शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
3
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
4
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
5
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
6
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
7
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
8
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
9
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
10
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
11
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
12
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
13
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
14
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
15
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
16
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
17
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
18
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
19
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
20
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."

परभणी : भाजीपाल्याचे भाव गडगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 00:21 IST

दोन महिन्यांपासून गगनाला भिडलेले भाजीपाल्याचे भाव मागील आठवड्यात अचानक कोसळल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, निम्म्यापेक्षाही कमी दर झाल्याने आता पुन्हा स्वयंपाकात भाज्यांचे प्रमाण वाढणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दोन महिन्यांपासून गगनाला भिडलेले भाजीपाल्याचे भाव मागील आठवड्यात अचानक कोसळल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, निम्म्यापेक्षाही कमी दर झाल्याने आता पुन्हा स्वयंपाकात भाज्यांचे प्रमाण वाढणार आहे.यावर्षी जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्याने खरीप आणि रब्बी हंगाम हातचा गेला होता. परिणामी आॅक्टोबर महिन्यापासून रिकाम्या असलेल्या शेतकऱ्यांनी भाजीपाला घेण्याचा प्रयोग केला. वांगे, फुलकोबी, भेंडी, टोमॅटो, मिरची आदी दैनंदिन आहारात लागणारा भाजीपाला घेऊन उत्पन्न मिळण्याचा प्रयत्न काही शेतकऱ्यांनी केला. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये या भाजीपाल्यामधून शेतकºयांना बºयापैकी उत्पन्नही मिळाले; परंतु, जानेवारी महिन्यापासून मात्र परिस्थिती बदलत गेली. भाजीपाल्यासाठीही पाणी मिळेनासे झाले. परिणामी भाजीपाल्याच्या उत्पन्नातही मोठी घट झाली होती.शेत जमिनीतून उत्पादित होणाºया भाजीपाल्यात घट झाल्याने शहरी भागातील बाजारपेठेतही आवक घटली आणि भाज्यांचे भाव कडाडले. वांगे ६० ते ८० रुपये किलो, कोबी, भेंडी, गवार ८० रुपये किलो प्रमाणे विक्री झाली. तर सिमला मिरची १०० रुपये किलो आणि गावरान मिरची १०० रुपये किलो प्रमाणे विक्री झाले. पालेभाज्यांचेही भाव वाढले होते. तसेच टोमॅटो, भेंडी, काकडीचे दरही कडाडल्याने मागील तीन ते चार महिन्यांपासून भाजी खरेदी करताना सामान्यांच्या खिशाला झळ पोहचत होती. त्यामुळे अनेकांनी भाज्या वर्ज्य केल्या होत्या. दुपार आणि रात्रीच्या जेवणात भाजीचा वापर करणाºयांनी एकाच वेळी भाजीचा वापर करणे सुरु केले होते. भाज्यांचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त होते.दोन दिवसांपासून भाजीपाल्याच्या भावात घट झाली आहे. विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून बाजारपेठेत भाजीपाल्यांची घटलेली आवक सोमवारी मात्र वाढल्याचे दिसून आले. एरव्ही एकाच गाड्यावर अनेक भाज्या विक्री होत असत; परंतु, आवक वाढल्यामुळे एक-एक भाजी घेऊनही गाड्यावरुन विक्री होत असल्याचे पहावयास मिळाले.सोमवारी परभणी बाजारपेठेतील भाज्यांचे दर चांगलेच घटले होते. मिरची ५० रुपये किलो, वांगे ३० रुपये किलो, टोमॅटो ६० रुपये किलो, कोबी ५० रुपये किलो, फुलकोबी ८० रुपये किलो या दराने विक्री झाली. निम्म्यानेच भाजीपाल्याचे भाव घटल्याचे दिसून आले. दोन ते तीन महिन्यानंतर परभणी बाजारपेठेतील भाजीपाल्याचे भाव घटल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.दुष्काळाचा परिणाम : बोरीच्या आठवडी बाजारातही खरेदीदार फिरकेनात४दीड महिन्यांपासून बोरी व परिसरात पावसाने दांडी मारल्यामुळे आठवडी बाजारात येणाºया बाजारकरूंची गर्दी कमी होऊ लागली आहे. यामुळे तीन आठवड्यापासून भाजीपाल्यांचे भाव अर्ध्यावर आले आहेत. २०० रुपये किलो विकणारी कोथंबीर आज ५० रुपये किलो दराने विकली, ६० रुपये किलो दराने विकणारे वांगे २० रुपये किलो दराने विक्री झाले. ६० रुपये किलो दराने विक्री होणारी काकडी ३० रुपये किलो दराने विक्री झाली.४ १०० रुपये किलो दराने विक्री होणारी मेथी ६० रुपये किलो दराने, ६० रुपये किलो दराचे कारले ३० रुपये, ६० रुपये दराने विक्री होणारे टोमॅटो ३० रुपये किलो दराने विक्री झाले. त्याचप्रमाणे ६० रुपये किलो दराने विकणारी भेंडी ३० रुपये किलो दराने विक्री झाली. ३० रुपये किलो दराने विक्री होणारी चवळी २० रुपये किलोने विक्री झाली. ४० रुपये किलोने विकणारी गवार ३० रुपये किलोने विक्री झाली.४तसेच पालक भाजी दहा रुपये, शेपूची भाजी १० रुपये या दराने विक्री झाली. तीन आठवड्यांपूर्वी भाजीपाल्यांचे भाव गगनाला भिडले होते. दीड महिन्यापासून पाऊस नसल्यामुळे बाजारात येणाºया बाजारकरूंची गर्दी कमी झाली आहे. आज भाजीपाल्यांचे भाव अर्ध्या किमतीवर आले आहेत.४ दुष्काळी परिस्थितीमुळे मजुरांच्या हाताला काम नाही काम नाही. परिणामी मजुरांकडे पैसा शिल्लक नाही. याचा परिणाम आठवडी बाजारावर झाला आहे. मोठ्या मेहनतीने पिकवलेला भाजीपाला कवडीमोड भावाने विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. तीन आठवड्यांपूर्वी भाजीपाल्यांचे भाव गगनाला भिडले होते. आगामी दोन आठवडे पाऊस न झाल्यास भाजीपाल्याचे भाव पुन्हा वाढतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.कोथिंबिरीचे दर दोनशेवरुन ८० रुपये किलोवर४जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा परिणाम भाजीपाल्याच्या दरावर झाला होता. आवक घटल्यामुळे सर्वच भाजीपाला महागला; परंतु, त्यातही कोथंबीरचे दर मात्र चांगलेच कडाडले होते. प्रत्यक्ष भाजीसाठी आवश्यक असणारी कोथंबीर २०० रुपये किलो दराने विक्री झाली होती.४किरकोळ बाजारात १५ रुपये छटाक या दराने कोथंबीरची विक्री झाली. सोमवारी मात्र हीच कोथंबीर ८० रुपये किलो दराने विक्री झाली. त्यामुळे अनेक दिवसानंतर सर्वसामान्य नागरिकांच्या हिशोबात भाजीपाल्याचे दर आले आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीvegetableभाज्याRainपाऊसdroughtदुष्काळ