शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

परभणी : १८१ कोटी रुपयांचे दुष्काळी अनुदान वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 11:23 PM

जिल्ह्यातील २ लाख ५४ हजार ५८९ शेतकऱ्यांना आतापर्यंत १८१ कोटी ४६ लाख ५६ हजार रुपयांचे गतवर्षीच्या खरीप हंगामाचे दुष्काळी अनुदान वाटप करण्यात आले असून, आणखी २३ कोटी ५६ लाख रुपयांच्या निधीची मागणी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे नोंदविली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील २ लाख ५४ हजार ५८९ शेतकऱ्यांना आतापर्यंत १८१ कोटी ४६ लाख ५६ हजार रुपयांचे गतवर्षीच्या खरीप हंगामाचे दुष्काळी अनुदान वाटप करण्यात आले असून, आणखी २३ कोटी ५६ लाख रुपयांच्या निधीची मागणी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे नोंदविली आहे़खरीप २०१८ च्या हंगामात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते़ त्यामुळे जिल्ह्यातील ४७९ गावांमधील ३ लाख ४३ हजार ५८६ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले होते़ त्यामुळे राज्य शासनाने ४७९ गावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केली होती़ या दुष्काळग्रस्त गावांमधील शेतकºयांना दुष्काळी अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता़ त्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यातील ४७९ गावांमधील २ लाख ५४ हजार ५८९ शेतकºयांना १८१ कोटी ४६ लाख ५६ हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे़ त्यामध्ये परभणी तालुक्यातील १३१ दुष्काळग्रस्त गावांमधील ६८ हजार १४९ शेतकºयांना ५४ कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे़ पालम तालुक्यातील ८२ गावांमधील ४० हजार ७६७ शेतकºयांना २२ कोटी ५२ लाख ६४ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले असून, पाथरी तालुक्यातील ५८ गावांमधील ३७ हजार १०१ शेकºयांना २४ कोटी ३९ लाख ४६ हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आाहे़ मानवत तालुक्यातील ५४ गावांमधील ३२ हजार २६६ शेतकºयांना २४ कोटी ७८ लाख ६८ हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले असून, सोनपेठ तालुक्यातमील ६० गावांमधील २७ हजार ५७९ शेतकºयांना २० कोटी ४१ लाख ८० हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे़ सेलू तालुक्यातील ९४ गावांमधील ४८ हजार ७२७ शेतकºयांना ३५ कोटी ३३ लाख ५८ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे़आणखी २३ कोटी ५६ लाखांची गरज४जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत १८१ कोटी ४६ लाख रुपयांचे अनुदान वाटप केले असले तरी आणखी जिल्ह्यातील ८४ गावांसाठी २३ कोटी ५६ लाख ६ हजार रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे़ त्यामध्ये परभणी तालुक्यातील १९ गावांसाठी ७६ लाख २१ हजार, पालम तालुक्यातील २४ गावांसाठी ६ कोटी ७ हजार, पाथरी तालुक्यातील १४ गावांसाठी ८ कोटी ९० लाख, मानवत तालुक्यातील ४ गावांसाठी २ कोटी, सोनपेठ तालुक्यातील ४ गावांसाठी ५४ लाख ८० हजार, सेलू तालुक्यातील १९ गावांसाठी ५ कोटी २७ लाख २५ हजार रुपयांची आवश्यकता आहे, तशी मागणी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे नोंदविली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीfundsनिधी