शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

पाथरीत व्यापा-याकडून कवडीमोल दराने तुरीची खरेदी; हमीभाव केंद्र सुरू करण्यास होतोय विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 3:45 PM

परभणीसह सेलू आणि जिंतूर येथे शासनाने हमी भाव खरेदी केंद्र सुरू केले असले तरी मानवत येथील हमी भाव केंद्र सुरू करण्यास विलंब लावला जात असल्याने व्यापारी याचा लाभ उठवित असून, हमीभावापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी होत आहे. त्यामुळे तुरीचे मोठे उत्पादन होऊनही शेतकर्‍यांना आर्थिक फटकाच सहन करावा लागत आहे. 

- विठ्ठल भिसे

पाथरी ( परभणी ): परभणीसह सेलू आणि जिंतूर येथे शासनाने हमी भाव खरेदी केंद्र सुरू केले असले तरी मानवत येथील हमी भाव केंद्र सुरू करण्यास विलंब लावला जात असल्याने व्यापारी याचा लाभ उठवित असून, हमीभावापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी होत आहे. त्यामुळे तुरीचे मोठे उत्पादन होऊनही शेतकर्‍यांना आर्थिक फटकाच सहन करावा लागत आहे. 

पाथरी तालुक्यामध्ये यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये ४ हजार २६० हेक्टवर तुरीचा पेरा करण्यात आला. सध्या तूर काढणी जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे. अनेक शेतकर्‍यांना ९ ते १० क्विंटल तुरीचा उतारा मिळत आहे. खरिपातील कापूस पीक बोंडअळीेने फस्त केल्याने तूर पिकावरच शेतकर्‍यांची मदार आहे. सध्या बाजारपेठेत तुरीची आवक सुरू असून शासनाने हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पाथरी आणि मानवत या दोन तालुक्यांसाठी गतवर्षीप्रमाणे एकत्र खरेदी केंद्र सुरू होणार आहे. परंतु, हे केंद्र सुरू झाले नाही.

गतवर्षी राज्य शासनाने तुरीला ५०५० रुपये हमीभाव दिला होता. यावर्षी मात्र ५ हजार २५० रुपये हमी दर व २०० रुपये बोनस असा ५ हजार ४५० रुपये दर जाहीर केला आहे. तसेच शासनाने प्रत्येक शेतकर्‍यांची ७.५० क्विंटल तूर खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याने अडचण निर्माण झाली आहे. खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने तालुक्यातील तूर उत्पादक शेतकरी व्यापार्‍यांच्या दारामध्ये तूर आणत आहेत. व्यापार्‍यांकडून ४ हजार ते ४२०० रुपये प्रती क्विंटल एवढ्या कवडीमोल दराने तूर खरेदी केली जात आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी त्रस्त झाला आहे. पाथरी व मानवत तालुक्यासाठी मानवत येथे तूर खरेदी केंद्र सुरू होणार असल्याने खरेदीसाठी आॅनलाईन नोंदणी केली जात आहे. दोन्ही तालुक्यातील १४०० शेतकर्‍यांची नोंदणी झाली असून आणखी १२०० शेतकर्‍यांनी अर्ज दाखल केले आहेत.  मात्र खरेदी केंद्रच सुरू नसल्याने शेतकर्‍यांना कवडीमोल दराने तूर विक्री करावी लागत आहे.

केंद्र सुरू करण्यास जाणीवपूर्वक विलंबएक महिन्यापासून तूर बाजारात विक्रीसाठी दाखल झाली आहे. मात्र अद्याप मानवत येथील हमीभाव तूर खरेदी केंद्र सुरू झाले नाही. विदर्भ फेडरेशनच्या वतीने मानवत येथे तूर खरेदी केंद्र सुरू केले जाणार आहे. अधिकाधिक शेतकर्‍यांची तूर खाजगी बाजारपेठेत विक्री व्हावी, जेणे करुन शिल्लक राहिलेलीच तूर हमी भाव केंद्रावरुन खरेदी होईल, या उद्देशाने हमी भाव केंद्र सुरू करण्यास जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे, असा आरोप आता तूर उत्पादक शेतकरी करीत आहेत. शुक्रवारपासून जिल्ह्यात तीन खरेदी केंद्र सुरू झाले मात्र, यात मानवत खरेदी केंद्राचा समावेश नसल्याने शेतकर्‍यांचा रोष वाढला आहे

पाथरीत केंद्र सुरू करण्यासाठी प्रस्तावपाथरी तालुक्यातील शेतकर्‍यांची गैरसोय लक्षात घेता पाथरी येथे हमीभाव तूर खरेदी केंद्र सुरू करावे, असा प्रस्ताव बाजार समितीने जिल्हा मार्केटिंग फेडरेशन कार्यालयाकडे सादर केला आहे. यासाठी १ हजार मे.टन क्षमता असलेले गोदामही उपलब्ध करून दिल्याची माहिती बाजार समितीचे सचिव बापू कुटे यांंनी दिली आहे. 

पाथरी बाजार समितीने तूर खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात कळविले असले तरी पाथरी येथील खरेदी विक्री संघ अ वर्ग सभासद नाही. पायाभूत सुविधा नाहीत. त्यामुळे पाथरी येथे खरेदी केंद्र सुरू होण्यास अडचणी असल्याची माहिती फेडरेशनच्या अधिकार्‍यांनी दिली.किमान मानवत येथील हमी भाव तूर केंद्र तातडीने सुरू करण्यासाठी मार्केटिंग फेडरेशनने प्रयत्न करावेत, अशी मागणी शेतकर्‍यांतून जोर धरत आहे.

शासनाकडून परवानगीचे प्रयत्न सुरु पाथरी येथे हमीभाव तूर खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी व्यापार्‍यांकडील दोन्ही गोदाम खाली करून घेतले आहेत. शासनाकडे तशी मागणी करण्यात आली आहे. शासनाकडून परवानगी घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. - अनिल नखाते, सभापती, बाजार समिती

अनेक अडचणी येत आहेत दोन्ही तालुक्यासाठी एकच खरेदी केंद्र मानवत येथे असल्याने नाव नोंदणीपासून अडचणी आहेत. तुरीच्या मापातही अडचणी वाढणार असून ही बाब शेतकर्‍यांसाठी बाधक आहे.- माणिक भिसे, व्यवस्थापक खरेदी विक्री संघ

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी