शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

परभणी : लाभार्थ्यांचे साडेतीन हजार अर्ज झाले नामंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 00:19 IST

मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत परभणी मंडळ कार्यालयाकडे ५ आॅगस्टपर्यंत ९ हजार २७८ प्रस्ताव प्राप्त झाले होते़ त्यापैकी ५ हजार १२३ अर्ज मंजूर झाले आहेत़ परंतु, किरकोळ त्रुटींमुळे ३ हजार ४९२ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत़ त्यामुळे या प्रकारामुळे कृषीपंप धारकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे़

मारोती जुंबडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत परभणी मंडळ कार्यालयाकडे ५ आॅगस्टपर्यंत ९ हजार २७८ प्रस्ताव प्राप्त झाले होते़ त्यापैकी ५ हजार १२३ अर्ज मंजूर झाले आहेत़ परंतु, किरकोळ त्रुटींमुळे ३ हजार ४९२ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत़ त्यामुळे या प्रकारामुळे कृषीपंप धारकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे़राज्यात शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी सौर कृषीपंप योजनेच्या माध्यमातून ५ एकर पेक्षा अधिक जमीन असणाºया शेतकऱ्यांना ५ एचपी तर ५ एकर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकºयांना ३ एचपी कृषीपंप देण्यात येणार आहेत़ ५ एचपी कृषीपंपाची किंमत ३ लाख ८५ हजार आहे तर ३ एचपी कृषीपंपाची किंमत २ लाख ५५ हजार रुपये आहे़हे पंप घेण्यासाठी सर्वसाधारण गटातील लाभार्थ्याना कृषीपंपाच्या या किंमतीच्य फक्त १० टक्के आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना केवळ ५ टक्के रक्कम भरावी लागणार आहे़ विशेष म्हणजे वीज वितरण कंपनीच्या वतीने पुढील पाच वर्षांसाठी कृषीपंपाची देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या सौर कृषीपंप योजनेंतर्गत शेतकºयांच्या कृषीपंपांना अडथळ्याविना वीज पुरवठा मिळावा, यासाठी आता पारंपरिक वीज कनेक्शन न देता सौर वीज कनेक्शन दिले जाणार आहे़ परभणी मंडळ कार्यालयाकडे जानेवारी २०१९ पासून सुरू झालेल्या या योजनेंतर्गत म्हणजे ८ महिन्यांत ९ हजार २७८ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत़ त्यापैकी ५ हजार १२३ प्रस्ताव मंजूर करण्यात आले़परंतु, लाभार्थी शेतकºयांच्या सातबारावर जलस्त्रोतांचा उल्लेख नसणे, सामाईक सातबारा असणाºया लाभार्थ्यांनी संमतीपत्र सादर न करणे, सातबारावर हेक्टर ऐवजी एकरमध्ये उल्लेख नसणे, सातबारात चुका असणे या त्रुटींसह शेतकºयांकडे अगोदरच वीज कनेक्शन उपलब्ध असणे आदी किरकोळ त्रुटींमुळे ३ हजार ४९२ प्रस्ताव वीज वितरण कार्यालयाने नामंजूर केले आहेत़ त्यामुळे लाभार्थी शेतकºयामधून तीव्र संताप व्यक्त होत आहे़दुष्काळात सापडलेल्या शेतकºयांना मुख्यमंत्री सौर कृषीपंप या शेतकरी हिताच्या योजनेची अंमलबजावणी करून अधिकाधिक शेतकºयांना लाभ द्यावा, अशी अपेक्षा लाभार्थी कृषीपंप धारकांतून होत आहे़उपविभागनिहाय नामंजूर अर्ज४मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत वीज वितरण कंपनीकडे जिल्ह्यातील १० उपविभागनिहाय अर्ज प्राप्त झाले होते़ त्यामध्ये वीज वितरण कंपनीने किरकोळ त्रुट्यांमुळे परभणी शहर या उपविभागांतर्गत ३९ अर्ज प्राप्त झाले होते़ त्यापैकी १६ मंजूर करीत किरकोळ त्रुटी असल्याने २२ अर्ज नामंजूर केले आहेत़ गंगाखेड उपविभागांतर्गत ५८३ अर्ज प्राप्त झाले होते़ त्यापैकी ३०१ प्रस्ताव मंजूर करीत २२९ प्रस्ताव नामंजूर केले़४परभणी ग्रामीण १ हजार १६८ प्राप्त झाले असून, ९३८ मंजूर करण्यात आले असून, ७६७ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत़ पाथरी ४५८ नामंजूर, सेलू ४२० नामंजूर, जिंतूर ६७५ नामंजूर, सोनपेठ १३० नामंजूर, पालम ६० नामंजूर, मानवत २३९ नामंजूर तर पूर्णा ३९२ असे एकूण १० उपविभागांतर्गत ३ हजार ४९२ प्रस्ताव नामंजूर करण्यात आले आहे़केवळ २८ कामे पूर्ण४मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेची जिल्ह्यात जानेवारी २०१९ पासून अंमलबजावणी सुरू झाली़ या योजनेला ८ महिन्यांचा कालावधी झाला आहे़ या ८ महिन्यांत वीज वितरण कंपनीने ५ हजार १२३ प्रस्ताव मंजूर केले असून, २ हजार ५१ लाभार्थी शेतकºयांनी आपल्या हिस्स्याची रक्कम महावितरणकडे जमा केली आहे़ त्याचबरोबर ७७७ लाभार्थी शेतकºयांनी ज्या कंत्राटदाराकडून सौर कृषीपंप घ्यायचा आहे, अशा कंत्राटदारांची निवड केली आहे़४या सर्व प्रक्रिया पूर्ण करीत वीज वितरण कंपनीने आतापर्यंत जिल्ह्यातील १० उपविभागांतर्गत असलेल्या २८ कृषीपंप धारकांना लाभ दिला आहे़ उर्वरित ५ हजारांच्यावर लाभार्थी शेतकरी आहेत़ शेतकºयांच्या हिताच्या असलेल्या योजनेचे काम प्राधान्याने पूर्ण करीत कृषीपंपधारकांना लाभ द्यावा, अशी मागणी होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीFarmerशेतकरी