शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

परभणी : पीक विम्यासाठी केंद्रचालकांकडून शेतकऱ्यांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:52 AM

तालुक्यात दुष्काळी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी खरीप हंगामातील पीक विमा भरण्यासाठी शहरातील आॅनलाईन केंद्रावर गर्दी करू लागले आहेत. या गर्दीचा फायदा घेत केंद्र चालकांकडून १०० ते १५० रुपयांची लूट केली जात असल्याचा प्रकार सर्रास दिसून येत आहे. या प्रकाराकडे मात्र महसूल यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याने केंद्रचालकांचे चांगलेच फावत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : तालुक्यात दुष्काळी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी खरीप हंगामातील पीक विमा भरण्यासाठी शहरातील आॅनलाईन केंद्रावर गर्दी करू लागले आहेत. या गर्दीचा फायदा घेत केंद्र चालकांकडून १०० ते १५० रुपयांची लूट केली जात असल्याचा प्रकार सर्रास दिसून येत आहे. या प्रकाराकडे मात्र महसूल यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याने केंद्रचालकांचे चांगलेच फावत आहे.पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत विमा भरण्यासाठी शासनाने २४ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. सुरुवातीला पीक विमा भरण्यासाठी शेतकरी फारसे आॅनलाईन केंद्राकडे फिरकले नाहीत. मात्र पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला आहे; परंतु, अद्यापही तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. पेरणी केलेल्या पिकांची उगवण झाली असून, या पिकांना सध्या पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आता परिस्थिती बिकट बनणार असे चित्र दिसू लागले आहे. त्यामुळे पीक विमा भरण्यासाठी शेवटच्या टप्प्यात शेतकऱ्यांनी लगबग सुरू केली आहे.मागील काही दिवसांपासून तलाठी संपर्क कार्यालये आणि आॅनलाईन केंदे्र फुलून गेली आहेत.दिवसभर आॅनलाईन केंद्रावर थांबूनही अनेकांचे अर्ज भरले जात नाहीत. अशा शेतकºयांकडून अर्ज भरून घेण्यासाठी केंद्र चालकांकडून एका अर्जासाठी १०० ते १५० रुपये जास्तीचे आकारले जात आहेत. यासाठी कोणतीही पावती दिली जात नाही. त्यामुळे एकीकडे शेतकºयांची लूट होत असताना दुसरीकडे महसूल प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकºयांतून होत आहे.सातबारा काढण्यासाठी तलाठ्यांकडे गर्दी४पीक विमा भरण्यासाठी आॅनलाईन सातबारा आवश्यक आहे. मात्र सेतू सुविधा केंद्रावर आता आॅनलाईन सातबारा देणे बंद करण्यात आल्याने तलाठ्यांकडूनच आॅनलाईन सातबारा घ्याव्या लागत आहे. विशेष म्हणजे एका तलाठ्याकडे चार ते पाच गावे येत असल्याने सातबारा काढण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. परिणामी सातबारा वेळेवर मिळत नाहीत.४या सातबारा वेळेवर मिळत नसल्याने शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानंतर २४ जुलैपर्यंत सर्वच तलाठ्यांनी मुख्यालयी हजर राहून कागदपत्रे वितरित करावीत, बायोमेट्रिक हजेरी नोंदवावी, असे आदेश जिल्हाधिकाºयांनी काढले आहेत. त्यामुळे आता तरी शेतकºयांना वेळेत सातबारा मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा