शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

परभणी : टंचाई स्थितीत शासन जनतेसोबत-लोणीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:51 IST

कमी पावसामुळे उद्भवलेल्या स्थितीमध्ये प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींनी जनता व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काम करावे, शासन टंचाईस्थितीमध्ये जनतेसोबत आहे, असे प्रतिपादन पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी शुक्रवारी येथे आयोजित बैठकीत केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कमी पावसामुळे उद्भवलेल्या स्थितीमध्ये प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींनी जनता व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काम करावे, शासन टंचाईस्थितीमध्ये जनतेसोबत आहे, असे प्रतिपादन पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी शुक्रवारी येथे आयोजित बैठकीत केले.जिल्हाधिकारी कार्यालयात पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत टंचाईच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी पी. शिव शंकर, जि.प. सीईओं बी.पी. पृथ्वीराज, जि.प.अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना लोणीकर म्हणाले की, राज्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक येणार आहे. सद्यस्थितीमध्ये पाणी, चारा यासाठी प्राधान्य दिले जात आहे. मराठवाड्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे. या अनुषंगाने प्रशासकीय यंत्रणा काम करीत आहे. केंद्र शासनाने उपग्रहाद्वारे देखील परिस्थितीची पाहणी केली आहे. विविध यंत्रणांकडून याबाबत माहिती घेतली जात आहे. याचा दुष्काळी उपाययोजना व मदतीसाठी उपयोग होणार आहे. प्रशासनातील तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, कृषी, गटविकास अधिकाºयांनी वस्तुस्थिती जिल्हाधिकाºयांकडे सादर करावी, असेही ते म्हणाले. सिंचनासाठी आलेला निधी वेळेवर खर्च करावा, असेही ते म्हणाले.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी पिनाटे यांनी जिल्ह्यातील पाऊस, दुष्काळाची झळ बसलेल्या तालुक्यांची माहिती सादर केली. जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, मग्रारोहयो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आदी योजनांचा आढावा घेण्यात आला.पीक परिस्थितीची विविध ठिकाणी पाहणी४लोणीकर यांनी शुक्रवारी जिंतूर तालुक्यातील गणेशपूर तसेच सेलू तालुक्यातील तळतुंबा व परभणी तालुक्यातील गावांना भेटी देऊन पीक परिस्थितीची पाहणी केली. यावेळी शेतकºयांनी त्यांना खरीप हंगाम हातचा गेला, आता रब्बीसाठीही पाऊस नाही. त्यामुळे दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीBabanrao Looneykarबबनराव लोणीकरWaterपाणीRainपाऊस