शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

परभणी : वीस हजार एकरवरील उसाचे क्षेत्र धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 00:13 IST

जिल्ह्यात ऊस पिकाचे सर्वाधिक क्षेत्र असलेल्या पाथरी तालुक्यात पाण्याअभावी उभ्या उसाचे अक्षरश: चिपाट होत आहे. जायकवाडीच्या डाव्या कालव्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी यावर्षी ऊस जगविला खरा; मात्र उन्हाची तीव्रता आणि भूजल पातळी खालावल्यामुळे शेतातील ऊस पीक जळून जात आहे. त्यामुळे २० हजार एकरवरील उसाचे पीक धोक्यात आले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : जिल्ह्यात ऊस पिकाचे सर्वाधिक क्षेत्र असलेल्या पाथरी तालुक्यात पाण्याअभावी उभ्या उसाचे अक्षरश: चिपाट होत आहे. जायकवाडीच्या डाव्या कालव्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी यावर्षी ऊस जगविला खरा; मात्र उन्हाची तीव्रता आणि भूजल पातळी खालावल्यामुळे शेतातील ऊस पीक जळून जात आहे. त्यामुळे २० हजार एकरवरील उसाचे पीक धोक्यात आले आहे़गतवर्षी या भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे़ आॅगस्ट महिन्यात पाऊस पडल्यानंतर पावसाने पाठ फिरवली़ त्यामुळे जमिनीतील पाणी पातळी प्रचंड खालावली आहे़ उपलब्ध पाण्याचे स्रोतही आटत आहेत़ पाथरी तालुक्यात दोन खाजगी साखर कारखाने आहेत़ या कारखाना कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड केली जाते़ तालुक्यात सर्वाधिक उस लागवडीचे क्षेत्र आहे़ या भागातील पाथरी आणि लिंबा येथील दोन्ही कारखान्याचे गळीत हंगाम संपल्यानंतर या भागात किमान २० हजार एकर उसाचे क्षेत्र असल्याची नोंद आहे़कारखाना कार्यक्षेत्रातील पाथरी, मानवत, सोनपेठ भागात अत्यल्प पावसाने गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटले आहेत़ सिंचनासाठी पाणी नसल्याने बागायती पिके जळून जात आहेत़ जायकवाडी धरण्याच्या डाव्या कालव्यावर या भागातील उसाचे क्षेत्र पूर्णत: अवलंबून आहे़ जायकवाडीचे दोन पाणी अवर्तन सुटल्याने या भागातील शेतकऱ्यांनी ऊस जोपासला़ परंतु, सध्या शाश्वत पाणीपुरवठा करणारे जलस्त्रोत आटले आहेत़ त्यात जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून करण्यात येणारा पाणीपुरवठाही बेभरोस्याच्या झाला आहे़ त्यामुळे पाथरी तालुक्यातील २० हजार एकरवरील उसाचे पीक धोक्यात आले आहे़ परिणामी शेतकरी अडचणीत आहेत.बंधारे कोरडे पडल्याने दाहकता वाढलीच्सद्यस्थितीत गोदावरीच्या पात्रातील ढलेगाव आणि मुदगल दोन्ही बंधारे कोरडे पडले आहेत़ बंधाºयातील पाणी कमी झाल्याने गोदावरी पात्रात काही ठिकाणी सिंचनासाठी बसवलेले कृषी पंप महसूल प्रशासनाने काढून घेतले आहेत़च् जायकवाडी धरणाचे पाणी सोडण्यात आले नाही़ या भागात पाण्याचे संकट अधिक गंभीर बनले आहे़ उपलब्ध उसाच्या क्षेत्रापैकी २० हजार एकरवरील क्षेत्र आज धोक्यात आले आहे़च्ऊस उत्पादक शेतकरी शेतातील उभा ऊस जाळून चिपाट होत असताना पाहात आहेत़ त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शेतकºयांच्या होणाºया नुकसानीचा पंचनामा करून आर्थिक कोंडीत सापडलेल्या ऊस उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे़तालुक्यात बेभरवशाच्या सिंचन सुविधाच्पाथरी तालुक्यात गोदावरीच्या पात्रातील दोन्ही बंधारे आणि जायकवाडी धरणाचा डावा कालवा हे दोन्ही सिंचन सुविधांचे स्रोत बेभरवशाचे वाटू लागले आहेत़च्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकºयांना हातची पिके जळत असताना पहावी लागत आहेत़ त्यामुळे जायकवाडी डाव्या कालव्याच्या कार्यक्षेत्रात येणाºया शेतकºयांसाठी शाश्वत पाणीपुरवठा होईल यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे़च्पाटबंधारे विभागाने पावले उचलत दुष्काळात सापडलेल्या बागायतदार शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीdroughtदुष्काळ