शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

परभणी : ४२ कोटींचे अनुदान बँक खात्यावर जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 11:44 PM

जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादकांसाठी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या ४२ कोटी १२ लाख रुपयांपैकी ४१ कोटी ९६ लाख रुपये बँकांकडे वर्ग करण्यात आले असून ही रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादकांसाठी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या ४२ कोटी १२ लाख रुपयांपैकी ४१ कोटी ९६ लाख रुपये बँकांकडे वर्ग करण्यात आले असून ही रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.मागील वर्षीच्या खरीप हंगामामध्ये शेतकºयांनी घेतलेल्या कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादूर्भाव झाला होता. परिणामी कापसाचे उत्पादन घटल्याने शेतकरी अडचणीत सापडले होते. या शेतकºयांच्या मदतीसाठी राज्य शासनाने अनुदान देऊ केले आहे. तीन टप्प्यामध्ये अनुदानाचे वाटप होणार असून ४२ कोटी १२ लाख रुपयांचा पहिला टप्पा जिल्ह्याला प्राप्त झाला होता. तहसील कार्यालयामार्फत ही रक्कम बँकांकडे वर्ग करण्यात आली असून शेतकºयांच्या खात्यानुसार ती प्रत्यक्ष शेतकºयांना मिळणार आहे. बोंडअळीग्रस्त शेतकºयांसाठी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या यादीनुसार परभणी तालुक्याला ६ कोटी ८८ लाख ९२ हजार रुपये मिळाले होते. १२ हजार १७ शेतकºयांच्या खात्यावर ६ कोटी ८७ लाख ८७ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. सेलू तालुक्यासाठी ६ कोटी ५९ लाख ८० हजार रुपये मिळाले होते. त्यापैकी १३ हजार ७८९ शेतकºयांच्या खात्यावर ६ कोटी ५३ लाख ७ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. जिंतूर तालुक्यात ११ हजार ९०१ शेतकºयांच्या खात्यावर ६ कोटी ४३ लाख ७ हजार, पाथरी तालुक्यातील १० हजार २९५ शेतकºयांच्या खात्यावर ४ कोटी २१ लाख ९१ हजार, मानवत तालुक्यातील ९ हजार ४८९ शेतकºयांच्या खात्यावर ५ कोटी २७ लाख ४४ हजार, सोनपेठ तालुक्यात ८ हजार ८४३ शेतकºयांच्या खात्यावर ४ कोटी २० लाख, गंगाखेड ७ हजार ९११ शेतकºयांच्या खात्यावर ३ कोटी २४ लाख ७३ हजार, पालम ७ हजार २७१ शेतकºयांच्या खात्यावर ३ कोटी ४ लाख २५ हजार आणि पूर्णा तालुक्यातील ४ हजार ९९९ शेतकºयांच्या खात्यावर २ कोटी १४ लाख २५ हजार रुपये प्राप्त झाले आहेत. प्रशासनाला पहिल्या टप्प्यात मिळालेल्या संपूर्ण अनुदानाचे वितरण झाले असून आता दुसºया टप्प्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.साडे तीन लाख शेतकºयांना मिळणार लाभपरभणी जिल्ह्यात बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकºयांचा सर्व्हे जिल्हा प्रशासनाने केला होता. या सर्व्हेनंतर शेतकºयांना द्यावयाच्या रक्कमेची मागणी शासनाकडे करण्यात आली. जिल्ह्यात ३ लाख ५१ हजार ११८ शेतकºयांचे बोंडअळीमुळे नुकसान झाले असून त्यासाठी १५७ कोटी ९७ लाख रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. या संपूर्ण मागणीला मंजुरी मिळाली आहे. तीन टप्प्यामध्ये हे अनुदान जिल्ह्याला मिळणार असून पहिल्या टप्प्यात ८६ हजार ५१५ शेतकºयांच्या खात्यावर ४१ कोटी ९६ लाख रुपये जमा झाले आहेत.पेरणीपूर्वी मदत वाटप करासंपूर्ण जिल्हाभरात पेरणीचा हंगाम आता सुरु होत आहे. यासाठी शेतकºयांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. बोंडअळीचे अनुदान वेळेत मिळाले तर पेरणी सुकर होणार असल्याने पेरणीपूर्वी अनुदान मिळावे, अशी शेतकºयांची अपेक्षा आहे. येत्या ८ दिवसांत मोठा पाऊस झाला तर प्रत्यक्ष पेरण्या सुरु होऊ शकतात. त्यापूर्वी जिल्हा प्रशासनाने अनुदान वाटपाची तयारी करावी, अशी शेतकºयांची मागणी आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीbankबँकFarmerशेतकरी