शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

परभणी: गोदापात्रातच शोधावं लागतंय पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 00:10 IST

तालुक्यात एरव्ही पावसाळ्यात काठोकाठ भरून वाहनारी गोदावरी नदी यावर्षी मात्र कोरडीठाक पडली आहे. त्यामुळे गोदाकाठच्या गावांची बकाल अवस्था झाली असून जनावरे व चारा पिके जगविण्यासाठी गोदापात्रातच खड्डे खोदून पाणी शोधण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): तालुक्यात एरव्ही पावसाळ्यात काठोकाठ भरून वाहनारी गोदावरी नदी यावर्षी मात्र कोरडीठाक पडली आहे. त्यामुळे गोदाकाठच्या गावांची बकाल अवस्था झाली असून जनावरे व चारा पिके जगविण्यासाठी गोदापात्रातच खड्डे खोदून पाणी शोधण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.पालम तालुक्यातून गोदावरी नदी वाहते. याच नदीवर तालुक्यातील डिग्रस येथे बंधारा बांधण्यात आला आहे. आठ महिने या बंधाºयात काठोकाठ तुडूंब पाणी भरलेले पहावयास मिळते; परंतु, यावर्षी जिल्हा प्रशासनाच्या कचखाऊ भूमिकेमुळे डिसेंबर महिन्यातच नांदेडला पाणी सोडून देण्यात आले. त्यामुळे गोदावरीच्या पात्रात केवळ गाळच शिल्लक राहिल्याने जेमतेम पंधरा दिवस पाणी कसेबसे शिल्लक होते. जानेवारी महिना उजाडताच गोदावरी नदीच्या पात्रातील पूर्णत: आटत गेल्याने गोदावरीचे वाळवंट झाले आहे. गोदाकाठच्या गावांना नदी असूनही पिण्यासाठी शेतशिवारातील पाणी स्त्रोतांचा आधार घ्यावा लागत आहे. गोदावरीच्या पात्रात लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी पाईपलाईन टाकलेली आहे. पाण्याअभावी या पाईपलाईन बंद पडलेल्या आहेत.शेतातील गोठ्यात बांधलेल्या जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी व जनावरांसाठी थोड्याफार प्रमाणात हिरवा चारा मिळावा, याकरीता शेतकºयांनी जागोजागी गोदावरी नदीच्या पात्रात मोठमोठे खड्डे पाडलेले आहेत. २४ तासांत या खड्यांना तासभर मोटार चालतील एवढे पाणी येत आहे. रात्रंदिवस जागून या खड्यातून पाणी शेतापर्यंत नेण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.डिग्रसचे पाणी लवकर सोडून देण्यात आल्याने गोदावरीचे पात्र पूर्णत: वाळवंट झालेले आहे. परिणामी गोदाकाठ भागात दुष्काळाची दाहकता वाढत असून शेतकºयांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.जिल्हा प्रशासन : बघ्याची भूमिका४पालम तालुक्यातील बहुतांश गावे ही गोदाकाठावर आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील ८ ही तालुक्यांना उन्हाळ्यांमध्ये तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो; परंतु, गोदाकाठावर असलेल्या पालम तालुक्यातील गावांना मात्र दुष्काळाची साधी जाणीवही होत नाही. मात्र यावर्षी पालम तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमान राहिले. त्यामुळे गोदावरी नदीकाठावरील गावे डिग्रस बंधाºयातील पाण्याकडे अपेक्षेने पाहत होते.४या बंधाºयात गतवर्षीच्या पावसाळामुळे मूबलक पाणीसाठा होता. त्यामुळे यावर्षीही आपल्याला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार नाही, असे स्वप्न उराशी बाळगून डिग्रस बंधाºयाच्या लाभक्षेत्रातील शेतकरी, ग्रामस्थ होते; परंतु, जिल्हा प्रशासनाने ग्रामस्थांच्या आशेवर पाणी फेरत डिसेंबर महिन्यातच नांदेडला पाणी सोडून हा बंधारा खाली केला. कोणताही विचार, विरोध न करता पाणी सोङण्याचा सोपस्कार पाटबंधारे विभागाने पार पाडला.४ शेतकºयांचा व लाभक्षेत्रातील ग्रामस्थांचा विरोध असतानाही जिल्हा प्रशासनाने केवळ बघ्याची भूमिका घेतली. जिल्हा प्रशासनाच्या या भूमिकेमुळेच गोदा नदीकाठावरील व डिग्रस बंधाºयाच्या लाभक्षेत्रातील ग्रामस्थांनाही नदीपात्रातच पाणी शोधावे लागत असल्याची वेळ आली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळWaterपाणीriverनदी