शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

परभणी : टंचाई निवारणासाठी आता ३८ विंधन विहिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:40 IST

जिल्ह्यात निर्माण झालेली पाणी टंचाई दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी ३८ नवीन विंधन विहिरींचे खोदकाम करण्यास मंजुरी दिली आहे. १० मे रोजी या कामांना प्रशासकीय मान्यता दिली असून, या कामांवर सुमारे २२ लाख ११ हजार ४४८ रुपयांचा खर्च होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात निर्माण झालेली पाणी टंचाई दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी ३८ नवीन विंधन विहिरींचे खोदकाम करण्यास मंजुरी दिली आहे. १० मे रोजी या कामांना प्रशासकीय मान्यता दिली असून, या कामांवर सुमारे २२ लाख ११ हजार ४४८ रुपयांचा खर्च होणार आहे.मागील काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी पाणी टंचाईची तीव्रता वाढली आहे. आॅक्टोबर महिन्यापासूनच जिल्हावासिय पाण्यासाठी त्रासून गेले आहेत. ग्रामीण भागात ही परिस्थिती अधिकच गंभीर असल्याने विविध उपाययोजना करुन पाणी टंचाई निवारण्याचे प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून केले जात आहेत. टँकर, विहिरींचे अधिग्रहण, नळ पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती इ. कामे जिल्ह्यात सुरू झाली आहेत. काही भागात पाण्याचा कुठलाच स्त्रोत उपलब्ध नसल्याने नवीन विहिरी घेण्याशिवाय पर्याय नाही. ही बाब लक्षात घेऊन आता विंधन विहिरी घेण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच जिल्ह्यात विहिरींची कामे सुरू होतील.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून नवीन विंधन विहिरी घेण्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे प्राप्त झाले होते. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या सहायक भूवैज्ञानिकांनी तपासणी करुन खर्च व तांत्रिक बांबी तपासल्या असून, तहसीलदार आणि पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांनीही शिफारस केल्याने ३८ नवीन विंधन विहिरींच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे.एका विहिरीवर साधारणत: ५८ हजार १९६ रुपयांचा खर्च लागणार असून नवीन विंधन विहिरींची कामे पूर्ण झाल्यानंतर पाणी टंचाईवरील ताण काही प्रमाणात हलका होईल, अशी अपेक्षा आहे. सद्यस्थितीत सर्वच तालुक्यांत टंचाईने डोके वर काढले आहे. जिल्ह्यातील टंचाईचे गांभीर्य लक्षात घेता मंजुरी मिळालेल्या विहिरींची कामे तातडीने हाती घेऊन ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.तीन दिवसांत : पूर्ण करावे लागणार काम४नवीन विंधन विहिरींना मंजुरी देताना जिल्हाधिकाºयांनी काही अटी घालून दिल्या आहेत. निश्चित केलेल्या ठिकाणीच विंधन विहीर घ्यावी, विंधन विहिरींचे काम हातपंप उभारणीसह तीन दिवसंत पूर्ण करावे आणि तसा अहवाल या कार्यालयास सादर करावा, वाडी, वस्ती, तांडा यांची लोकसंख्या किमान ५० असावी.४नवीन विंधन विहिरींच्या परिसरात १ कि.मी. अंतरापर्यंत कोणत्याही पिण्याच्या पाण्याचे उद्भव असू नयेत, ६० मीटर खोलीपर्यंतच ही विंधन विहीर घेण्याचेही बंधन टाकण्यात आले आहे. २०० लोकसंख्येमागे एक विंधन विहीर घ्यावी. त्यानुसार गावाच्या लोकसंख्येच्या आणि पूर्वी घेतलेल्या आणि सद्यस्थितीत जिवंत विंधन विहिरींच्या संख्येचा विचार करुन नवीन विंधन विहिरीचे काम सुरू करावे.या गावांत होणार विंधन विहीर४मानवत तालुक्यात आंबेगाव (बु), थार, सारंगपूर, गंगाखेड तालुका- मसला, राणीसावरगाव, पाथरी तालुका - पाथरगव्हाण बु. (२), बाबुलतार, पोहेटाकळी, देगाव, विटा, लिंबा बनेवस्ती, बाभळगाव, गुंज खु., ढालेगाव.४पूर्णा तालुका- आवलगाव, कलमुला, एकरुखा, पेनूर, गौर, शिरकळस, हाटकरवाडी, धानोरा मोत्या, कावलगाव वाडी, फुलकळस, खडाळा, परभणी तालुका - पिंपळा, जलालपूर, खानापूर, बाभुळगाव, आंबेटाकळी, ब्रह्मपुरी तर्फे पाथरी, मांडवा, डफवाडी, मोहपुरी, पाथरा.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईdroughtदुष्काळ