शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

परभणीचा प्रश्न गंभीर : २५ दिवसांचेच पाणी शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 23:53 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहटी येथील बंधाºयात केवळ २५ दिवसांचेच पाणी शिल्लक असून, आगामी काळातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पाण्याचे नियोजन केले आहे़ या नियोजनावर १७ आॅक्टोबर रोजी मुंबईत होणाºया बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहटी येथील बंधाºयात केवळ २५ दिवसांचेच पाणी शिल्लक असून, आगामी काळातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पाण्याचे नियोजन केले आहे़ या नियोजनावर १७ आॅक्टोबर रोजी मुंबईत होणाºया बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे़परभणी शहराला पाणीपुरवठा करणाºया राहटी बंधाºयामध्ये पाणी संपत आले आहे़ सध्या या बंधाºयात केवळ २५ ते ३० दिवस पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे़ बंधाºयातील उपलब्ध पाणी जास्तीत जास्त दिवस पुरविण्यासाठी प्रशासनाला कडक उपाययोजना कराव्या लागणार आहेत़ जिल्ह्यात यावर्षी सरासरीच्या तुलनेत ४० टक्के पाऊस कमी झाल्याने पाणी टंचाईचे संकट आतापासूनच गंभीर होत चालले आहे़ पुढील वर्षातील पावसाळ्यापर्यंत उपलब्ध पाणी वापरावे लागणार असल्याने आतापासूनच पाणी आरक्षणाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत़ दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात बैठक झाली़ या बैठकीत महानगरपालिका प्रशासनाने परभणी शहरासाठी पुढील वर्षातील जुलै महिन्यापर्यंत ८ दलघमी पाणी लागेल, असा अहवाल दिला आहे़ परभणी शहराला येलदरी येथील धरणातून पाणी घेतले जाते़ येलदरी प्रकल्पात पाणीसाठा जमा झाला नसल्याने दोन वर्षांपासून येलदरी प्रकल्पातून राहटी बंधाºयासाठी पाणी मिळत नाही़ परिणामी शहरवासियांना निम्न दूधना प्रकल्पातून पाणी घ्यावे लागते़ मात्र यावर्षी निम्न दूधना प्रकल्पातही पुरेसा पाणीसाठा नसल्याने या प्रकल्पातून किती पाणी मिळते? यावरच परभणीकरांच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे़ दरम्यान, महानगरपालिकेने केलेल्या नियोजनानुसार येलदरी प्रकल्पातून चार पाणी पाळ्या आणि निम्न दूधना प्रकल्पातून दोन पाणी पाळ्या घेण्याचे निश्चित केले आहे़ हा अहवाल जिल्हाधिकाºयांकडे सादर केला असून, बुधवारी मुंबई येथे पाणी आरक्षणाच्या संदर्भात आयोजित बैठकीत या आरक्षणाला मंजुरी मिळणार आहे़ राहटी येथील बंधाºयाची पाणी साठवण क्षमता १़५२ दलघमी एवढी आहे़ एक पाणी पाळी घेतल्यानंतर शहरवासियांना ४५ दिवस हे पाणी पुरते़ साधारणत: ८ दलघमी पाणी शहराला लागणार आहे़असे करावे : लागेल आरक्षणजुलै महिन्यापर्यंत परभणी शहराला ८ दलघमी पाणी लागणार आहे़ राहटी बंधाºयात ८ दलघमी पाणी घेण्यासाठी प्रत्यक्षात प्रकल्पांमध्ये तिप्पट पाण्याचे आरक्षण करावे लागते़ परभणी शहराला येलदरी धरणातून पाण्याचे आरक्षण केल्यास येलदरी धरणाचे पाणी सिद्धेश्वर धरणात सोडले जाते़ सिद्धेश्वरपासून राहटी बंधारा ४७ किमी अंतरावर आहे़ प्रत्येक पाणी पाळीच्या वेळी १ दलघमी पाणी घेतले जाते़ हे पाणी बंधाºयात पोहचण्यासाठी प्रकल्पातून किमान ५ ते ७ दलघमी पाणी सोडावे लागते़ तसेच निम्न दूधना प्रकल्पातून पाणी घेण्यासाठीही आरक्षित पाण्याच्या तुलनेत तीनपट अधिक पाणी नदीपात्रात सोडावे लागते़ निम्न दूधना प्रकल्पापासून राहटी बंधारा ६५ किमी अंतरावर असून, या अंतरानुसार आरक्षित पाणी देण्यासाठी त्या पटीने नदीपात्रात पाणी सोडावे लागते़बंधाºयाच्या प्लेट बदलणारराहटी बंधाºयाच्या निर्मितीपासून आजपर्यंत प्लेट बदलल्या नाहीत़ त्यामुळे जुन्या झालेल्या या प्लेटमधून पाण्याची गळती होत असल्याने नवीन प्लेट टाकण्याचे नियोजन वसमत येथील पूर्णा पाटबंधारे विभागाने तयार केले आहे़ सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा संपल्यानंतर बंधाºयाच्या प्लेट बदलण्याचे काम हाती घेतले जाणार आहे, अशी माहिती मिळाली़

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीDamधरण