शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

परभणी : टंचाई स्थितीत शासन जनतेसोबत-लोणीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:51 IST

कमी पावसामुळे उद्भवलेल्या स्थितीमध्ये प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींनी जनता व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काम करावे, शासन टंचाईस्थितीमध्ये जनतेसोबत आहे, असे प्रतिपादन पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी शुक्रवारी येथे आयोजित बैठकीत केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कमी पावसामुळे उद्भवलेल्या स्थितीमध्ये प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींनी जनता व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काम करावे, शासन टंचाईस्थितीमध्ये जनतेसोबत आहे, असे प्रतिपादन पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी शुक्रवारी येथे आयोजित बैठकीत केले.जिल्हाधिकारी कार्यालयात पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत टंचाईच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी पी. शिव शंकर, जि.प. सीईओं बी.पी. पृथ्वीराज, जि.प.अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना लोणीकर म्हणाले की, राज्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक येणार आहे. सद्यस्थितीमध्ये पाणी, चारा यासाठी प्राधान्य दिले जात आहे. मराठवाड्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे. या अनुषंगाने प्रशासकीय यंत्रणा काम करीत आहे. केंद्र शासनाने उपग्रहाद्वारे देखील परिस्थितीची पाहणी केली आहे. विविध यंत्रणांकडून याबाबत माहिती घेतली जात आहे. याचा दुष्काळी उपाययोजना व मदतीसाठी उपयोग होणार आहे. प्रशासनातील तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, कृषी, गटविकास अधिकाºयांनी वस्तुस्थिती जिल्हाधिकाºयांकडे सादर करावी, असेही ते म्हणाले. सिंचनासाठी आलेला निधी वेळेवर खर्च करावा, असेही ते म्हणाले.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी पिनाटे यांनी जिल्ह्यातील पाऊस, दुष्काळाची झळ बसलेल्या तालुक्यांची माहिती सादर केली. जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, मग्रारोहयो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आदी योजनांचा आढावा घेण्यात आला.पीक परिस्थितीची विविध ठिकाणी पाहणी४लोणीकर यांनी शुक्रवारी जिंतूर तालुक्यातील गणेशपूर तसेच सेलू तालुक्यातील तळतुंबा व परभणी तालुक्यातील गावांना भेटी देऊन पीक परिस्थितीची पाहणी केली. यावेळी शेतकºयांनी त्यांना खरीप हंगाम हातचा गेला, आता रब्बीसाठीही पाऊस नाही. त्यामुळे दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीBabanrao Looneykarबबनराव लोणीकरWaterपाणीRainपाऊस