शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
3
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
4
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
5
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
6
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
7
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
8
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
9
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
10
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
11
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
12
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
13
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
14
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
15
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
16
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
17
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
18
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?
19
Budh Gochar 2025: दसऱ्याला बाराही राशी सौभाग्याचे सोने लुटणार, बुध गोचर भाग्य पालटणार
20
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश

परभणी : कापसीकरांचे पिण्याच्या पाण्यासाठी होताहेत हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 23:42 IST

मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तन अभियानामध्ये तालुक्यातील कापशी या गावाची निवड करण्यात आली आहे. या अभियानात मागील दोन वर्षापासून गावात कामे चालू आहेत; परंतु, अद्यापही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही. पिण्याच्या पाण्यासाठी कापशीकरांचे अतोनात हाल होत असून घागरभर पाण्यासाठी ग्रामस्थ व महिलांंना २ कि.मी.ची पायपीट करीत भटकंती करावी लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तन अभियानामध्ये तालुक्यातील कापशी या गावाची निवड करण्यात आली आहे. या अभियानात मागील दोन वर्षापासून गावात कामे चालू आहेत; परंतु, अद्यापही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही. पिण्याच्या पाण्यासाठी कापशीकरांचे अतोनात हाल होत असून घागरभर पाण्यासाठी ग्रामस्थ व महिलांंना २ कि.मी.ची पायपीट करीत भटकंती करावी लागत आहे.गंगाखेड ते पालम राष्ट्रीय महामार्गापासून २ कि.मी. अंतरावर कापशी हे गाव आहे. या गावची लोकसंख्या १२०० असून पिण्याच्या पाण्यासाठी गावाशेजारच्या पाझर तलावावर अवलंबून राहावे लागते. २०१६ मध्ये शासनाने मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तन अभियानात या गावाची निवड केली आहे. या अभियानात निवड झाल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासह गावातील प्रश्न सुटतील अशी अपेक्षा होती; परंतु, अद्यापही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. पाझर तलाव आटल्याने व गावाजवळून गेलेली नदी कोरडी पडल्याने गावाच्या शिवारात पाण्याची पातळी कमालीची घटली आहे. जलसंधारणाची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. दुष्काळ पडल्याने गावाजवळ पिण्याच्या पाण्याचे स्रोत नसल्याने तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. घागरभर पाण्यासाठी रात्रंदिवस जागरण करून २ कि.मी. पायपीट जानेवारी महिन्यापासून सुरू झाली आहे. आणखी दोन महिने पिण्याच्या पाण्यासाठी काय होणार? या भितीने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. शासनाने ग्रामपरिवर्तन अभियानात गावाची निवड करूनही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मात्र सुटलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. याकडे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने लक्ष देऊन कापसीमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.खाजगी टँकरवर भागतेय तहानपिण्याच्या पाण्यासाठी गावानजिक पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत. पालम शहरातून पिण्याच्या पाण्यासाठी खासगी टँकर बोलविण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. एका टँकरला २ हजार रुपये खर्च करून ७ हजार लिटर पाणी विकत घ्यावे लागत आहे. दोन-तीन कुटुंब एकत्र येऊन खासगी टँकर मागून घेत आहेत. त्यामुळे दुष्काळाच्या संकटात ग्रामस्थांच्या खिशाला झळ बसत आहे.अधिग्रहणाचे प्रस्ताव देऊनही दुर्लक्षपिण्याच्या पाण्यासाठी मागील महिनाभरापासून पंचायत समितीकडे टँकर व विंधन विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे; परंतु, या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. अधिकारी व कर्मचारी निवडणुकीचे काम सांगून प्रस्तावाकडे दुर्लक्ष करीत आहेत. उपविभागीय अधिकारी कार्यालयात तर कर्मचारी ग्रामस्थांना माहिती देताना उडवा-उडवीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी संकटाचा सामना करावा लागत आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष नामदेव जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई