शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
ICAI CA Toppers 2025: मुंबईचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
3
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
4
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
5
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
6
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
7
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
8
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
9
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
10
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
11
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
12
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
13
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
14
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
15
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
16
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
17
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
18
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
19
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
20
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)

परभणी : रबीचे दोन लाख हेक्टर क्षेत्र राहणार पडिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 00:38 IST

कृषी विभागाने २०१८-१९ च्या रबी हंगामाच्या पेरणीसाठी २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे़; परंतु, जिल्ह्यात परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने यावर्षी २ लाख हेक्टर क्षेत्र पेरणीविना पडिक राहणार आहे़ त्यामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागणार आहे़

मारोती जुंबडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कृषी विभागाने २०१८-१९ च्या रबी हंगामाच्या पेरणीसाठी २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे़; परंतु, जिल्ह्यात परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने यावर्षी २ लाख हेक्टर क्षेत्र पेरणीविना पडिक राहणार आहे़ त्यामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागणार आहे़यावर्षीच्या खरीप हंगामात पेरणी केलेली सोयाबीन, कापूस, मूग व उडीद ही पिके पावसाअभावी शेतकºयांच्या हातून गेली आहेत़ त्यामुळे उसणवारी करून पिकांवर खर्च केला़ परंतु, उत्पादनातून तेवढे पैसेही शेतकºयांच्या हाती लागले नाहीत़ त्यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकºयांच्या आशा परतीच्या पावसावर होत्या़ परंतु, आॅक्टोबर संपत आला तरीही जिल्ह्यात परतीचा पाऊस झाला नाही़ परिणामी कृषी विभागाने २०१८-१९ च्या रबी हंगामासाठी २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे़ यामध्ये ज्वारी पिकासाठी १ लाख ११ हजार ९६०, गव्हासाठी ३७ हजार २९६, हरभºयासाठी १ लाख २३ हजार ३९०, करडईसाठी २ हजार ५४९ तर मक्यासाठी १८ हजार ३८ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे; परंतु, या वर्षीच्या पावसाळ्यात एकही समाधानकारक पाऊस झाला नाही़ त्यातच परतीच्या पावसानेही पाठ फिरविली आहे़त्यामुळे विहीर, नदी, तलाव, ओढे यांना पाणीच आले नाही़ जिल्ह्यातील शेतकºयांसाठी वरदान ठरलेला निम्न दूधना प्रकल्प व येलदरी धरणातही समाधानकारक पाणीसाठा झाला नाही़ त्यामुळे या धरणातील पाणी शेतकºयांना रबी हंगामातील पिके जगविण्यासाठी उपलब्ध होणार नाही़ सध्या शेतकºयांनी खरिप हंगामातील पिकांची विल्हेवाट लावून रबी हंगामातील पेरणीसाठी शेतजमीन तयार केली आहे़; परंतु, २० आॅगस्टपासून जिल्ह्यात पाऊस झालेला नाही़ त्यामुळे ठिक ठिकाणी जमीन भेगाळली आहे़ या जमिनीवर पेरणी करावी कशी? असा प्रश्न शेतकºयांसमोर उभा आहे़ ज्या शेतकºयांकडे सध्या पाणी उपलब्ध आहे; परंतु, हे पाणी रबी हंगामातील सिंचनासाठी पुरेल की नाही या भीतीने शेतकºयांनी चाढ्यावर मूठ धरली नाही़२१ आॅक्टोबरपर्यंत जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे एकरभर क्षेत्रावरही पेरणी झाल्याची नोंद नाही़ त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास २ लाख हेक्टर क्षेत्र पेरणीविना पडिक राहणार आहे़ यावर्षीचा रबी हंगाम शेतकºयांची अग्नीपरीक्षा पाहणारा ठरणार आहे़कृषी निविष्टा व्यवसायही धोक्यात४यावर्षीच्या रबी हंगामात कृषी विभागाने केलेल्या नियोजनानुसार शेतकºयांना बियाणांची कमतरता भासू नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागानेही ४२ हजार ५६९ क्विंटल बियाणांचे नियोजन केले आहे़ त्याचबरोबर हजारो मे़ टन खतही उपलब्ध आहे़ परंतु, २१ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यात कोठेच पेरणी झाली नसल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील ११ बाजार समित्यांच्या मार्केटयार्डात लाखो रुपयांच्या कृषी निविष्टा पडून असल्याने व्यापाºयांची चिंताही वाढली आहे़४ खरिपापाठोपाठ रबी हंगामही शेतकºयांच्या हातून गेला आहे़ त्यामुळे येणारे आर्थिक वर्ष शेतकºयांसाठी प्रशासन व शासन यांच्या मदतीवरच अवलंबून आहे़ शेतकºयांच्या पडत्या काळात शासनाने मदत केल्यास शेतकºयांना धीर मिळणार आहे़१० टक्के क्षेत्रावरच होणार पेराकृषी विभागाने २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्र म्हणजेच पावणेतीन लाख हेक्टर क्षेत्र रबी हंगामासाठी प्रस्तावित केले आह; परंतु, गेल्या अडीच महिन्यांपासून जिल्ह्यात पावसाचा थेंबही बरसला नाही़ त्यामुळे जिल्ह्यातील केवळ १० टक्के क्षेत्रावरच उपलब्ध पाण्यावर पेरणी होऊ शकते, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला़ त्यामुळे येणारा काळ शेतकºयांसाठी कठीण राहणार आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीRainपाऊस