शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

परभणी : वीस हजार एकरवरील उसाचे क्षेत्र धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 00:13 IST

जिल्ह्यात ऊस पिकाचे सर्वाधिक क्षेत्र असलेल्या पाथरी तालुक्यात पाण्याअभावी उभ्या उसाचे अक्षरश: चिपाट होत आहे. जायकवाडीच्या डाव्या कालव्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी यावर्षी ऊस जगविला खरा; मात्र उन्हाची तीव्रता आणि भूजल पातळी खालावल्यामुळे शेतातील ऊस पीक जळून जात आहे. त्यामुळे २० हजार एकरवरील उसाचे पीक धोक्यात आले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : जिल्ह्यात ऊस पिकाचे सर्वाधिक क्षेत्र असलेल्या पाथरी तालुक्यात पाण्याअभावी उभ्या उसाचे अक्षरश: चिपाट होत आहे. जायकवाडीच्या डाव्या कालव्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी यावर्षी ऊस जगविला खरा; मात्र उन्हाची तीव्रता आणि भूजल पातळी खालावल्यामुळे शेतातील ऊस पीक जळून जात आहे. त्यामुळे २० हजार एकरवरील उसाचे पीक धोक्यात आले आहे़गतवर्षी या भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे़ आॅगस्ट महिन्यात पाऊस पडल्यानंतर पावसाने पाठ फिरवली़ त्यामुळे जमिनीतील पाणी पातळी प्रचंड खालावली आहे़ उपलब्ध पाण्याचे स्रोतही आटत आहेत़ पाथरी तालुक्यात दोन खाजगी साखर कारखाने आहेत़ या कारखाना कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड केली जाते़ तालुक्यात सर्वाधिक उस लागवडीचे क्षेत्र आहे़ या भागातील पाथरी आणि लिंबा येथील दोन्ही कारखान्याचे गळीत हंगाम संपल्यानंतर या भागात किमान २० हजार एकर उसाचे क्षेत्र असल्याची नोंद आहे़कारखाना कार्यक्षेत्रातील पाथरी, मानवत, सोनपेठ भागात अत्यल्प पावसाने गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटले आहेत़ सिंचनासाठी पाणी नसल्याने बागायती पिके जळून जात आहेत़ जायकवाडी धरण्याच्या डाव्या कालव्यावर या भागातील उसाचे क्षेत्र पूर्णत: अवलंबून आहे़ जायकवाडीचे दोन पाणी अवर्तन सुटल्याने या भागातील शेतकऱ्यांनी ऊस जोपासला़ परंतु, सध्या शाश्वत पाणीपुरवठा करणारे जलस्त्रोत आटले आहेत़ त्यात जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून करण्यात येणारा पाणीपुरवठाही बेभरोस्याच्या झाला आहे़ त्यामुळे पाथरी तालुक्यातील २० हजार एकरवरील उसाचे पीक धोक्यात आले आहे़ परिणामी शेतकरी अडचणीत आहेत.बंधारे कोरडे पडल्याने दाहकता वाढलीच्सद्यस्थितीत गोदावरीच्या पात्रातील ढलेगाव आणि मुदगल दोन्ही बंधारे कोरडे पडले आहेत़ बंधाºयातील पाणी कमी झाल्याने गोदावरी पात्रात काही ठिकाणी सिंचनासाठी बसवलेले कृषी पंप महसूल प्रशासनाने काढून घेतले आहेत़च् जायकवाडी धरणाचे पाणी सोडण्यात आले नाही़ या भागात पाण्याचे संकट अधिक गंभीर बनले आहे़ उपलब्ध उसाच्या क्षेत्रापैकी २० हजार एकरवरील क्षेत्र आज धोक्यात आले आहे़च्ऊस उत्पादक शेतकरी शेतातील उभा ऊस जाळून चिपाट होत असताना पाहात आहेत़ त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शेतकºयांच्या होणाºया नुकसानीचा पंचनामा करून आर्थिक कोंडीत सापडलेल्या ऊस उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे़तालुक्यात बेभरवशाच्या सिंचन सुविधाच्पाथरी तालुक्यात गोदावरीच्या पात्रातील दोन्ही बंधारे आणि जायकवाडी धरणाचा डावा कालवा हे दोन्ही सिंचन सुविधांचे स्रोत बेभरवशाचे वाटू लागले आहेत़च्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकºयांना हातची पिके जळत असताना पहावी लागत आहेत़ त्यामुळे जायकवाडी डाव्या कालव्याच्या कार्यक्षेत्रात येणाºया शेतकºयांसाठी शाश्वत पाणीपुरवठा होईल यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे़च्पाटबंधारे विभागाने पावले उचलत दुष्काळात सापडलेल्या बागायतदार शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीdroughtदुष्काळ