शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
4
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
5
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
6
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
7
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
8
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
9
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
10
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
11
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
12
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
13
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
14
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
15
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
16
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
17
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
18
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
19
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
20
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ

लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा

By मारोती जुंबडे | Updated: October 28, 2025 17:58 IST

देश धोकादायक वळणावर; बेरोजगारी, महागाईमुळे जनता त्रस्त; प्रकाश आंबेडकर यांचा इशारा

परभणी : देशातील सध्याची राजकीय व सामाजिक स्थिती धोकादायक दिशेने जात आहे. लोकांच्या मनातील असंतोष दिवसेंदिवस वाढत असून, जर ही परिस्थिती नियंत्रणात आणली नाही तर भारतात नेपाळ किंवा लद्दाखसारखी स्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला. 

परभणी शहरातील सावली विश्रामगृह येथे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याध्यक्ष प्रमोद कुटे, अशोक सोनवने, सुरेश शेळके यांच्यासह जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. आंबेडकर म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेचा विश्वास गमावला आहे. बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सामाजिक असमानता यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सरकार विरोधात उफाळून येणारा हा असंतोष जर दुर्लक्षित केला, तर देशात जनतेचा रोष नेपाळ किंवा लद्दाखसारखा स्फोटक रूप धारण करू शकतो. तसेच राज्यातील परिस्थितीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात पोलीस खाते हे बदनामीचे झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमनाथ प्रकरणी विधानसभेत खोटी माहिती दिली, पण विरोधकांनी त्यावर हक्कभंग आणला नाही. यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांची मिलीभगत दिसून येते. ओबीसी आरक्षणासंदर्भात सरकारचे दुहेरी धोरण सुरू आहे. एकीकडे जनतेसमोर जीआर रद्द करण्याचे आश्वासन दिले जाते, तर न्यायालयात त्याच जीआरचा बचाव केला जातो, असेही त्यांनी सांगितले. 

राहूल गांधींसह उध्दव ठाकरेंवर टीकाराहुल गांधी आणि उद्धव ठाकरे हे फसवाफसवीचे राजकारण करत आहेत. निवडणूक आयोगाला वेळोवेळी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होतो, पण जेव्हा ठोस भूमिका घ्यायची वेळ येते, तेव्हा दोघेही मागे हटतात. पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने ३१ हजार कोटींची मदत जाहीर केली असली, तरी हा केवळ आकड्यांचा खेळ आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचत नाही, असे आंबेडकर म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Prakash Ambedkar warns of Nepal, Ladakh-like situation in India.

Web Summary : Prakash Ambedkar warns current socio-political climate could lead to unrest like Nepal or Ladakh. He criticizes government's handling of unemployment, farmer issues, and social inequality, accusing them of betraying public trust. He also criticizes Rahul Gandhi and Uddhav Thackeray's politics.
टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरState Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेRahul Gandhiराहुल गांधी