शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
3
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
4
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
5
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
6
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
7
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
8
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
9
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
10
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
11
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
12
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
13
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
14
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
15
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
16
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
17
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
18
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
19
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
20
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!

परभणी : फळबागाचे पाणी तोडून ग्रामस्थांसाठी केले खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:28 IST

उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने पाण्याचे स्त्रोत आटले आहेत़ यामुळे पाणीटंचाई तीव्र झाली आहे़ या पाणीटंचाईपासून ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी शेक येथील एका शेतकऱ्यांने स्वत:च्या फळबागाचे पाणी तोडून ग्रामस्थांना उपलब्ध करून दिले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कबोरी (परभणी): उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने पाण्याचे स्त्रोत आटले आहेत़ यामुळे पाणीटंचाई तीव्र झाली आहे़ या पाणीटंचाईपासून ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी शेक येथील एका शेतकऱ्यांने स्वत:च्या फळबागाचे पाणी तोडून ग्रामस्थांना उपलब्ध करून दिले आहे़जिंतूर तालुक्यातील शेक येथील सरपंच शेख सुलेमान शेख रहीम यांनी स्वत:च्या केळी फळबागाचे पाणी तोडून गावालगतच्या श्रीरामपूर वस्तीतल्या ग्रामस्थांना मोफत पाण्याचे वाटप सुरू केले आहे़ शेक व श्रीरामपूर ग्रुपग्रामपंचायत असून, या गावाला पाणीपुरवठा करणाºया विहिरीचे पाणी आटल्यामुळे श्रीरामपूर येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती होत होती़ गावातील हातपंप विहिरी आटल्यामुळे पाण्यासाठी ग्रामस्थांना दोन किमीची पायपीट करून शेतातून पाणी आणावे लागत होते़ग्रामस्थांची ही गैरसोय लक्षात घेऊन येथील सरपंच शेख सुलेमान शेख रहीम यांनी स्वत:च्या शेतातील ३ हजार केळीच्या झाडाचे पाणी तोडून ग्रामस्थांना पिण्यासाठी मोफत उपलब्ध करून दिले आहे़यामुळे गावातील पाणीटंचाई निवळण्यास हातभार लागला असून पाण्यासाठी भटकंती करणाºया ग्रामस्थांना अशा कडक उन्हाळ्यामध्ये पाणी उपलब्ध झाल्याने दिलासा मिळाला आहे़ टंचाईग्रस्तांसाठी शेक येथील सरपंच शेख सुलेमान यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचे शेक व परिसरातील ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे़टँकरसाठी दाखल केला प्रस्ताव४शेक ग्रामपंचायतीच्या वतीने गावालगत असलेल्या श्रीरामपूर वस्तीत टँकरने पाणीपुरवठा करावा, असा प्रस्ताव ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच शेख सुलेमान शेख रहीम यांनी जिंतूर तहसीलदाराकडे दिला आहे. हा प्रस्ताव सध्या तरी प्रशासकीय प्रक्रियेत आहे.४प्रस्तावाला मंजुरी मिळून प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू होण्यास बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही बाब लक्षात सद्यस्थितीला गावात पाणीपुरवठा सुरू केला असल्याचे सरपंच शेख सुलेमान यांनी सांगितले. सद्यस्थितीत पाण्याचा प्रश्न काही अंशी शिथील झाला असला तरी टँकरही तातडीने सुरू करावे, अशी मागणी श्रीरामपूर वस्तीतील ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीFarmerशेतकरीdroughtदुष्काळ