शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
3
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
4
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
5
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
6
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
7
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
8
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
9
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
10
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
11
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
12
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
13
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
14
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
15
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
16
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
17
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
18
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
19
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
20
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी

परभणी : शासकीय कार्यालयात पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 01:31 IST

शहरातील नगरपालिका, तहसील कार्यालय, पोलीस ठाणे व पंचायत समिती या प्रमुख शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची तहान भागविण्यासाठी उभारलेले पाणवठे शोभेचे बाहुले ठरत असून, नागरिकांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): शहरातील नगरपालिका, तहसील कार्यालय, पोलीस ठाणे व पंचायत समिती या प्रमुख शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची तहान भागविण्यासाठी उभारलेले पाणवठे शोभेचे बाहुले ठरत असून, नागरिकांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.गंगाखेड तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा फटका तालुकावासियांबरोबरच शासकीय कार्यालयांनाही बसत आहे. तालुक्याचे प्रमुख कार्यालय म्हणून समजल्या जाणाºया तहसील कार्यालयात असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत व हौदामध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणीच नाही. परिणामी कार्यालयात कर्तव्य बजावणाºया कर्मचाऱ्यांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. ग्रामीण व शहरी भागातून मोठ्या प्रमाणात नागरिक कामानिमित्त या कार्यालयात येतात; परंतु, या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी परिसरातील हॉटेल गाठावे लागत आहे. पाणीटंचाईमुळे शहरात नळांना वेळेवर पाणी येत नसल्याने हॉटेलचालक पिण्याच्या पाण्यासाठी आडकाठी आणत असल्याने ५ ते १५ रुपये खर्च करून तहान भागवावी लागत आहे. हीच परिस्थिती पंचायत समिती कार्यालयातही आहे. तालुक्यातील गाव, वाडी तांड्यावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करणाºया या कार्यालयातही पाण्याचा ठणठणाट आहे. पंचायत समिती कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच हजारो रुपये खर्च करून पानवठा तयार करण्यात आला आहे; परंतु, पाण्याअभावी हा पानवठा कोरडा पडला आहे. शहरवासियांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देणाºया नगरपालिकेत सुद्धा पिण्याच्या पाण्याची कुठलीच व्यवस्था नसल्याने कर्मचारी व नागरिकांना परिसरातील हॉटेलमध्ये जाऊन तहान भागवावी लागत आहे. पोलीस ठाणे परिसरात लायन्स क्लबचे तत्कालीन अध्यक्ष विलास जंगले यांनी दहा वर्षापूर्वी स्वखर्चातून बांधलेली पाणपोई पाण्याअभावी बंद पडली आहे. विशेष म्हणजे, शासकीय कार्यालय व परिसरात कुठेही पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तालुक्यात निर्माण झालेली परिस्थिती पाहता विविध योजनांवर कोट्यावधी रुपये खर्च करणाºया प्रशासनाने किमान शासकीय कार्यालयात कर्तव्य बजावणाºया व शासकीय कामांसाठी कार्यालयात येणाºया नागरिकांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीwater scarcityपाणी टंचाईdroughtदुष्काळ