शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
3
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
4
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
5
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
6
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
7
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
8
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
9
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
10
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
12
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
13
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
14
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
15
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
16
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
17
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
18
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
19
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
20
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : फळबागाचे पाणी तोडून ग्रामस्थांसाठी केले खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:28 IST

उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने पाण्याचे स्त्रोत आटले आहेत़ यामुळे पाणीटंचाई तीव्र झाली आहे़ या पाणीटंचाईपासून ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी शेक येथील एका शेतकऱ्यांने स्वत:च्या फळबागाचे पाणी तोडून ग्रामस्थांना उपलब्ध करून दिले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कबोरी (परभणी): उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने पाण्याचे स्त्रोत आटले आहेत़ यामुळे पाणीटंचाई तीव्र झाली आहे़ या पाणीटंचाईपासून ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी शेक येथील एका शेतकऱ्यांने स्वत:च्या फळबागाचे पाणी तोडून ग्रामस्थांना उपलब्ध करून दिले आहे़जिंतूर तालुक्यातील शेक येथील सरपंच शेख सुलेमान शेख रहीम यांनी स्वत:च्या केळी फळबागाचे पाणी तोडून गावालगतच्या श्रीरामपूर वस्तीतल्या ग्रामस्थांना मोफत पाण्याचे वाटप सुरू केले आहे़ शेक व श्रीरामपूर ग्रुपग्रामपंचायत असून, या गावाला पाणीपुरवठा करणाºया विहिरीचे पाणी आटल्यामुळे श्रीरामपूर येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती होत होती़ गावातील हातपंप विहिरी आटल्यामुळे पाण्यासाठी ग्रामस्थांना दोन किमीची पायपीट करून शेतातून पाणी आणावे लागत होते़ग्रामस्थांची ही गैरसोय लक्षात घेऊन येथील सरपंच शेख सुलेमान शेख रहीम यांनी स्वत:च्या शेतातील ३ हजार केळीच्या झाडाचे पाणी तोडून ग्रामस्थांना पिण्यासाठी मोफत उपलब्ध करून दिले आहे़यामुळे गावातील पाणीटंचाई निवळण्यास हातभार लागला असून पाण्यासाठी भटकंती करणाºया ग्रामस्थांना अशा कडक उन्हाळ्यामध्ये पाणी उपलब्ध झाल्याने दिलासा मिळाला आहे़ टंचाईग्रस्तांसाठी शेक येथील सरपंच शेख सुलेमान यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचे शेक व परिसरातील ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे़टँकरसाठी दाखल केला प्रस्ताव४शेक ग्रामपंचायतीच्या वतीने गावालगत असलेल्या श्रीरामपूर वस्तीत टँकरने पाणीपुरवठा करावा, असा प्रस्ताव ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच शेख सुलेमान शेख रहीम यांनी जिंतूर तहसीलदाराकडे दिला आहे. हा प्रस्ताव सध्या तरी प्रशासकीय प्रक्रियेत आहे.४प्रस्तावाला मंजुरी मिळून प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू होण्यास बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही बाब लक्षात सद्यस्थितीला गावात पाणीपुरवठा सुरू केला असल्याचे सरपंच शेख सुलेमान यांनी सांगितले. सद्यस्थितीत पाण्याचा प्रश्न काही अंशी शिथील झाला असला तरी टँकरही तातडीने सुरू करावे, अशी मागणी श्रीरामपूर वस्तीतील ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीFarmerशेतकरीdroughtदुष्काळ