शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

परभणी : पावणे दोनशे पाणीपुरवठा योजना ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:23 AM

जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी पुरवठा करण्यासाठी उभारलेल्या एकूण ७०४ योजनांपैकी तब्बल १८५ योजना तांत्रिक कारणांमुळे बंद असल्याने त्या गावांच्या पाणीटंचाईत भर पडली आहे़ या योजना नेमक्या बंद का? याचा शोध घेऊन योजना सुरू केल्या तर बऱ्याच अंशी पाणीटंचाईचे संकट कमी होण्यास मदत होणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी पुरवठा करण्यासाठी उभारलेल्या एकूण ७०४ योजनांपैकी तब्बल १८५ योजना तांत्रिक कारणांमुळे बंद असल्याने त्या गावांच्या पाणीटंचाईत भर पडली आहे़ या योजना नेमक्या बंद का? याचा शोध घेऊन योजना सुरू केल्या तर बऱ्याच अंशी पाणीटंचाईचे संकट कमी होण्यास मदत होणार आहे़ग्रामीण भागामध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत राष्ट्रीय पेयजल योजना, मुख्यमंत्री पेयजल योजना या नवीन योजनांसह त्यापूर्वी भारत निर्माण, सुजल योजनांच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे़ विविध गावांमध्ये योजनांची निर्मिती झाली असली तरी अनेक पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने काम करीत नाहीत़ किरकोळ तांत्रिक बिघाडांमुळे योजना बंद राहते़ तर काही योजनांची छोटी मोठी कामे शिल्लक असल्याने त्या गावांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो़ यावर्षी जिल्ह्यामध्ये परतीचा पाऊस झाला नसल्याने आॅक्टोबर महिन्यापासूनच पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे़ प्रकल्पांमध्ये पाणीसाठा उपलब्ध नसल्याने त्याचा परिणाम पाणीपुरवठा योजनांवर होत आहे़ परिणामी पाणी पुरवठा योजना बंद पडते़ जिल्ह्यातील किती योजना कार्यान्वित आणि किती बंद आहेत? याची माहिती मिळविली तेव्हा मंजूर असलेल्या एकूण योजनांपैकी तब्बल ३० टक्के योजना बंद असल्याची माहिती समोर आली आहे़ पाणी पुरवठा योजनांवर लाखो रुपयांचा खर्च करून ३० टक्के योजना जर बंद राहत असतील तर निश्चितच टंचाईमध्ये भर पडणार आहे़ नैसर्गिक पाणीटंचाईला कृत्रिम टंचाईची जोड मिळत असल्याने पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर होत आहे़ जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात पाणीपुरवठा केला जातो़ राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत ५०१ पाणीपुरवठा योजना पूर्णत: कार्यान्वित झाल्या असून, त्यापैकी ४८५ योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात आल्या;परंतु, प्रत्यक्षात ७९ योजना सद्यस्थितीला बंद आहेत़ त्यामुळे योजनेचे काम पूर्ण होवूनही ग्रामीण भाग टंचाईच्या विळख्यात सापडला आहे़ लाखो रुपयांचा खर्च करूनही ग्रामपंचायतींना पाण्यासाठी वेगळी व्यवस्था करावी लागत आहे़ जिल्ह्यात एकूण ८०४ गावे असून, त्यापैकी ७०४ गावांमध्ये पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे; परंतु, प्रत्यक्षात १८५ योजनांचा पाणीपुरवठाच बंद असल्याने टंचाईमध्ये भर पडली आहे़ भौतिकदृष्ट्या पूर्ण परंतु, आर्थिकदृष्ट्या अपूर्ण असलेल्या १३५ योजनांपैकी ६५ योजनांचा पाणीपुरवठा ठप्प आहे़ तर कामे प्रगतीपथावर असलेल्या ६८ योजनांपैकी ४१ योजनांच्या माध्यमातून अजूनही पाणीपुरवठा सुरू झाला नाही़ त्यामुळे प्रत्यक्षात कार्यान्वित असलेल्या योजनांच्या तुलनेत पाणीपुरवठा बंद असलेल्या योजनांची संख्या लक्षणीस असल्याने अनेक गावांना कृत्रिम टंचाईलाही सामोरे जावे लागत आहे़२३ नव्या योजनांना मंजुरीमुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये २३ नवीन पाणीपुरवठा योजनांना मंजुरी मिळाली आहे़ त्यापैकी २० योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत़ तर एका योजनेचे अंदाजपत्रक अद्याप तयार नाही आणि एका योजनेचे प्रकरण न्यायालयात असल्याने दोन योजना अद्यापही सुरू झाल्या नाहीत़ चारठाणा येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम जीवन प्राधिकरणामार्फत केले जात आहे़ सद्यस्थितीत मंजूर असलेल्या २३ योजनांपैकी १५ योजनेची कामे प्रत्यक्षात सुरू झाली आहेत़ सात ठिकाणी विहिरींची कामे सुरू असून, त्यातील तीन विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत़ एका योजनेचे पम्पींग मशनरीचे काम सुरू आहे तर एका योजनेचे जलवाहिनी अंथरण्याचे काम सुरू असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागातून प्राप्त झाली़विविध कारणांमुळे योजना पडल्या बंदराज्य शासनाच्या नियमानुसार एखाद्या गावाला पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्यानंतर किमान १५ वर्षे त्या ठिकाणी दुसरी योजना मंजूर होत नाही़ त्यामुळे मंजूर झालेल्या योजनेतून गावाला पाणीपुरवठा होणे क्रमप्राप्त आहे़ जिल्हा परिषदेंतर्गत बंद असलेल्या १८५ पाणीपुरवठा योजनांची विविध कारणे समोर येत आहेत़ त्यात छोटी मोठी कामे रखडणे, उद्भव विहिरींची कामे अपूर्ण असणे, जलस्त्रोतात पाणीसाठा शिल्लक नसणे, वीज बिलाची थकबाकी अशा अनेक कारणांमुळे या योजना बंद असून, या सर्व योजना तांत्रिकदृष्ट्या सुरू केल्या तर अनेक गावांना पाणीपुरवठा होवू शकतो़गंगाखेड तालुक्यात : बंद योजना अधिकजिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत गंगाखेड तालुक्यामध्ये बंद असलेल्या पाणीपुरवठा योजनांची संख्या सर्वाधिक आहे़ या तालुक्यात एकूण १११ पाणीपुरवठा योजना मंजूर आहेत़ त्यात भौतिक आणि आर्थिक दृष्टीकोणातून परिपूर्ण असतानाही २४ पाणीपुरवठा योजना बंद अवस्थेत आहेत़ तर आर्थिकबाबी अपूर्ण असल्याने १७ योजना बंद असल्याची माहिती मिळाली़ जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेमध्ये गंगाखेड तालुक्यामध्ये पाणीपुरवठा योजनांची संख्याही अधिक आहे आणि बंद योजनांची संख्याही अधिक आहे़ या तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, बंद असलेल्या पाणीपुरवठा योजना प्राधान्याने सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे़आगामी वर्षासाठी ८५ योजनाराष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत २०१८-१९ या वर्षासाठी एकूण ८५ पाणीपुरवठा योजनांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे़ त्यामध्ये गंगाखेड तालुक्यात १६, परभणी ९, मानवत ५, सोनपेठ ८, पूर्णा ७, पाथरी ६, जिंतूर १७ आणि सेलू तालुक्यामध्ये १३ गावांत पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली आहे़या योजनांचा आराखडा तयार करणे आणि योजना कार्यान्वित करण्यासाठी सर्वे करण्याच्या कामाचे कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहेत़ या ८५ योजना सुरू झाल्यानंतर बºयाच अंशी पाण्याचा प्रश्न निकाली निघेल़

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईzpजिल्हा परिषद