शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

परभणी : ४८ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:19 IST

पैठण तालुक्यातील जायकवाडी प्रकल्पातून परभणी जिल्ह्यातील ४८ हजार ५०० हेक्टर जमीन यावर्षी सिंचनाखाली आली आहे़ विशेष म्हणजे या पाण्यामुळे रबी आणि उन्हाळी हंगामातील पिकांना लाभ झाला असून, सिंचनामुळे बागायती क्षेत्रही वाढले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पैठण तालुक्यातील जायकवाडी प्रकल्पातून परभणी जिल्ह्यातील ४८ हजार ५०० हेक्टर जमीन यावर्षी सिंचनाखाली आली आहे़ विशेष म्हणजे या पाण्यामुळे रबी आणि उन्हाळी हंगामातील पिकांना लाभ झाला असून, सिंचनामुळे बागायती क्षेत्रही वाढले आहे़परभणी जिल्ह्यातील आर्थिक उलाढाली कृषी हंगामावर अवलंबून आहेत़ जिल्ह्यात खरीप आणि रबी या दोन हंगामात पिके घेतली जातात़ खरीप हंगामातील पिके मोसमी पावसावर अवलंबून असतात तर रबी हंगामातील पिकांना जायकवाडी प्रकल्पाच्या पाण्यावर सिंचनाच्या सुविधा उपलब्ध होतात़ जायकवाडी प्रकल्पाचा डावा आणि उजवा कालवा परभणी जिल्ह्यातून प्रवाही झाला आहे़ पाथरी तालुक्यातील वरखेड येथून डाव्या कालव्याला सुरुवात होते़ पाथरी, मानवत, परभणी, पूर्णा या चार तालुक्यांमध्ये डाव्या कालव्यातून सिंचनासाठी पाणी मिळते़ तर सोनपेठ, गंगाखेड या तालुक्यांना उजव्या कालव्यातून जायकवाडीचे पाणी उपलब्ध होते़ जायकवाडी प्रकल्प हा परभणी जिल्ह्यासाठी वरदान ठरला आहे़ जिल्ह्यातील रबी हंगामातील पिकांसाठी हमखास जायकवाडी प्रकल्पातून पाणी घेतले जात़े़ मात्र मागील सहा वर्षांपासून पावसाचा अनियमितपणा असल्याने जायकवाडी प्रकल्प पाण्याने पूर्ण क्षमतेने भरला नव्हता़ परिणामी परभणी जिल्ह्यातील रबी हंगामात धोक्यात आला होता़ ५ ते ६ वर्षांपर्यंत जिल्ह्याला पाणी मिळाले नाही़मागील वर्षी परभणी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ३१ टक्के पाऊस कमी झाला असला तरी जायकवाडी प्रकल्प मात्र १०० टक्के भरला़ त्यामुळे परभणी जिल्ह्याला या प्रकल्पाचा लाभ मिळाला आहे़ जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या वितरिका, उपवितरिका आणि चाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील पिकांना पाणी उपलब्ध होते़ यावर्षी प्रकल्पात पाणीसाठा झाल्याने कालव्यांना आठ पाणी पाळ्या द्याव्यात, अशी मागणी जोर धरत होती़ या मागणीनुसार पाणी पाळयांचे नियोजन करण्यात आले़ रबी हंगामामध्ये ४ पाणी पाळया देण्यात आल्या आणि त्याचा फायदा रबीच्या पिकांना झाला आहे़ जायकवाडी प्रकल्पाच्या पाण्यावर ४८ हजार ५०० हेक्टर जमिनीवर सिंचन झाल्याची माहिती लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर यांनी दिली़ विशेष म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी १० हजार हेक्टर सिंचन वाढविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले़ रबी हंगामासाठी प्रथमच पूर्ण क्षमतेने जायकवाडी प्रकल्पाचे पाणी मिळाल्यामुळे जिल्ह्यातील गहू, हरभरा़, ज्वारी, कापूस या पिकांना लाभ झाला़ जायकवाडीच्या पाण्याच्या भरोस्यावर शेतकºयांनी पेरण्यांचे नियोजन केले होते़ अपेक्षेप्रमाणे प्रकल्पातून पाणी उपलब्ध झाल्याने यावर्षीच्या रबी हंगामात शेतकºयांना भरघोस उत्पन्न मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे़उन्हाळी हंगामातही मिळाले पाणीजायकवाडी प्रकल्पातून उन्हाळी हंगामातील पिकांसाठीही यावर्षी पाणी उपलब्ध झाले आहे़ पाटबंधारे विभागाने उन्हाळी हंगामासाठी चार पाणी पाळ्यांचे नियोजन केले असून, त्यापैकी तीन पाणी पाळ्या पूर्ण झाल्या आहेत़ येत्या काही दिवसांत शेवटची पाणी पाळी देखील जिल्ह्याला उपलब्ध होणार आहे़ उन्हाळी हंगामात सर्वसाधारपणे १० हजार हेक्टरपर्यंतच सिंचन होते़ परंतु, पाटबंधारे विभागाने केलेल्या पाठपुराव्यामुळे सिंचनात वाढ झाली असून, उन्हाळी हंगामातील पिकांसाठी २५ हजार हेक्टरवर जायकवाडीचे पाणी उपलब्ध झाले आहे़ हे संपूर्ण क्षेत्र सिंचनाखाली येईल, अशी माहिती पाटबंधारे विभागातून देण्यात आली़

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीFarmerशेतकरीDamधरण