शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
2
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
3
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
4
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
5
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
6
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
7
Video - दारूने भरलेले ग्लास, तळलेले शेंगदाणे... बंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांची जंगी पार्टी
8
सत्य साईबाबा: चमत्कारी जीवन, भक्तांमध्ये दिग्गज सेलिब्रेटी, आजही जगभर अनुयायी; काय होते वैशिष्ट्य?
9
भारतात लाँच होणार लठ्ठपणावरचं नवं औषध, कंपनीचा शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
10
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
11
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
12
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हटवलं
13
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
14
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
15
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
16
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
17
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
18
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
20
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला

परभणी:५ वर्षांपासून कृषीपंपधारक वीज जोडणीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 00:29 IST

महावितरण आपल्या दारी या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना पाच वर्षांपासून केवळ जोडणीला मंजुरी मिळाली; परंतु, साहित्य मिळाले नसल्याने शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या रखडल्या आहेत़ या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना, उच्चदाब प्रणाली योजना अंमलात आणली़ परंतु, अद्यापही जवळपास ८ हजार लाभार्थी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महावितरण आपल्या दारी या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना पाच वर्षांपासून केवळ जोडणीला मंजुरी मिळाली; परंतु, साहित्य मिळाले नसल्याने शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या रखडल्या आहेत़ या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना, उच्चदाब प्रणाली योजना अंमलात आणली़ परंतु, अद्यापही जवळपास ८ हजार लाभार्थी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे़प्रत्येक शेतकºयाला कृषीपंपासाठी वीजपुरवठा मिळावा, या उदात्त हेतुने २०१२ मध्ये महावितरण आपल्या दारी ही योजना वीज वितरण कंपनीकडून राबविण्यात आली़ महावितरणच्या १० उपविभागांतर्गत जिल्ह्यातील शेतकºयांनी वीज जोडणीसाठी अर्ज करताच त्यांचा अर्ज मंजूर करून वीज जोडणी देण्याचे काम महावितरणने केले होते. प्रत्यक्षात केवळ कोटेशन भरण्यात आले आणि जोडणी देताना मात्र मुख्य वाहिनीपासून शेतकºयांच्या शेतापर्यंत खांब टाकणे, तारा ओढणे ही कामे करण्यासाठी महावितरणच्या अधिकाºयांनी उदासिनता दाखविली़ या योजनेत सहभागी शेतकºयांनी मुख्य खांबापासून आपल्या कृषीपंपापर्यंत लागणाºया केबलचा खर्च स्वत: उचलून तात्पुरती वीज जोडणी घेतली आहे़परभणी जिल्ह्यात ४ वर्षामध्ये ८ हजार ३७३ शेतकºयांनी महावितरण आपल्या दारी या योजनेंतर्गत कृषीपंपासाठी वीज मिळावी म्हणून अर्ज केले होते़ या सर्व शेतकºयांचे अर्ज मंजूर करून प्रती शेतकरी अंदाजे ५ ते ६ हजार रुपयांचे कोटेशन भरून घेतले होते़त्यामुळे या योजनेतून साधारणत: ५ कोटी रुपयांचा निधी महावितरणच्या खात्यावर जमा झाला़ मात्र वीज जोडणी घेण्यासाठी शेतकºयांना कोणतेही साहित्य न दिल्यामुळे मागील पाच वर्षापासून कृषीपंप धारकांना वीज जोडणी मिळाली नाही़ त्यामुळे लाभार्थी शेतकºयांमधून महावितरणच्या कारभाराविरूद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे़इतर योजनेतून लाभ दिल्याचा कांगावाच्महावितरण आपल्या दारी या योजनेंतर्गत परभणी शहर वगळता १० उपविभागांतर्गत ८ हजार ३७३ कृषीपंप धारकांनी या योजनेत सहभाग घेतला होता़ यामध्ये गंगाखेड उपविभागांतर्गत ८०८, पूर्णा ५३७, परभणी ग्रामीण ६५२, पाथरी १७१६, सेलू १६०५, जिंतूर १५८३, सोनपेठ ५१३, पालम ५४६ आणि मानवत उपविभागांतर्गत ४११ लाभार्थी शेतकºयांनी या योजनेत प्रस्ताव दाखल केले होते़च्पाच वर्षानंतर वीज वितरण कंपनीने या शेतकºयांना कोणतेही साहित्य दिले नाही़ उलट हे लाभार्थी शेतकरी पाच वर्षापासून महावितरणकडे साहित्य मिळावे यासाठी खेटे मारत आहेत़ मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना व उच्चदाब प्रणाली योजना अंमलात आणली आहे़च्या योजनेतून महावितरण आपल्या दारीमधील लाभार्थ्यांना लाभ दिला जात असल्याचे अधिकाºयांचे म्हणणे आहे़ परंतु, या योजनेत लाभ घेण्यासाठी पुन्हा आर्थिक भुर्दंड या शेतकºयांना सहन करावा लागत आहे़ त्यामुळे महावितरण आपल्या दारी योजनेतील शेतकºयांनी या दोन्ही योजनेकडे पाठ फिरविल्याचेच दिसून येत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरणFarmerशेतकरी