शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

परभणी : ई-मस्टरअभावी रेशीम लागवड आली धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:04 AM

येथील जिल्हा रेशीम अधिकारी कार्यालयास पूर्णवेळ रेशीम अधिकारी नसल्याने जिल्ह्यातील ई-मस्टरची कामे ठप्प पडली आहेत. परिणामी मजुरांचे पगार रखडले असून रेशीम लागवड योजना अडचणीत सापडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिल्हा रेशीम अधिकारी कार्यालयास पूर्णवेळ रेशीम अधिकारी नसल्याने जिल्ह्यातील ई-मस्टरची कामे ठप्प पडली आहेत. परिणामी मजुरांचे पगार रखडले असून रेशीम लागवड योजना अडचणीत सापडली आहे.शेतकऱ्यांना रेशीम लागवडीसाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने जिल्हा पातळीवर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत तुती लागवड कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या योजनेला जिल्ह्यातील शेतकºयांकडून उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे. मात्र परभणी येथील जिल्हा रेशीम अधिकारी कार्यालयातील रेशीम अधिकाºयांचे पद रिक्त असल्याने या पदाचा अतिरिक्त पदभार ंिहंगोली येथील जिल्हा रेशीम अधिकाºयांकडे सोपविण्यात आला आहे. मात्र हे अधिकारी नियमित परभणी येथे येत नसल्याने मजुरांचे पेमेंट रखडले आहे. जिल्ह्यात तुती लागवड योजनेला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतरही प्रशासकीय उदासिनता शेतकºयांच्या पथ्यावर पडत आहे. जिल्हाभरातील शेतकºयांचे ई- मस्टर रखडल्याने योजनेची कामे ठप्प पडत आहेत.दरम्यान, मंगळवारी मानवत तालुक्यातील कोल्हावाडी येथील शेतकºयांनी थेट जिल्हा रेशीम अधिकारी कार्यालय गाठून संंबंधितांना मस्टरे काढण्याची विनंती केली. मात्र अधिकारीच उपस्थित नसल्याने शेतकºयांना आल्या पावली परतावे लागले. या शेतकºयांनी रेशीम अधिकाºयांच्या नावे पत्र दिले असून वेळेत ई-मस्टरची कामे झाली नाहीत तर आंदोलनाचा इशाराही दिला आहे. कोल्हावाडी येथील ३० लाभार्थ्यांना तुती लागवडीसाठी तहसील कार्यालयातून कार्यारंभ आदेश प्राप्त झाले. त्यानंतर लाभार्थ्यांच्या शेतात प्रत्यक्ष जिओ टॅगिंग आणि पंचनामेही करण्यात आले. मनरेगाच्या या योजनेंतर्गत शेतकºयांना तीन वर्षांसाठी कुशल आणि अकुशल पेमेंट देण्याची तरतूद करण्यात आली आहे. जुलै महिन्यात शेतकºयांनी मजुरांमार्फत तुती लागवड केली. या मजुरांचे ई- मस्टर आणि नमुना नं.४ दाखल करण्यात आले; परंतु, मजुरांचे पेमेंट रखडले आहे. गेल्या दहा दिवसांपासून रेशीम अधिकारी कार्यालयामार्फत मजुरांच्या पेमेंटसाठी शिफारसपत्र पाठविण्यात आले नाहीत. त्यामुळे मजुरांचे पेमेंट रखडले आहे. परिणामी मजुरांच्या पेमेंटचा प्रश्न निर्माण झाला आहे.प्रश्न मार्गी लावा -बंडू जाधवरेशीम उत्पादक शेतकºयांचा प्रश्न खा.बंडू जाधव यांनी उचलून धरला असून जिल्हाधिकाºयांना याबाबत पत्र पाठवून शेतकºयांच्या समस्या दूर कराव्यात, अशा सूचना दिल्या आहेत. मनरेगा योजनेंतर्गत तुती लागवड केलेल्या शेतकºयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेशीम अधिकारी कार्यालयात मनुष्यबळाचा अभाव असल्याने मस्टर पेमेंट तसेच इतर कामे रखडली आहेत. या ठिकाणी रेशीम अधिकाºयांसह तांत्रिक सहाय्यकांची पदे रिक्त आहेत. जिल्हाधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन मस्टर पेमेंट व इतर रखडलेली कामे पूर्ण करावीत, अशी मागणी खा.जाधव यांनी पत्राद्वारे केली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी