शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; ९ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी
2
दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच!
3
दिल्ली लाल किल्ला कार स्फोटानंतर हाफिज सईदचं 'लोकेशन' चर्चेत; कुठे लपून बसलाय?
4
Warren Buffett News: “मी आता शांत होत चाललोय,” ६ दशकांची परंपरा थांबणार; वॅारन बफेंनी सोडलं ‘हे’ काम
5
Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी
6
Vastu Tips: बुधवारी लावलेली 'ही' रोपं ठरतात लक्ष्मीप्राप्तीचा आणि अपयशातून मुक्तीचा राजमार्ग!
7
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
8
दिल्ली ब्लास्ट: 'माझ्याजवळ शरिराचा तुकडा पडला; रात्रभर झोप लागली नाही', प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
9
Shreyas Iyer Injury Update: अय्यरबाबत जोखीम नको! वनडे मालिकेपूर्वी तब्येतीसंदर्भात मोठा खुलासा
10
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
11
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
12
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
13
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
14
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
15
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
16
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
17
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
18
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
19
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
20
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?

परभणी: गोदापात्रातच शोधावं लागतंय पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 00:10 IST

तालुक्यात एरव्ही पावसाळ्यात काठोकाठ भरून वाहनारी गोदावरी नदी यावर्षी मात्र कोरडीठाक पडली आहे. त्यामुळे गोदाकाठच्या गावांची बकाल अवस्था झाली असून जनावरे व चारा पिके जगविण्यासाठी गोदापात्रातच खड्डे खोदून पाणी शोधण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): तालुक्यात एरव्ही पावसाळ्यात काठोकाठ भरून वाहनारी गोदावरी नदी यावर्षी मात्र कोरडीठाक पडली आहे. त्यामुळे गोदाकाठच्या गावांची बकाल अवस्था झाली असून जनावरे व चारा पिके जगविण्यासाठी गोदापात्रातच खड्डे खोदून पाणी शोधण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.पालम तालुक्यातून गोदावरी नदी वाहते. याच नदीवर तालुक्यातील डिग्रस येथे बंधारा बांधण्यात आला आहे. आठ महिने या बंधाºयात काठोकाठ तुडूंब पाणी भरलेले पहावयास मिळते; परंतु, यावर्षी जिल्हा प्रशासनाच्या कचखाऊ भूमिकेमुळे डिसेंबर महिन्यातच नांदेडला पाणी सोडून देण्यात आले. त्यामुळे गोदावरीच्या पात्रात केवळ गाळच शिल्लक राहिल्याने जेमतेम पंधरा दिवस पाणी कसेबसे शिल्लक होते. जानेवारी महिना उजाडताच गोदावरी नदीच्या पात्रातील पूर्णत: आटत गेल्याने गोदावरीचे वाळवंट झाले आहे. गोदाकाठच्या गावांना नदी असूनही पिण्यासाठी शेतशिवारातील पाणी स्त्रोतांचा आधार घ्यावा लागत आहे. गोदावरीच्या पात्रात लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी पाईपलाईन टाकलेली आहे. पाण्याअभावी या पाईपलाईन बंद पडलेल्या आहेत.शेतातील गोठ्यात बांधलेल्या जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी व जनावरांसाठी थोड्याफार प्रमाणात हिरवा चारा मिळावा, याकरीता शेतकºयांनी जागोजागी गोदावरी नदीच्या पात्रात मोठमोठे खड्डे पाडलेले आहेत. २४ तासांत या खड्यांना तासभर मोटार चालतील एवढे पाणी येत आहे. रात्रंदिवस जागून या खड्यातून पाणी शेतापर्यंत नेण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.डिग्रसचे पाणी लवकर सोडून देण्यात आल्याने गोदावरीचे पात्र पूर्णत: वाळवंट झालेले आहे. परिणामी गोदाकाठ भागात दुष्काळाची दाहकता वाढत असून शेतकºयांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.जिल्हा प्रशासन : बघ्याची भूमिका४पालम तालुक्यातील बहुतांश गावे ही गोदाकाठावर आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील ८ ही तालुक्यांना उन्हाळ्यांमध्ये तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो; परंतु, गोदाकाठावर असलेल्या पालम तालुक्यातील गावांना मात्र दुष्काळाची साधी जाणीवही होत नाही. मात्र यावर्षी पालम तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमान राहिले. त्यामुळे गोदावरी नदीकाठावरील गावे डिग्रस बंधाºयातील पाण्याकडे अपेक्षेने पाहत होते.४या बंधाºयात गतवर्षीच्या पावसाळामुळे मूबलक पाणीसाठा होता. त्यामुळे यावर्षीही आपल्याला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार नाही, असे स्वप्न उराशी बाळगून डिग्रस बंधाºयाच्या लाभक्षेत्रातील शेतकरी, ग्रामस्थ होते; परंतु, जिल्हा प्रशासनाने ग्रामस्थांच्या आशेवर पाणी फेरत डिसेंबर महिन्यातच नांदेडला पाणी सोडून हा बंधारा खाली केला. कोणताही विचार, विरोध न करता पाणी सोङण्याचा सोपस्कार पाटबंधारे विभागाने पार पाडला.४ शेतकºयांचा व लाभक्षेत्रातील ग्रामस्थांचा विरोध असतानाही जिल्हा प्रशासनाने केवळ बघ्याची भूमिका घेतली. जिल्हा प्रशासनाच्या या भूमिकेमुळेच गोदा नदीकाठावरील व डिग्रस बंधाºयाच्या लाभक्षेत्रातील ग्रामस्थांनाही नदीपात्रातच पाणी शोधावे लागत असल्याची वेळ आली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळWaterपाणीriverनदी