंदिवस वाढत असून, जर ही परिस्थिती नियंत्रणात आणली नाही तर भारतात नेपाळ किंवा लद्दाखसारखी स्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला. 

परभणी शहरातील सावली विश्रामगृह येथे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याध्यक्ष प्रमोद कुटे, अशोक सोनवने, सुरेश शेळके यांच्यासह जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. आंबेडकर म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेचा विश्वास गमावला आहे. बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सामाजिक असमानता यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सरकार विरोधात उफाळून येणारा हा असंतोष जर दुर्लक्षित केला, तर देशात जनतेचा रोष नेपाळ किंवा लद्दाखसारखा स्फोटक रूप धारण करू शकतो. तसेच राज्यातील परिस्थितीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात पोलीस खाते हे बदनामीचे झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमनाथ प्रकरणी विधानसभेत खोटी माहिती दिली, पण विरोधकांनी त्यावर हक्कभंग आणला नाही. यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांची मिलीभगत दिसून येते. ओबीसी आरक्षणासंदर्भात सरकारचे दुहेरी धोरण सुरू आहे. एकीकडे जनतेसमोर जीआर रद्द करण्याचे आश्वासन दिले जाते, तर न्यायालयात त्याच जीआरचा बचाव केला जातो, असेही त्यांनी सांगितले. 

राहूल गांधींसह उध्दव ठाकरेंवर टीकाराहुल गांधी आणि उद्धव ठाकरे हे फसवाफसवीचे राजकारण करत आहेत. निवडणूक आयोगाला वेळोवेळी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होतो, पण जेव्हा ठोस भूमिका घ्यायची वेळ येते, तेव्हा दोघेही मागे हटतात. पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने ३१ हजार कोटींची मदत जाहीर केली असली, तरी हा केवळ आकड्यांचा खेळ आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचत नाही, असे आंबेडकर म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Prakash Ambedkar warns of Nepal, Ladakh-like situation in India.

Web Summary : Prakash Ambedkar warns current socio-political climate could lead to unrest like Nepal or Ladakh. He criticizes government's handling of unemployment, farmer issues, and social inequality, accusing them of betraying public trust. He also criticizes Rahul Gandhi and Uddhav Thackeray's politics.
टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरState Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेRahul Gandhiराहुल गांधी