शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

परभणी:५ वर्षांपासून कृषीपंपधारक वीज जोडणीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 00:29 IST

महावितरण आपल्या दारी या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना पाच वर्षांपासून केवळ जोडणीला मंजुरी मिळाली; परंतु, साहित्य मिळाले नसल्याने शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या रखडल्या आहेत़ या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना, उच्चदाब प्रणाली योजना अंमलात आणली़ परंतु, अद्यापही जवळपास ८ हजार लाभार्थी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महावितरण आपल्या दारी या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना पाच वर्षांपासून केवळ जोडणीला मंजुरी मिळाली; परंतु, साहित्य मिळाले नसल्याने शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या रखडल्या आहेत़ या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना, उच्चदाब प्रणाली योजना अंमलात आणली़ परंतु, अद्यापही जवळपास ८ हजार लाभार्थी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे़प्रत्येक शेतकºयाला कृषीपंपासाठी वीजपुरवठा मिळावा, या उदात्त हेतुने २०१२ मध्ये महावितरण आपल्या दारी ही योजना वीज वितरण कंपनीकडून राबविण्यात आली़ महावितरणच्या १० उपविभागांतर्गत जिल्ह्यातील शेतकºयांनी वीज जोडणीसाठी अर्ज करताच त्यांचा अर्ज मंजूर करून वीज जोडणी देण्याचे काम महावितरणने केले होते. प्रत्यक्षात केवळ कोटेशन भरण्यात आले आणि जोडणी देताना मात्र मुख्य वाहिनीपासून शेतकºयांच्या शेतापर्यंत खांब टाकणे, तारा ओढणे ही कामे करण्यासाठी महावितरणच्या अधिकाºयांनी उदासिनता दाखविली़ या योजनेत सहभागी शेतकºयांनी मुख्य खांबापासून आपल्या कृषीपंपापर्यंत लागणाºया केबलचा खर्च स्वत: उचलून तात्पुरती वीज जोडणी घेतली आहे़परभणी जिल्ह्यात ४ वर्षामध्ये ८ हजार ३७३ शेतकºयांनी महावितरण आपल्या दारी या योजनेंतर्गत कृषीपंपासाठी वीज मिळावी म्हणून अर्ज केले होते़ या सर्व शेतकºयांचे अर्ज मंजूर करून प्रती शेतकरी अंदाजे ५ ते ६ हजार रुपयांचे कोटेशन भरून घेतले होते़त्यामुळे या योजनेतून साधारणत: ५ कोटी रुपयांचा निधी महावितरणच्या खात्यावर जमा झाला़ मात्र वीज जोडणी घेण्यासाठी शेतकºयांना कोणतेही साहित्य न दिल्यामुळे मागील पाच वर्षापासून कृषीपंप धारकांना वीज जोडणी मिळाली नाही़ त्यामुळे लाभार्थी शेतकºयांमधून महावितरणच्या कारभाराविरूद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे़इतर योजनेतून लाभ दिल्याचा कांगावाच्महावितरण आपल्या दारी या योजनेंतर्गत परभणी शहर वगळता १० उपविभागांतर्गत ८ हजार ३७३ कृषीपंप धारकांनी या योजनेत सहभाग घेतला होता़ यामध्ये गंगाखेड उपविभागांतर्गत ८०८, पूर्णा ५३७, परभणी ग्रामीण ६५२, पाथरी १७१६, सेलू १६०५, जिंतूर १५८३, सोनपेठ ५१३, पालम ५४६ आणि मानवत उपविभागांतर्गत ४११ लाभार्थी शेतकºयांनी या योजनेत प्रस्ताव दाखल केले होते़च्पाच वर्षानंतर वीज वितरण कंपनीने या शेतकºयांना कोणतेही साहित्य दिले नाही़ उलट हे लाभार्थी शेतकरी पाच वर्षापासून महावितरणकडे साहित्य मिळावे यासाठी खेटे मारत आहेत़ मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना व उच्चदाब प्रणाली योजना अंमलात आणली आहे़च्या योजनेतून महावितरण आपल्या दारीमधील लाभार्थ्यांना लाभ दिला जात असल्याचे अधिकाºयांचे म्हणणे आहे़ परंतु, या योजनेत लाभ घेण्यासाठी पुन्हा आर्थिक भुर्दंड या शेतकºयांना सहन करावा लागत आहे़ त्यामुळे महावितरण आपल्या दारी योजनेतील शेतकºयांनी या दोन्ही योजनेकडे पाठ फिरविल्याचेच दिसून येत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरणFarmerशेतकरी