शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
3
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
4
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
5
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
6
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
7
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
8
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
9
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
10
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
11
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
12
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
13
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
15
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
16
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
17
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला

परभणी : किसान सभेचे रास्ता रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:50 AM

दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांवर तात्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी किसान सभेच्या वतीने १९ नोव्हेंबर रोजी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी ): दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांवर तात्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी किसान सभेच्या वतीने १९ नोव्हेंबर रोजी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. दुपारी एक वाजेपर्यंत हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. निम्न दुधना प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडून इरळद, सावंगी, सोन्ना, गोगलगाव, मंगरूळ, नरळद, कोठाळा, टाकळी, पार्डी, शेवडी, राजूरा या गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढावा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांचे अनुदान वाटप करावे, पीक कर्जाचे पुनर्गठण करून तात्काळ कर्जाचे वाटप करावे इ. मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.आंदोलनात विलास बाबर, लिंबाजी कचरे पाटील, अशोक बुरखुंडे, संजय देशमुख, रामराजे महाडिक, बाबाराव आळणे, उद्धव निर्वळ, आनंद भक्ते, मुकुंद मगर, विष्णू जाधव, बाळासाहेब भिसे, सुभाष देशमुख, धनंजय तुरे, अशोक कचरे आदी सहभागी झाले होते. नायब तहसीलदार नकूल वाघुंडे यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले.मानवत तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणीटंचाई, चाराटंचाई, रोजगार अशा समस्यांना ग्रामस्थ तोंड देत असताना प्रशासनाकडून मात्र उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे किसान सभेने प्रशासनाच्या विरोधात हे आंदोलन केले.

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलनFarmerशेतकरी