शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
Video - एक, दोन नव्हे तर चोरांची अख्खी गँगच; काही सेकंदात खिशातून लंपास केला फोन अन्...
5
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
6
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
7
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
8
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
9
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
10
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
11
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
12
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
13
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
14
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
15
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
16
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
17
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
18
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
19
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
20
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  

परभणी : रबीचे दोन लाख हेक्टर क्षेत्र राहणार पडिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 00:38 IST

कृषी विभागाने २०१८-१९ च्या रबी हंगामाच्या पेरणीसाठी २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे़; परंतु, जिल्ह्यात परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने यावर्षी २ लाख हेक्टर क्षेत्र पेरणीविना पडिक राहणार आहे़ त्यामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागणार आहे़

मारोती जुंबडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कृषी विभागाने २०१८-१९ च्या रबी हंगामाच्या पेरणीसाठी २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे़; परंतु, जिल्ह्यात परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने यावर्षी २ लाख हेक्टर क्षेत्र पेरणीविना पडिक राहणार आहे़ त्यामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागणार आहे़यावर्षीच्या खरीप हंगामात पेरणी केलेली सोयाबीन, कापूस, मूग व उडीद ही पिके पावसाअभावी शेतकºयांच्या हातून गेली आहेत़ त्यामुळे उसणवारी करून पिकांवर खर्च केला़ परंतु, उत्पादनातून तेवढे पैसेही शेतकºयांच्या हाती लागले नाहीत़ त्यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकºयांच्या आशा परतीच्या पावसावर होत्या़ परंतु, आॅक्टोबर संपत आला तरीही जिल्ह्यात परतीचा पाऊस झाला नाही़ परिणामी कृषी विभागाने २०१८-१९ च्या रबी हंगामासाठी २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे़ यामध्ये ज्वारी पिकासाठी १ लाख ११ हजार ९६०, गव्हासाठी ३७ हजार २९६, हरभºयासाठी १ लाख २३ हजार ३९०, करडईसाठी २ हजार ५४९ तर मक्यासाठी १८ हजार ३८ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे; परंतु, या वर्षीच्या पावसाळ्यात एकही समाधानकारक पाऊस झाला नाही़ त्यातच परतीच्या पावसानेही पाठ फिरविली आहे़त्यामुळे विहीर, नदी, तलाव, ओढे यांना पाणीच आले नाही़ जिल्ह्यातील शेतकºयांसाठी वरदान ठरलेला निम्न दूधना प्रकल्प व येलदरी धरणातही समाधानकारक पाणीसाठा झाला नाही़ त्यामुळे या धरणातील पाणी शेतकºयांना रबी हंगामातील पिके जगविण्यासाठी उपलब्ध होणार नाही़ सध्या शेतकºयांनी खरिप हंगामातील पिकांची विल्हेवाट लावून रबी हंगामातील पेरणीसाठी शेतजमीन तयार केली आहे़; परंतु, २० आॅगस्टपासून जिल्ह्यात पाऊस झालेला नाही़ त्यामुळे ठिक ठिकाणी जमीन भेगाळली आहे़ या जमिनीवर पेरणी करावी कशी? असा प्रश्न शेतकºयांसमोर उभा आहे़ ज्या शेतकºयांकडे सध्या पाणी उपलब्ध आहे; परंतु, हे पाणी रबी हंगामातील सिंचनासाठी पुरेल की नाही या भीतीने शेतकºयांनी चाढ्यावर मूठ धरली नाही़२१ आॅक्टोबरपर्यंत जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे एकरभर क्षेत्रावरही पेरणी झाल्याची नोंद नाही़ त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास २ लाख हेक्टर क्षेत्र पेरणीविना पडिक राहणार आहे़ यावर्षीचा रबी हंगाम शेतकºयांची अग्नीपरीक्षा पाहणारा ठरणार आहे़कृषी निविष्टा व्यवसायही धोक्यात४यावर्षीच्या रबी हंगामात कृषी विभागाने केलेल्या नियोजनानुसार शेतकºयांना बियाणांची कमतरता भासू नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागानेही ४२ हजार ५६९ क्विंटल बियाणांचे नियोजन केले आहे़ त्याचबरोबर हजारो मे़ टन खतही उपलब्ध आहे़ परंतु, २१ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यात कोठेच पेरणी झाली नसल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील ११ बाजार समित्यांच्या मार्केटयार्डात लाखो रुपयांच्या कृषी निविष्टा पडून असल्याने व्यापाºयांची चिंताही वाढली आहे़४ खरिपापाठोपाठ रबी हंगामही शेतकºयांच्या हातून गेला आहे़ त्यामुळे येणारे आर्थिक वर्ष शेतकºयांसाठी प्रशासन व शासन यांच्या मदतीवरच अवलंबून आहे़ शेतकºयांच्या पडत्या काळात शासनाने मदत केल्यास शेतकºयांना धीर मिळणार आहे़१० टक्के क्षेत्रावरच होणार पेराकृषी विभागाने २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्र म्हणजेच पावणेतीन लाख हेक्टर क्षेत्र रबी हंगामासाठी प्रस्तावित केले आह; परंतु, गेल्या अडीच महिन्यांपासून जिल्ह्यात पावसाचा थेंबही बरसला नाही़ त्यामुळे जिल्ह्यातील केवळ १० टक्के क्षेत्रावरच उपलब्ध पाण्यावर पेरणी होऊ शकते, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला़ त्यामुळे येणारा काळ शेतकºयांसाठी कठीण राहणार आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीRainपाऊस