शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
3
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
4
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
5
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
6
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
7
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
8
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
9
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
10
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
11
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
12
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
13
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
14
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
15
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
16
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
17
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
18
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
19
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
20
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  

परभणी : पाण्यासाठी जमिनीची केली जातेय चाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:55 AM

तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून पाणी मिळविण्यासाठी दररोज विविध भागात मोठ्या प्रमाणात बोअर घेतले जात आहेत. विशेष म्हणजे यावर्षी सर्वसाधारणपणे ५०० फूट खोल बोअर खोदूनही पाणी लागत नसल्याचे दिसत आहे. बोअरचे प्रमाण वाढल्याने पाण्याच्या शोधात जमिनीची अक्षरश: चाळणी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून पाणी मिळविण्यासाठी दररोज विविध भागात मोठ्या प्रमाणात बोअर घेतले जात आहेत. विशेष म्हणजे यावर्षी सर्वसाधारणपणे ५०० फूट खोल बोअर खोदूनही पाणी लागत नसल्याचे दिसत आहे. बोअरचे प्रमाण वाढल्याने पाण्याच्या शोधात जमिनीची अक्षरश: चाळणी होत आहे.तालुक्यात डिसेंबर महिन्यापासून टंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. चार वर्षापासून सातत्याने दुष्काळीची परिस्थिती असल्याने यावर्षी पाण्याची टंचाई वाढली आहे. मागील वर्षी तालुक्यात सरासरीच्या तुलनेत ५० टक्केही पाऊस झाला नाही. परिणामी भूगर्भातील पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात खालावली आहे. जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून दोन महिन्यांपूर्वी पाणी सोडले होते. या पाण्याने काही काळ तग धरला. आता मात्र पाण्याचे स्त्रोत आटत आहेत. बागायती केळी, ऊस ही पिके हातची गेली आहेत. शेतकरी पाण्यासाठी विहिरींचे खोदकाम करीत आहेत. ५० ते ६० फूट विहीर खोदूनही पाणी लागत नाही. तर बोअरवेल ५०० फुटापर्यंत खोदल्यानंतरही कोरडा फुफाटा बाहेर पडत आहे. त्यामुळे पाण्याचा शोध घेण्यासाठी खोलवर खोदूनही पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांचा हिरमोड होत आहे. पाथरगव्हाण बु. परिसरात चार महिन्यांमध्ये १०० बोअर खोदण्यात आले. एक बोअर घेण्यासाठी सुमारे ४० हजार रुपये खर्च येतो. चार महिन्यातील बोअरवरील खर्चाचा अंदाज लावला तर ४० लाख रुपये केवळ पाणी शोधण्यासाठी खर्च झाल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे बोअर खोदकामावर कोणाचेही नियंत्रण नाही. पाण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी ग्रामस्थांमध्ये दिसत आहे.२ हजारांपेक्षा अधिक: तालुक्यात बोअरवेल४डिसेंबर २०१८ पासूनच तालुक्यामध्ये टंचाई परिस्थिती निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी पाण्यासाठी बोअर खोदकामावर भर दिला आहे. मागील चार महिन्यांमध्ये तालुक्यात सुमारे २ हजार पेक्षा अधिक बोअर घेण्यात आले. विशेष म्हणजे यातील अनेक बोअर ५०० फुटापर्यंत खोदले. खोलवर बोअर घेऊनही पाणी लागत नसल्याने खोदकामावरील खर्च वाया जात आहे. परिणामी पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढत चालली असून सिंचनासाठीही पाणी नसल्याने बागायती पिके हातची जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.जायकवाडीचे पाणी मिळाल्यास टंचाई होईल शिथिल४पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाचा डावा कालवा पाथरी तालुक्यातून गेला आहे. दोन महिन्यांपूर्वी या कालव्याला सोडलेल्या पाण्यामुळे टंचाई शिथिल झाली होती;परंतु, आता परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे.४या प्रकल्पाचे पाणी पुन्हा एकदा कालव्याला सोडले तर अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न मिटू शकतो. शिवाय कालव्याच्या पाण्यामुळे परिसरातील भूजल पातळी वाढून विहिरी, हातपंपांना पाणी उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे पाणी सोडण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी