शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

परभणी : ४८ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:19 IST

पैठण तालुक्यातील जायकवाडी प्रकल्पातून परभणी जिल्ह्यातील ४८ हजार ५०० हेक्टर जमीन यावर्षी सिंचनाखाली आली आहे़ विशेष म्हणजे या पाण्यामुळे रबी आणि उन्हाळी हंगामातील पिकांना लाभ झाला असून, सिंचनामुळे बागायती क्षेत्रही वाढले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पैठण तालुक्यातील जायकवाडी प्रकल्पातून परभणी जिल्ह्यातील ४८ हजार ५०० हेक्टर जमीन यावर्षी सिंचनाखाली आली आहे़ विशेष म्हणजे या पाण्यामुळे रबी आणि उन्हाळी हंगामातील पिकांना लाभ झाला असून, सिंचनामुळे बागायती क्षेत्रही वाढले आहे़परभणी जिल्ह्यातील आर्थिक उलाढाली कृषी हंगामावर अवलंबून आहेत़ जिल्ह्यात खरीप आणि रबी या दोन हंगामात पिके घेतली जातात़ खरीप हंगामातील पिके मोसमी पावसावर अवलंबून असतात तर रबी हंगामातील पिकांना जायकवाडी प्रकल्पाच्या पाण्यावर सिंचनाच्या सुविधा उपलब्ध होतात़ जायकवाडी प्रकल्पाचा डावा आणि उजवा कालवा परभणी जिल्ह्यातून प्रवाही झाला आहे़ पाथरी तालुक्यातील वरखेड येथून डाव्या कालव्याला सुरुवात होते़ पाथरी, मानवत, परभणी, पूर्णा या चार तालुक्यांमध्ये डाव्या कालव्यातून सिंचनासाठी पाणी मिळते़ तर सोनपेठ, गंगाखेड या तालुक्यांना उजव्या कालव्यातून जायकवाडीचे पाणी उपलब्ध होते़ जायकवाडी प्रकल्प हा परभणी जिल्ह्यासाठी वरदान ठरला आहे़ जिल्ह्यातील रबी हंगामातील पिकांसाठी हमखास जायकवाडी प्रकल्पातून पाणी घेतले जात़े़ मात्र मागील सहा वर्षांपासून पावसाचा अनियमितपणा असल्याने जायकवाडी प्रकल्प पाण्याने पूर्ण क्षमतेने भरला नव्हता़ परिणामी परभणी जिल्ह्यातील रबी हंगामात धोक्यात आला होता़ ५ ते ६ वर्षांपर्यंत जिल्ह्याला पाणी मिळाले नाही़मागील वर्षी परभणी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ३१ टक्के पाऊस कमी झाला असला तरी जायकवाडी प्रकल्प मात्र १०० टक्के भरला़ त्यामुळे परभणी जिल्ह्याला या प्रकल्पाचा लाभ मिळाला आहे़ जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या वितरिका, उपवितरिका आणि चाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील पिकांना पाणी उपलब्ध होते़ यावर्षी प्रकल्पात पाणीसाठा झाल्याने कालव्यांना आठ पाणी पाळ्या द्याव्यात, अशी मागणी जोर धरत होती़ या मागणीनुसार पाणी पाळयांचे नियोजन करण्यात आले़ रबी हंगामामध्ये ४ पाणी पाळया देण्यात आल्या आणि त्याचा फायदा रबीच्या पिकांना झाला आहे़ जायकवाडी प्रकल्पाच्या पाण्यावर ४८ हजार ५०० हेक्टर जमिनीवर सिंचन झाल्याची माहिती लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर यांनी दिली़ विशेष म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी १० हजार हेक्टर सिंचन वाढविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले़ रबी हंगामासाठी प्रथमच पूर्ण क्षमतेने जायकवाडी प्रकल्पाचे पाणी मिळाल्यामुळे जिल्ह्यातील गहू, हरभरा़, ज्वारी, कापूस या पिकांना लाभ झाला़ जायकवाडीच्या पाण्याच्या भरोस्यावर शेतकºयांनी पेरण्यांचे नियोजन केले होते़ अपेक्षेप्रमाणे प्रकल्पातून पाणी उपलब्ध झाल्याने यावर्षीच्या रबी हंगामात शेतकºयांना भरघोस उत्पन्न मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे़उन्हाळी हंगामातही मिळाले पाणीजायकवाडी प्रकल्पातून उन्हाळी हंगामातील पिकांसाठीही यावर्षी पाणी उपलब्ध झाले आहे़ पाटबंधारे विभागाने उन्हाळी हंगामासाठी चार पाणी पाळ्यांचे नियोजन केले असून, त्यापैकी तीन पाणी पाळ्या पूर्ण झाल्या आहेत़ येत्या काही दिवसांत शेवटची पाणी पाळी देखील जिल्ह्याला उपलब्ध होणार आहे़ उन्हाळी हंगामात सर्वसाधारपणे १० हजार हेक्टरपर्यंतच सिंचन होते़ परंतु, पाटबंधारे विभागाने केलेल्या पाठपुराव्यामुळे सिंचनात वाढ झाली असून, उन्हाळी हंगामातील पिकांसाठी २५ हजार हेक्टरवर जायकवाडीचे पाणी उपलब्ध झाले आहे़ हे संपूर्ण क्षेत्र सिंचनाखाली येईल, अशी माहिती पाटबंधारे विभागातून देण्यात आली़

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीFarmerशेतकरीDamधरण