शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

परभणी : शेतकऱ्यांची अडवणूक केल्यास शिवसेना गय करणार नाही- खा.संजय जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 12:06 AM

वीज वितरण कंपनीकडून विद्युत रोहित्र, त्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध असतानाही शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. वसुलीच्या नावाखाली गावांचा वीजपुरवठा परस्पर तोडला जातो. मात्र दुसरीकडे वीज चोरीकडे दुर्लक्ष करुन मध्यमवर्गीयांना टार्गेट केले जात आहे. त्यामुळे महावितरण प्रशासनाकडून निजामकाळातील अन्यायापेक्षा जास्तीचा अन्याय शेतकºयांवर केला जात असल्याचा घणाघात खा.संजय जाधव यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : वीज वितरण कंपनीकडून विद्युत रोहित्र, त्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध असतानाही शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. वसुलीच्या नावाखाली गावांचा वीजपुरवठा परस्पर तोडला जातो. मात्र दुसरीकडे वीज चोरीकडे दुर्लक्ष करुन मध्यमवर्गीयांना टार्गेट केले जात आहे. त्यामुळे महावितरण प्रशासनाकडून निजामकाळातील अन्यायापेक्षा जास्तीचा अन्याय शेतकºयांवर केला जात असल्याचा घणाघात खा.संजय जाधव यांनी केला.वीज कंपनीतील अधिकाºयांच्या मनमानी कारभाराविरुद्ध शिवसेनेच्या वतीने खा. संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी येथील जिंतूर रोडवरील वीज वितरण कंपनीच्या सर्कल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. खा.जाधव म्हणाले, येथील अधीक्षक अभियंत्यांकडून पैसे घेतल्याशिवाय कामे केली जात नाहीत. ग्रामस्थांना कोणत्याही सूचना न देता आठ- आठ दिवस गावठाणचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. जळालेल्या डी.पी. शेतकºयांना बदलून दिले जात नाहीत. ग्रामीण भागातील ओव्हरलोड विद्युत रोहित्राच्या बाजुला एक नवीन डीपी बसविणे आवश्यक आहे; परंतु, तसे केले जात नाही. त्याचा ताण शेतकºयांवर येत आहे. पीएम, बीएमची कामे अद्यापही सुरु नाहीत. ३३ केव्ही सबस्टेशनमधील दुरुस्तीची कामे केली जात नाहीत. वीज वितरण कंपनीचा कारभार असाच सुरु राहिला तर प्रशासनाला धारेवर धरले जाईल, असा इशारा खा.संजय जाधव यांनी यावेळी दिला. हे आंदोलन सरकारच्या विरोधात नसून प्रशासनाच्या विरोधात असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शेतकरी जळालेले विद्युत रोहित्र ने-आण करतात; परंतु, त्याचा मलिदा मात्र एजन्सी व महावितरण प्रशासन संगनमताने खाते. सध्या तर जुन्या रोहित्रातील आॅईल काढून नवीन विद्युत रोहित्रात टाकण्यात येत आहे. त्यामुळे नवीन विद्युत रोहित्र जास्त काळ टिकत नाही. त्याचा फटका शेतकºयांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. विद्युत प्रशासनाने आपल्या भूमिकेत बदल करुन तात्काळ शेतकºयांना न्याय द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.आंदोलनात जिल्हाप्रमुख विशाल कदम, माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, सदाशिव देशमुख, जि.प. सदस्य विष्णू मांडे, सखूबाई लटपटे, बाळासाहेब जाधव पारवेकर, अर्जुन सामाले, अर्जुन रणेर, मारोती इक्कर, पांडुरंग खिल्लारे दीपक बारहाते, पंढरीनाथ घुले, दामोदर घुले, गणेश इक्कर, प्रा.डॉ.पंढरीनाथ धोंडगे आदींसह शिवसैनिक व शेतकरी सहभागी झाले‘विहिरीत पाणी असूनही उपयोग होईना’४सध्या शेतकºयांकडे उपलब्ध असलेल्या जलस्त्रोतांना मूबलक पाणी उपलब्ध आहे. त्याचबरोबर सिद्धेश्वर, येलदरी व जायकवाडी ही प्रमुख धरणेही तुडूंब भरलेली आहेत. रबी हंगामातील पिकांसाठी पाणी पाळी देण्यात येत आहे; परंतु, वीज नसल्याने या पाण्याचाही शेतकºयांना उपयोग होत नाही. त्यामुळे महावितरण प्रशासनाने जनहिताच्या कामासाठी एक पाऊल पुढे टाकून शेतकºयांना तात्काळ विद्युत रोहित्र व लागणाºया विजेच्या सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी खा.जाधव यांनी यावेळी केली.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीSanjay Jadhavसंजय जाधव