शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात ग्रामीण बँकेकडून सर्वाधिक पीक कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 00:58 IST

महाराष्ट्र ग्रामीण बँकेने जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक ४५.६९ कोटी रुपयांचे पीक कर्ज शेतकऱ्यांना वाटप केले आहे. इतर बँका मात्र अजूनही पीक कर्ज वाटपासाठी उदासीन असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्दे२२.८३ टक्के उद्दिष्ट पूर्ण : शाखानिहाय केले कर्ज वाटपाचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महाराष्ट्र ग्रामीण बँकेने जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक ४५.६९ कोटी रुपयांचे पीक कर्ज शेतकऱ्यांना वाटप केले आहे. इतर बँका मात्र अजूनही पीक कर्ज वाटपासाठी उदासीन असल्याचे दिसत आहे.खरीप हंगामामध्ये शेतक-यांना आर्थिक हातभार लागावा, या उद्देशाने दरवर्षी बँकांकडून पीक कर्जाचे वाटप केले जाते. जिल्हा प्रशासन वर्षाचा आराखडा तयार करुन प्रत्येक बँकेला पीक कर्जाचे उद्दिष्ट देते. मात्र कर्ज वाटप करताना अनेक अडचणी येतात. शेतक-यांना वेळेत कर्ज मिळत नाही, अशी शेतक-यांची ओरड असते. असे असले तरी काही बँकांनी पीक कर्ज वाटपात समाधानकारक कामगिरी केली आहे. त्यात महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा वरचा क्रमांक लागतो.जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र ग्रामीण बँकेला यावर्षी २००.१४ कोटी रुपयांचे पीक कर्जाचे उद्दिष्ट दिले होते. बँकेने ४ जुलैपर्यंत ४५ कोटी ६९ लाख रुपयांचे कर्ज वितरित केले आहे.जिल्ह्यातील ५ हजार ५४६ शेतक-यांना या कर्जाचा लाभ झाला असून उद्दिष्टाच्या तुलनेत २२.८३ टक्के काम या बँकेने केले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या जिल्ह्यात ३७ शाखा असून या शाखांमधून पीक कर्ज वाटपाला प्राधान्य देण्यात आले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने पीक कर्ज वाटपासाठी जिल्ह्यात योग्य नियोजन केले.परिणामी जास्तीत जास्त शेतक-यांपर्यंत ही बँक पोहचत आहे. ऐन पेरणीच्या वेळेलाच कर्ज उपलब्ध करुन दिल्याने शेतक-यांनाही त्याचा लाभ होत आहे.---जिल्हाभरात ११८ कोटींचे वाटपजिल्ह्यातील ग्रामीण बँक, व्यापारी आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेला १४७० कोटी ४४ लाख १२ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट खरीप हंगामात देण्यात आले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेला १६५ कोटी ४७ लाख रुपये उद्दिष्ट असून या बँकेने १८ हजार ९६५ शेतक-यांना ३६ कोटी ९८ लाख २१ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. कर्ज वाटपाची ही टक्केवारी २२.३५ टक्के एवढी आहे.व्यापारी बँकांना ११०४ कोटी ८२ लाख रुपयांचे उद्दिष्ट असून या बँकांनी केवळ ३ हजार ४६९ शेतक-यांना ३५ कोटी ५३ लाख रुपयांचे (३.२२ टक्के) कर्ज वाटप केले आहे. तर ग्रामीण बँकेला २०० कोटी १४ लाख रुपयांचे उद्दिष्ट असून त्या तुलनेत ४५ कोटी ६९ लाख ७ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. त्याची टक्केवारी २२.८३ एवढी आहे. जी जिल्ह्यातील इतर बँकांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.---महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडे पीक कर्जासाठी शेतक-यांची गर्दी होत आहे. ज्या शाखेमध्ये पीक कर्जासाठी अधिक गर्दी होते, त्या ठिकाणी इतर शाखांमधील मनुष्यबळ उपलब्ध करुन शेतक-यांना वेळेत कर्ज वितरित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बँकेला दिलेले उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण केले जाईल.डी.डी.भिसे, विभागीय व्यवस्थापक, महा.ग्रामीण बँक

टॅग्स :parabhaniपरभणीbankबँकMaharashtra Bankमहाराष्ट्र बँकFarmerशेतकरी