शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पालम तालुक्याला पाणीटंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 23:59 IST

तालुक्यात मार्च महिना संपताच पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांना कसरत करावी लागत असून पाणी स्त्रोतांचे अधिग्रहण करण्याची मागणी वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): तालुक्यात मार्च महिना संपताच पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांना कसरत करावी लागत असून पाणी स्त्रोतांचे अधिग्रहण करण्याची मागणी वाढली आहे.पालम तालुक्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने नदी-नाले खळखळून वाहिले नाहीत. तसेच डिग्रस बंधाऱ्यातील पाणी जिल्हा प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे डिसेंबर महिन्यातच सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे गोदाकाठच्या गावासह तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. तालुक्यात आतापर्यंत ८ गावात जलस्त्रोताचे अधिग्रहण करून चार टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. मार्च महिना संपत येताच पाणीटंचाईने डोकेवर काढले आहे.दिवसेंदिवस पाणी स्रोत अधिग्रहणाची मागणी वाढू लागली आहे. पंचायत समितीकडे सद्य स्थितीत ४६ पाणी स्तोत्रांचे अधिग्रहण करण्यात यावे, यासाठी ग्रामपंचायतींनी प्रस्ताव दाखल केले आहेत. तर ११ प्रस्ताव यापूर्वीच गंगाखेड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये दाखल करण्यात आले आहेत. ग्रामस्थांना घागरभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असताना उपविभागीय अधिकारी कार्यालयातील झारीतील शुक्राचार्य मात्र अधिग्रहणाच्या प्रस्तावाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. प्रस्ताव दाखल केल्यानंतरही तातडीने अधिग्रहणाच्या मंजुरीचे आदेश दिले जात नाहीत. त्यामुळे सरपंच अडचणीत सापडले आहेत. पंचायत समितीकडे तातडीने प्रस्ताव दाखल करूनही याकडे लक्ष दिले जात नाही. मागील वर्षीही उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे ग्रामस्थांंना पिण्याचे पाणी मिळणे मुश्कील बनले होते. या कामासाठी विलंब करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.दरम्यान, गंगाखेड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कर्मचारी अधिग्रहण प्रस्तावांना मंजुरी देताना टाळाटाळ करीत असल्याने ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे.१० बोअरचे अधिग्रहण४सोनपेठ- तालुक्यात मार्च महिन्याच्या शेवटी अनेक गावात पाणीप्रश्न निर्माण झाला असून दिवसेंदिवस पाणीपातळीत घट होत आहे. त्यामुळे पाणीटंचाई दूर करण्यासाठी तालुक्यात दहा बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे.४यावर्षी परतीच्या पावसाने गुंगारा दिल्याने अनेक गावांतील जलसाठे कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे तालुक्यातील बहुतांश गांवात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे जलस्त्रोतांचे अधिग्रहण करण्यासाठी प्रस्ताव सादर केले होते.४त्यावरून पंचायत समितीने तालुक्यातील शेळगाव येथे ४, उंदरवाडी येथे २, तिवठाणा २, वैतागवाडी १, वंदन १ अशा एकूण १० बोअरवेलचे अधिग्रहण केले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई