शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

परभणी : ४८ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:19 IST

पैठण तालुक्यातील जायकवाडी प्रकल्पातून परभणी जिल्ह्यातील ४८ हजार ५०० हेक्टर जमीन यावर्षी सिंचनाखाली आली आहे़ विशेष म्हणजे या पाण्यामुळे रबी आणि उन्हाळी हंगामातील पिकांना लाभ झाला असून, सिंचनामुळे बागायती क्षेत्रही वाढले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पैठण तालुक्यातील जायकवाडी प्रकल्पातून परभणी जिल्ह्यातील ४८ हजार ५०० हेक्टर जमीन यावर्षी सिंचनाखाली आली आहे़ विशेष म्हणजे या पाण्यामुळे रबी आणि उन्हाळी हंगामातील पिकांना लाभ झाला असून, सिंचनामुळे बागायती क्षेत्रही वाढले आहे़परभणी जिल्ह्यातील आर्थिक उलाढाली कृषी हंगामावर अवलंबून आहेत़ जिल्ह्यात खरीप आणि रबी या दोन हंगामात पिके घेतली जातात़ खरीप हंगामातील पिके मोसमी पावसावर अवलंबून असतात तर रबी हंगामातील पिकांना जायकवाडी प्रकल्पाच्या पाण्यावर सिंचनाच्या सुविधा उपलब्ध होतात़ जायकवाडी प्रकल्पाचा डावा आणि उजवा कालवा परभणी जिल्ह्यातून प्रवाही झाला आहे़ पाथरी तालुक्यातील वरखेड येथून डाव्या कालव्याला सुरुवात होते़ पाथरी, मानवत, परभणी, पूर्णा या चार तालुक्यांमध्ये डाव्या कालव्यातून सिंचनासाठी पाणी मिळते़ तर सोनपेठ, गंगाखेड या तालुक्यांना उजव्या कालव्यातून जायकवाडीचे पाणी उपलब्ध होते़ जायकवाडी प्रकल्प हा परभणी जिल्ह्यासाठी वरदान ठरला आहे़ जिल्ह्यातील रबी हंगामातील पिकांसाठी हमखास जायकवाडी प्रकल्पातून पाणी घेतले जात़े़ मात्र मागील सहा वर्षांपासून पावसाचा अनियमितपणा असल्याने जायकवाडी प्रकल्प पाण्याने पूर्ण क्षमतेने भरला नव्हता़ परिणामी परभणी जिल्ह्यातील रबी हंगामात धोक्यात आला होता़ ५ ते ६ वर्षांपर्यंत जिल्ह्याला पाणी मिळाले नाही़मागील वर्षी परभणी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ३१ टक्के पाऊस कमी झाला असला तरी जायकवाडी प्रकल्प मात्र १०० टक्के भरला़ त्यामुळे परभणी जिल्ह्याला या प्रकल्पाचा लाभ मिळाला आहे़ जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या वितरिका, उपवितरिका आणि चाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील पिकांना पाणी उपलब्ध होते़ यावर्षी प्रकल्पात पाणीसाठा झाल्याने कालव्यांना आठ पाणी पाळ्या द्याव्यात, अशी मागणी जोर धरत होती़ या मागणीनुसार पाणी पाळयांचे नियोजन करण्यात आले़ रबी हंगामामध्ये ४ पाणी पाळया देण्यात आल्या आणि त्याचा फायदा रबीच्या पिकांना झाला आहे़ जायकवाडी प्रकल्पाच्या पाण्यावर ४८ हजार ५०० हेक्टर जमिनीवर सिंचन झाल्याची माहिती लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर यांनी दिली़ विशेष म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी १० हजार हेक्टर सिंचन वाढविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले़ रबी हंगामासाठी प्रथमच पूर्ण क्षमतेने जायकवाडी प्रकल्पाचे पाणी मिळाल्यामुळे जिल्ह्यातील गहू, हरभरा़, ज्वारी, कापूस या पिकांना लाभ झाला़ जायकवाडीच्या पाण्याच्या भरोस्यावर शेतकºयांनी पेरण्यांचे नियोजन केले होते़ अपेक्षेप्रमाणे प्रकल्पातून पाणी उपलब्ध झाल्याने यावर्षीच्या रबी हंगामात शेतकºयांना भरघोस उत्पन्न मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे़उन्हाळी हंगामातही मिळाले पाणीजायकवाडी प्रकल्पातून उन्हाळी हंगामातील पिकांसाठीही यावर्षी पाणी उपलब्ध झाले आहे़ पाटबंधारे विभागाने उन्हाळी हंगामासाठी चार पाणी पाळ्यांचे नियोजन केले असून, त्यापैकी तीन पाणी पाळ्या पूर्ण झाल्या आहेत़ येत्या काही दिवसांत शेवटची पाणी पाळी देखील जिल्ह्याला उपलब्ध होणार आहे़ उन्हाळी हंगामात सर्वसाधारपणे १० हजार हेक्टरपर्यंतच सिंचन होते़ परंतु, पाटबंधारे विभागाने केलेल्या पाठपुराव्यामुळे सिंचनात वाढ झाली असून, उन्हाळी हंगामातील पिकांसाठी २५ हजार हेक्टरवर जायकवाडीचे पाणी उपलब्ध झाले आहे़ हे संपूर्ण क्षेत्र सिंचनाखाली येईल, अशी माहिती पाटबंधारे विभागातून देण्यात आली़

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीFarmerशेतकरीDamधरण