शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
3
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
4
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
5
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
6
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
7
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
8
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
9
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
10
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
11
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
12
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
13
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
14
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
15
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
16
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
17
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
18
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
19
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
20
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन

परभणी जिल्ह्यात ग्रामीण बँकेकडून सर्वाधिक पीक कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 00:58 IST

महाराष्ट्र ग्रामीण बँकेने जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक ४५.६९ कोटी रुपयांचे पीक कर्ज शेतकऱ्यांना वाटप केले आहे. इतर बँका मात्र अजूनही पीक कर्ज वाटपासाठी उदासीन असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्दे२२.८३ टक्के उद्दिष्ट पूर्ण : शाखानिहाय केले कर्ज वाटपाचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महाराष्ट्र ग्रामीण बँकेने जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक ४५.६९ कोटी रुपयांचे पीक कर्ज शेतकऱ्यांना वाटप केले आहे. इतर बँका मात्र अजूनही पीक कर्ज वाटपासाठी उदासीन असल्याचे दिसत आहे.खरीप हंगामामध्ये शेतक-यांना आर्थिक हातभार लागावा, या उद्देशाने दरवर्षी बँकांकडून पीक कर्जाचे वाटप केले जाते. जिल्हा प्रशासन वर्षाचा आराखडा तयार करुन प्रत्येक बँकेला पीक कर्जाचे उद्दिष्ट देते. मात्र कर्ज वाटप करताना अनेक अडचणी येतात. शेतक-यांना वेळेत कर्ज मिळत नाही, अशी शेतक-यांची ओरड असते. असे असले तरी काही बँकांनी पीक कर्ज वाटपात समाधानकारक कामगिरी केली आहे. त्यात महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा वरचा क्रमांक लागतो.जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र ग्रामीण बँकेला यावर्षी २००.१४ कोटी रुपयांचे पीक कर्जाचे उद्दिष्ट दिले होते. बँकेने ४ जुलैपर्यंत ४५ कोटी ६९ लाख रुपयांचे कर्ज वितरित केले आहे.जिल्ह्यातील ५ हजार ५४६ शेतक-यांना या कर्जाचा लाभ झाला असून उद्दिष्टाच्या तुलनेत २२.८३ टक्के काम या बँकेने केले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या जिल्ह्यात ३७ शाखा असून या शाखांमधून पीक कर्ज वाटपाला प्राधान्य देण्यात आले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने पीक कर्ज वाटपासाठी जिल्ह्यात योग्य नियोजन केले.परिणामी जास्तीत जास्त शेतक-यांपर्यंत ही बँक पोहचत आहे. ऐन पेरणीच्या वेळेलाच कर्ज उपलब्ध करुन दिल्याने शेतक-यांनाही त्याचा लाभ होत आहे.---जिल्हाभरात ११८ कोटींचे वाटपजिल्ह्यातील ग्रामीण बँक, व्यापारी आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेला १४७० कोटी ४४ लाख १२ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट खरीप हंगामात देण्यात आले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेला १६५ कोटी ४७ लाख रुपये उद्दिष्ट असून या बँकेने १८ हजार ९६५ शेतक-यांना ३६ कोटी ९८ लाख २१ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. कर्ज वाटपाची ही टक्केवारी २२.३५ टक्के एवढी आहे.व्यापारी बँकांना ११०४ कोटी ८२ लाख रुपयांचे उद्दिष्ट असून या बँकांनी केवळ ३ हजार ४६९ शेतक-यांना ३५ कोटी ५३ लाख रुपयांचे (३.२२ टक्के) कर्ज वाटप केले आहे. तर ग्रामीण बँकेला २०० कोटी १४ लाख रुपयांचे उद्दिष्ट असून त्या तुलनेत ४५ कोटी ६९ लाख ७ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. त्याची टक्केवारी २२.८३ एवढी आहे. जी जिल्ह्यातील इतर बँकांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.---महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडे पीक कर्जासाठी शेतक-यांची गर्दी होत आहे. ज्या शाखेमध्ये पीक कर्जासाठी अधिक गर्दी होते, त्या ठिकाणी इतर शाखांमधील मनुष्यबळ उपलब्ध करुन शेतक-यांना वेळेत कर्ज वितरित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बँकेला दिलेले उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण केले जाईल.डी.डी.भिसे, विभागीय व्यवस्थापक, महा.ग्रामीण बँक

टॅग्स :parabhaniपरभणीbankबँकMaharashtra Bankमहाराष्ट्र बँकFarmerशेतकरी