शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

परभणी:५ वर्षांपासून कृषीपंपधारक वीज जोडणीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 00:29 IST

महावितरण आपल्या दारी या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना पाच वर्षांपासून केवळ जोडणीला मंजुरी मिळाली; परंतु, साहित्य मिळाले नसल्याने शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या रखडल्या आहेत़ या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना, उच्चदाब प्रणाली योजना अंमलात आणली़ परंतु, अद्यापही जवळपास ८ हजार लाभार्थी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महावितरण आपल्या दारी या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना पाच वर्षांपासून केवळ जोडणीला मंजुरी मिळाली; परंतु, साहित्य मिळाले नसल्याने शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या रखडल्या आहेत़ या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना, उच्चदाब प्रणाली योजना अंमलात आणली़ परंतु, अद्यापही जवळपास ८ हजार लाभार्थी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे़प्रत्येक शेतकºयाला कृषीपंपासाठी वीजपुरवठा मिळावा, या उदात्त हेतुने २०१२ मध्ये महावितरण आपल्या दारी ही योजना वीज वितरण कंपनीकडून राबविण्यात आली़ महावितरणच्या १० उपविभागांतर्गत जिल्ह्यातील शेतकºयांनी वीज जोडणीसाठी अर्ज करताच त्यांचा अर्ज मंजूर करून वीज जोडणी देण्याचे काम महावितरणने केले होते. प्रत्यक्षात केवळ कोटेशन भरण्यात आले आणि जोडणी देताना मात्र मुख्य वाहिनीपासून शेतकºयांच्या शेतापर्यंत खांब टाकणे, तारा ओढणे ही कामे करण्यासाठी महावितरणच्या अधिकाºयांनी उदासिनता दाखविली़ या योजनेत सहभागी शेतकºयांनी मुख्य खांबापासून आपल्या कृषीपंपापर्यंत लागणाºया केबलचा खर्च स्वत: उचलून तात्पुरती वीज जोडणी घेतली आहे़परभणी जिल्ह्यात ४ वर्षामध्ये ८ हजार ३७३ शेतकºयांनी महावितरण आपल्या दारी या योजनेंतर्गत कृषीपंपासाठी वीज मिळावी म्हणून अर्ज केले होते़ या सर्व शेतकºयांचे अर्ज मंजूर करून प्रती शेतकरी अंदाजे ५ ते ६ हजार रुपयांचे कोटेशन भरून घेतले होते़त्यामुळे या योजनेतून साधारणत: ५ कोटी रुपयांचा निधी महावितरणच्या खात्यावर जमा झाला़ मात्र वीज जोडणी घेण्यासाठी शेतकºयांना कोणतेही साहित्य न दिल्यामुळे मागील पाच वर्षापासून कृषीपंप धारकांना वीज जोडणी मिळाली नाही़ त्यामुळे लाभार्थी शेतकºयांमधून महावितरणच्या कारभाराविरूद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे़इतर योजनेतून लाभ दिल्याचा कांगावाच्महावितरण आपल्या दारी या योजनेंतर्गत परभणी शहर वगळता १० उपविभागांतर्गत ८ हजार ३७३ कृषीपंप धारकांनी या योजनेत सहभाग घेतला होता़ यामध्ये गंगाखेड उपविभागांतर्गत ८०८, पूर्णा ५३७, परभणी ग्रामीण ६५२, पाथरी १७१६, सेलू १६०५, जिंतूर १५८३, सोनपेठ ५१३, पालम ५४६ आणि मानवत उपविभागांतर्गत ४११ लाभार्थी शेतकºयांनी या योजनेत प्रस्ताव दाखल केले होते़च्पाच वर्षानंतर वीज वितरण कंपनीने या शेतकºयांना कोणतेही साहित्य दिले नाही़ उलट हे लाभार्थी शेतकरी पाच वर्षापासून महावितरणकडे साहित्य मिळावे यासाठी खेटे मारत आहेत़ मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना व उच्चदाब प्रणाली योजना अंमलात आणली आहे़च्या योजनेतून महावितरण आपल्या दारीमधील लाभार्थ्यांना लाभ दिला जात असल्याचे अधिकाºयांचे म्हणणे आहे़ परंतु, या योजनेत लाभ घेण्यासाठी पुन्हा आर्थिक भुर्दंड या शेतकºयांना सहन करावा लागत आहे़ त्यामुळे महावितरण आपल्या दारी योजनेतील शेतकºयांनी या दोन्ही योजनेकडे पाठ फिरविल्याचेच दिसून येत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरणFarmerशेतकरी