शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा

By मारोती जुंबडे | Updated: October 28, 2025 17:58 IST

देश धोकादायक वळणावर; बेरोजगारी, महागाईमुळे जनता त्रस्त; प्रकाश आंबेडकर यांचा इशारा

परभणी : देशातील सध्याची राजकीय व सामाजिक स्थिती धोकादायक दिशेने जात आहे. लोकांच्या मनातील असंतोष दिवसेंदिवस वाढत असून, जर ही परिस्थिती नियंत्रणात आणली नाही तर भारतात नेपाळ किंवा लद्दाखसारखी स्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला. 

परभणी शहरातील सावली विश्रामगृह येथे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याध्यक्ष प्रमोद कुटे, अशोक सोनवने, सुरेश शेळके यांच्यासह जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. आंबेडकर म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेचा विश्वास गमावला आहे. बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सामाजिक असमानता यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सरकार विरोधात उफाळून येणारा हा असंतोष जर दुर्लक्षित केला, तर देशात जनतेचा रोष नेपाळ किंवा लद्दाखसारखा स्फोटक रूप धारण करू शकतो. तसेच राज्यातील परिस्थितीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात पोलीस खाते हे बदनामीचे झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमनाथ प्रकरणी विधानसभेत खोटी माहिती दिली, पण विरोधकांनी त्यावर हक्कभंग आणला नाही. यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांची मिलीभगत दिसून येते. ओबीसी आरक्षणासंदर्भात सरकारचे दुहेरी धोरण सुरू आहे. एकीकडे जनतेसमोर जीआर रद्द करण्याचे आश्वासन दिले जाते, तर न्यायालयात त्याच जीआरचा बचाव केला जातो, असेही त्यांनी सांगितले. 

राहूल गांधींसह उध्दव ठाकरेंवर टीकाराहुल गांधी आणि उद्धव ठाकरे हे फसवाफसवीचे राजकारण करत आहेत. निवडणूक आयोगाला वेळोवेळी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होतो, पण जेव्हा ठोस भूमिका घ्यायची वेळ येते, तेव्हा दोघेही मागे हटतात. पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने ३१ हजार कोटींची मदत जाहीर केली असली, तरी हा केवळ आकड्यांचा खेळ आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचत नाही, असे आंबेडकर म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Prakash Ambedkar warns of Nepal, Ladakh-like situation in India.

Web Summary : Prakash Ambedkar warns current socio-political climate could lead to unrest like Nepal or Ladakh. He criticizes government's handling of unemployment, farmer issues, and social inequality, accusing them of betraying public trust. He also criticizes Rahul Gandhi and Uddhav Thackeray's politics.
टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरState Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेRahul Gandhiराहुल गांधी