शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
5
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
6
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
7
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
8
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
9
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
10
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
11
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
12
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
13
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
14
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
15
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
16
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
17
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
18
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
19
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
20
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!

परभणी : रबीचे दोन लाख हेक्टर क्षेत्र राहणार पडिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 00:38 IST

कृषी विभागाने २०१८-१९ च्या रबी हंगामाच्या पेरणीसाठी २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे़; परंतु, जिल्ह्यात परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने यावर्षी २ लाख हेक्टर क्षेत्र पेरणीविना पडिक राहणार आहे़ त्यामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागणार आहे़

मारोती जुंबडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कृषी विभागाने २०१८-१९ च्या रबी हंगामाच्या पेरणीसाठी २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे़; परंतु, जिल्ह्यात परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने यावर्षी २ लाख हेक्टर क्षेत्र पेरणीविना पडिक राहणार आहे़ त्यामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागणार आहे़यावर्षीच्या खरीप हंगामात पेरणी केलेली सोयाबीन, कापूस, मूग व उडीद ही पिके पावसाअभावी शेतकºयांच्या हातून गेली आहेत़ त्यामुळे उसणवारी करून पिकांवर खर्च केला़ परंतु, उत्पादनातून तेवढे पैसेही शेतकºयांच्या हाती लागले नाहीत़ त्यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकºयांच्या आशा परतीच्या पावसावर होत्या़ परंतु, आॅक्टोबर संपत आला तरीही जिल्ह्यात परतीचा पाऊस झाला नाही़ परिणामी कृषी विभागाने २०१८-१९ च्या रबी हंगामासाठी २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे़ यामध्ये ज्वारी पिकासाठी १ लाख ११ हजार ९६०, गव्हासाठी ३७ हजार २९६, हरभºयासाठी १ लाख २३ हजार ३९०, करडईसाठी २ हजार ५४९ तर मक्यासाठी १८ हजार ३८ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे; परंतु, या वर्षीच्या पावसाळ्यात एकही समाधानकारक पाऊस झाला नाही़ त्यातच परतीच्या पावसानेही पाठ फिरविली आहे़त्यामुळे विहीर, नदी, तलाव, ओढे यांना पाणीच आले नाही़ जिल्ह्यातील शेतकºयांसाठी वरदान ठरलेला निम्न दूधना प्रकल्प व येलदरी धरणातही समाधानकारक पाणीसाठा झाला नाही़ त्यामुळे या धरणातील पाणी शेतकºयांना रबी हंगामातील पिके जगविण्यासाठी उपलब्ध होणार नाही़ सध्या शेतकºयांनी खरिप हंगामातील पिकांची विल्हेवाट लावून रबी हंगामातील पेरणीसाठी शेतजमीन तयार केली आहे़; परंतु, २० आॅगस्टपासून जिल्ह्यात पाऊस झालेला नाही़ त्यामुळे ठिक ठिकाणी जमीन भेगाळली आहे़ या जमिनीवर पेरणी करावी कशी? असा प्रश्न शेतकºयांसमोर उभा आहे़ ज्या शेतकºयांकडे सध्या पाणी उपलब्ध आहे; परंतु, हे पाणी रबी हंगामातील सिंचनासाठी पुरेल की नाही या भीतीने शेतकºयांनी चाढ्यावर मूठ धरली नाही़२१ आॅक्टोबरपर्यंत जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे एकरभर क्षेत्रावरही पेरणी झाल्याची नोंद नाही़ त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास २ लाख हेक्टर क्षेत्र पेरणीविना पडिक राहणार आहे़ यावर्षीचा रबी हंगाम शेतकºयांची अग्नीपरीक्षा पाहणारा ठरणार आहे़कृषी निविष्टा व्यवसायही धोक्यात४यावर्षीच्या रबी हंगामात कृषी विभागाने केलेल्या नियोजनानुसार शेतकºयांना बियाणांची कमतरता भासू नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागानेही ४२ हजार ५६९ क्विंटल बियाणांचे नियोजन केले आहे़ त्याचबरोबर हजारो मे़ टन खतही उपलब्ध आहे़ परंतु, २१ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यात कोठेच पेरणी झाली नसल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील ११ बाजार समित्यांच्या मार्केटयार्डात लाखो रुपयांच्या कृषी निविष्टा पडून असल्याने व्यापाºयांची चिंताही वाढली आहे़४ खरिपापाठोपाठ रबी हंगामही शेतकºयांच्या हातून गेला आहे़ त्यामुळे येणारे आर्थिक वर्ष शेतकºयांसाठी प्रशासन व शासन यांच्या मदतीवरच अवलंबून आहे़ शेतकºयांच्या पडत्या काळात शासनाने मदत केल्यास शेतकºयांना धीर मिळणार आहे़१० टक्के क्षेत्रावरच होणार पेराकृषी विभागाने २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्र म्हणजेच पावणेतीन लाख हेक्टर क्षेत्र रबी हंगामासाठी प्रस्तावित केले आह; परंतु, गेल्या अडीच महिन्यांपासून जिल्ह्यात पावसाचा थेंबही बरसला नाही़ त्यामुळे जिल्ह्यातील केवळ १० टक्के क्षेत्रावरच उपलब्ध पाण्यावर पेरणी होऊ शकते, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला़ त्यामुळे येणारा काळ शेतकºयांसाठी कठीण राहणार आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीRainपाऊस