शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

परभणी : वीस हजार एकरवरील उसाचे क्षेत्र धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 00:13 IST

जिल्ह्यात ऊस पिकाचे सर्वाधिक क्षेत्र असलेल्या पाथरी तालुक्यात पाण्याअभावी उभ्या उसाचे अक्षरश: चिपाट होत आहे. जायकवाडीच्या डाव्या कालव्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी यावर्षी ऊस जगविला खरा; मात्र उन्हाची तीव्रता आणि भूजल पातळी खालावल्यामुळे शेतातील ऊस पीक जळून जात आहे. त्यामुळे २० हजार एकरवरील उसाचे पीक धोक्यात आले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : जिल्ह्यात ऊस पिकाचे सर्वाधिक क्षेत्र असलेल्या पाथरी तालुक्यात पाण्याअभावी उभ्या उसाचे अक्षरश: चिपाट होत आहे. जायकवाडीच्या डाव्या कालव्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी यावर्षी ऊस जगविला खरा; मात्र उन्हाची तीव्रता आणि भूजल पातळी खालावल्यामुळे शेतातील ऊस पीक जळून जात आहे. त्यामुळे २० हजार एकरवरील उसाचे पीक धोक्यात आले आहे़गतवर्षी या भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे़ आॅगस्ट महिन्यात पाऊस पडल्यानंतर पावसाने पाठ फिरवली़ त्यामुळे जमिनीतील पाणी पातळी प्रचंड खालावली आहे़ उपलब्ध पाण्याचे स्रोतही आटत आहेत़ पाथरी तालुक्यात दोन खाजगी साखर कारखाने आहेत़ या कारखाना कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड केली जाते़ तालुक्यात सर्वाधिक उस लागवडीचे क्षेत्र आहे़ या भागातील पाथरी आणि लिंबा येथील दोन्ही कारखान्याचे गळीत हंगाम संपल्यानंतर या भागात किमान २० हजार एकर उसाचे क्षेत्र असल्याची नोंद आहे़कारखाना कार्यक्षेत्रातील पाथरी, मानवत, सोनपेठ भागात अत्यल्प पावसाने गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटले आहेत़ सिंचनासाठी पाणी नसल्याने बागायती पिके जळून जात आहेत़ जायकवाडी धरण्याच्या डाव्या कालव्यावर या भागातील उसाचे क्षेत्र पूर्णत: अवलंबून आहे़ जायकवाडीचे दोन पाणी अवर्तन सुटल्याने या भागातील शेतकऱ्यांनी ऊस जोपासला़ परंतु, सध्या शाश्वत पाणीपुरवठा करणारे जलस्त्रोत आटले आहेत़ त्यात जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून करण्यात येणारा पाणीपुरवठाही बेभरोस्याच्या झाला आहे़ त्यामुळे पाथरी तालुक्यातील २० हजार एकरवरील उसाचे पीक धोक्यात आले आहे़ परिणामी शेतकरी अडचणीत आहेत.बंधारे कोरडे पडल्याने दाहकता वाढलीच्सद्यस्थितीत गोदावरीच्या पात्रातील ढलेगाव आणि मुदगल दोन्ही बंधारे कोरडे पडले आहेत़ बंधाºयातील पाणी कमी झाल्याने गोदावरी पात्रात काही ठिकाणी सिंचनासाठी बसवलेले कृषी पंप महसूल प्रशासनाने काढून घेतले आहेत़च् जायकवाडी धरणाचे पाणी सोडण्यात आले नाही़ या भागात पाण्याचे संकट अधिक गंभीर बनले आहे़ उपलब्ध उसाच्या क्षेत्रापैकी २० हजार एकरवरील क्षेत्र आज धोक्यात आले आहे़च्ऊस उत्पादक शेतकरी शेतातील उभा ऊस जाळून चिपाट होत असताना पाहात आहेत़ त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शेतकºयांच्या होणाºया नुकसानीचा पंचनामा करून आर्थिक कोंडीत सापडलेल्या ऊस उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे़तालुक्यात बेभरवशाच्या सिंचन सुविधाच्पाथरी तालुक्यात गोदावरीच्या पात्रातील दोन्ही बंधारे आणि जायकवाडी धरणाचा डावा कालवा हे दोन्ही सिंचन सुविधांचे स्रोत बेभरवशाचे वाटू लागले आहेत़च्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकºयांना हातची पिके जळत असताना पहावी लागत आहेत़ त्यामुळे जायकवाडी डाव्या कालव्याच्या कार्यक्षेत्रात येणाºया शेतकºयांसाठी शाश्वत पाणीपुरवठा होईल यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे़च्पाटबंधारे विभागाने पावले उचलत दुष्काळात सापडलेल्या बागायतदार शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीdroughtदुष्काळ