शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

परभणी : पालम तालुक्याला पाणीटंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 23:59 IST

तालुक्यात मार्च महिना संपताच पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांना कसरत करावी लागत असून पाणी स्त्रोतांचे अधिग्रहण करण्याची मागणी वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): तालुक्यात मार्च महिना संपताच पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांना कसरत करावी लागत असून पाणी स्त्रोतांचे अधिग्रहण करण्याची मागणी वाढली आहे.पालम तालुक्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने नदी-नाले खळखळून वाहिले नाहीत. तसेच डिग्रस बंधाऱ्यातील पाणी जिल्हा प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे डिसेंबर महिन्यातच सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे गोदाकाठच्या गावासह तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. तालुक्यात आतापर्यंत ८ गावात जलस्त्रोताचे अधिग्रहण करून चार टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. मार्च महिना संपत येताच पाणीटंचाईने डोकेवर काढले आहे.दिवसेंदिवस पाणी स्रोत अधिग्रहणाची मागणी वाढू लागली आहे. पंचायत समितीकडे सद्य स्थितीत ४६ पाणी स्तोत्रांचे अधिग्रहण करण्यात यावे, यासाठी ग्रामपंचायतींनी प्रस्ताव दाखल केले आहेत. तर ११ प्रस्ताव यापूर्वीच गंगाखेड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये दाखल करण्यात आले आहेत. ग्रामस्थांना घागरभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असताना उपविभागीय अधिकारी कार्यालयातील झारीतील शुक्राचार्य मात्र अधिग्रहणाच्या प्रस्तावाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. प्रस्ताव दाखल केल्यानंतरही तातडीने अधिग्रहणाच्या मंजुरीचे आदेश दिले जात नाहीत. त्यामुळे सरपंच अडचणीत सापडले आहेत. पंचायत समितीकडे तातडीने प्रस्ताव दाखल करूनही याकडे लक्ष दिले जात नाही. मागील वर्षीही उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे ग्रामस्थांंना पिण्याचे पाणी मिळणे मुश्कील बनले होते. या कामासाठी विलंब करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.दरम्यान, गंगाखेड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कर्मचारी अधिग्रहण प्रस्तावांना मंजुरी देताना टाळाटाळ करीत असल्याने ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे.१० बोअरचे अधिग्रहण४सोनपेठ- तालुक्यात मार्च महिन्याच्या शेवटी अनेक गावात पाणीप्रश्न निर्माण झाला असून दिवसेंदिवस पाणीपातळीत घट होत आहे. त्यामुळे पाणीटंचाई दूर करण्यासाठी तालुक्यात दहा बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे.४यावर्षी परतीच्या पावसाने गुंगारा दिल्याने अनेक गावांतील जलसाठे कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे तालुक्यातील बहुतांश गांवात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे जलस्त्रोतांचे अधिग्रहण करण्यासाठी प्रस्ताव सादर केले होते.४त्यावरून पंचायत समितीने तालुक्यातील शेळगाव येथे ४, उंदरवाडी येथे २, तिवठाणा २, वैतागवाडी १, वंदन १ अशा एकूण १० बोअरवेलचे अधिग्रहण केले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई