शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

परभणी : शासकीय कार्यालयात पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 01:31 IST

शहरातील नगरपालिका, तहसील कार्यालय, पोलीस ठाणे व पंचायत समिती या प्रमुख शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची तहान भागविण्यासाठी उभारलेले पाणवठे शोभेचे बाहुले ठरत असून, नागरिकांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): शहरातील नगरपालिका, तहसील कार्यालय, पोलीस ठाणे व पंचायत समिती या प्रमुख शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची तहान भागविण्यासाठी उभारलेले पाणवठे शोभेचे बाहुले ठरत असून, नागरिकांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.गंगाखेड तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा फटका तालुकावासियांबरोबरच शासकीय कार्यालयांनाही बसत आहे. तालुक्याचे प्रमुख कार्यालय म्हणून समजल्या जाणाºया तहसील कार्यालयात असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत व हौदामध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणीच नाही. परिणामी कार्यालयात कर्तव्य बजावणाºया कर्मचाऱ्यांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. ग्रामीण व शहरी भागातून मोठ्या प्रमाणात नागरिक कामानिमित्त या कार्यालयात येतात; परंतु, या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी परिसरातील हॉटेल गाठावे लागत आहे. पाणीटंचाईमुळे शहरात नळांना वेळेवर पाणी येत नसल्याने हॉटेलचालक पिण्याच्या पाण्यासाठी आडकाठी आणत असल्याने ५ ते १५ रुपये खर्च करून तहान भागवावी लागत आहे. हीच परिस्थिती पंचायत समिती कार्यालयातही आहे. तालुक्यातील गाव, वाडी तांड्यावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करणाºया या कार्यालयातही पाण्याचा ठणठणाट आहे. पंचायत समिती कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच हजारो रुपये खर्च करून पानवठा तयार करण्यात आला आहे; परंतु, पाण्याअभावी हा पानवठा कोरडा पडला आहे. शहरवासियांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देणाºया नगरपालिकेत सुद्धा पिण्याच्या पाण्याची कुठलीच व्यवस्था नसल्याने कर्मचारी व नागरिकांना परिसरातील हॉटेलमध्ये जाऊन तहान भागवावी लागत आहे. पोलीस ठाणे परिसरात लायन्स क्लबचे तत्कालीन अध्यक्ष विलास जंगले यांनी दहा वर्षापूर्वी स्वखर्चातून बांधलेली पाणपोई पाण्याअभावी बंद पडली आहे. विशेष म्हणजे, शासकीय कार्यालय व परिसरात कुठेही पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तालुक्यात निर्माण झालेली परिस्थिती पाहता विविध योजनांवर कोट्यावधी रुपये खर्च करणाºया प्रशासनाने किमान शासकीय कार्यालयात कर्तव्य बजावणाºया व शासकीय कामांसाठी कार्यालयात येणाºया नागरिकांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीwater scarcityपाणी टंचाईdroughtदुष्काळ