शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

परभणी : कापसीकरांचे पिण्याच्या पाण्यासाठी होताहेत हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 23:42 IST

मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तन अभियानामध्ये तालुक्यातील कापशी या गावाची निवड करण्यात आली आहे. या अभियानात मागील दोन वर्षापासून गावात कामे चालू आहेत; परंतु, अद्यापही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही. पिण्याच्या पाण्यासाठी कापशीकरांचे अतोनात हाल होत असून घागरभर पाण्यासाठी ग्रामस्थ व महिलांंना २ कि.मी.ची पायपीट करीत भटकंती करावी लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तन अभियानामध्ये तालुक्यातील कापशी या गावाची निवड करण्यात आली आहे. या अभियानात मागील दोन वर्षापासून गावात कामे चालू आहेत; परंतु, अद्यापही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही. पिण्याच्या पाण्यासाठी कापशीकरांचे अतोनात हाल होत असून घागरभर पाण्यासाठी ग्रामस्थ व महिलांंना २ कि.मी.ची पायपीट करीत भटकंती करावी लागत आहे.गंगाखेड ते पालम राष्ट्रीय महामार्गापासून २ कि.मी. अंतरावर कापशी हे गाव आहे. या गावची लोकसंख्या १२०० असून पिण्याच्या पाण्यासाठी गावाशेजारच्या पाझर तलावावर अवलंबून राहावे लागते. २०१६ मध्ये शासनाने मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तन अभियानात या गावाची निवड केली आहे. या अभियानात निवड झाल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासह गावातील प्रश्न सुटतील अशी अपेक्षा होती; परंतु, अद्यापही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. पाझर तलाव आटल्याने व गावाजवळून गेलेली नदी कोरडी पडल्याने गावाच्या शिवारात पाण्याची पातळी कमालीची घटली आहे. जलसंधारणाची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. दुष्काळ पडल्याने गावाजवळ पिण्याच्या पाण्याचे स्रोत नसल्याने तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. घागरभर पाण्यासाठी रात्रंदिवस जागरण करून २ कि.मी. पायपीट जानेवारी महिन्यापासून सुरू झाली आहे. आणखी दोन महिने पिण्याच्या पाण्यासाठी काय होणार? या भितीने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. शासनाने ग्रामपरिवर्तन अभियानात गावाची निवड करूनही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मात्र सुटलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. याकडे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने लक्ष देऊन कापसीमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.खाजगी टँकरवर भागतेय तहानपिण्याच्या पाण्यासाठी गावानजिक पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत. पालम शहरातून पिण्याच्या पाण्यासाठी खासगी टँकर बोलविण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. एका टँकरला २ हजार रुपये खर्च करून ७ हजार लिटर पाणी विकत घ्यावे लागत आहे. दोन-तीन कुटुंब एकत्र येऊन खासगी टँकर मागून घेत आहेत. त्यामुळे दुष्काळाच्या संकटात ग्रामस्थांच्या खिशाला झळ बसत आहे.अधिग्रहणाचे प्रस्ताव देऊनही दुर्लक्षपिण्याच्या पाण्यासाठी मागील महिनाभरापासून पंचायत समितीकडे टँकर व विंधन विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे; परंतु, या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. अधिकारी व कर्मचारी निवडणुकीचे काम सांगून प्रस्तावाकडे दुर्लक्ष करीत आहेत. उपविभागीय अधिकारी कार्यालयात तर कर्मचारी ग्रामस्थांना माहिती देताना उडवा-उडवीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी संकटाचा सामना करावा लागत आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष नामदेव जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई