शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

परभणी : टंचाई निवारणासाठी आता ३८ विंधन विहिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:40 IST

जिल्ह्यात निर्माण झालेली पाणी टंचाई दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी ३८ नवीन विंधन विहिरींचे खोदकाम करण्यास मंजुरी दिली आहे. १० मे रोजी या कामांना प्रशासकीय मान्यता दिली असून, या कामांवर सुमारे २२ लाख ११ हजार ४४८ रुपयांचा खर्च होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात निर्माण झालेली पाणी टंचाई दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी ३८ नवीन विंधन विहिरींचे खोदकाम करण्यास मंजुरी दिली आहे. १० मे रोजी या कामांना प्रशासकीय मान्यता दिली असून, या कामांवर सुमारे २२ लाख ११ हजार ४४८ रुपयांचा खर्च होणार आहे.मागील काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी पाणी टंचाईची तीव्रता वाढली आहे. आॅक्टोबर महिन्यापासूनच जिल्हावासिय पाण्यासाठी त्रासून गेले आहेत. ग्रामीण भागात ही परिस्थिती अधिकच गंभीर असल्याने विविध उपाययोजना करुन पाणी टंचाई निवारण्याचे प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून केले जात आहेत. टँकर, विहिरींचे अधिग्रहण, नळ पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती इ. कामे जिल्ह्यात सुरू झाली आहेत. काही भागात पाण्याचा कुठलाच स्त्रोत उपलब्ध नसल्याने नवीन विहिरी घेण्याशिवाय पर्याय नाही. ही बाब लक्षात घेऊन आता विंधन विहिरी घेण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच जिल्ह्यात विहिरींची कामे सुरू होतील.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून नवीन विंधन विहिरी घेण्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे प्राप्त झाले होते. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या सहायक भूवैज्ञानिकांनी तपासणी करुन खर्च व तांत्रिक बांबी तपासल्या असून, तहसीलदार आणि पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांनीही शिफारस केल्याने ३८ नवीन विंधन विहिरींच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे.एका विहिरीवर साधारणत: ५८ हजार १९६ रुपयांचा खर्च लागणार असून नवीन विंधन विहिरींची कामे पूर्ण झाल्यानंतर पाणी टंचाईवरील ताण काही प्रमाणात हलका होईल, अशी अपेक्षा आहे. सद्यस्थितीत सर्वच तालुक्यांत टंचाईने डोके वर काढले आहे. जिल्ह्यातील टंचाईचे गांभीर्य लक्षात घेता मंजुरी मिळालेल्या विहिरींची कामे तातडीने हाती घेऊन ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.तीन दिवसांत : पूर्ण करावे लागणार काम४नवीन विंधन विहिरींना मंजुरी देताना जिल्हाधिकाºयांनी काही अटी घालून दिल्या आहेत. निश्चित केलेल्या ठिकाणीच विंधन विहीर घ्यावी, विंधन विहिरींचे काम हातपंप उभारणीसह तीन दिवसंत पूर्ण करावे आणि तसा अहवाल या कार्यालयास सादर करावा, वाडी, वस्ती, तांडा यांची लोकसंख्या किमान ५० असावी.४नवीन विंधन विहिरींच्या परिसरात १ कि.मी. अंतरापर्यंत कोणत्याही पिण्याच्या पाण्याचे उद्भव असू नयेत, ६० मीटर खोलीपर्यंतच ही विंधन विहीर घेण्याचेही बंधन टाकण्यात आले आहे. २०० लोकसंख्येमागे एक विंधन विहीर घ्यावी. त्यानुसार गावाच्या लोकसंख्येच्या आणि पूर्वी घेतलेल्या आणि सद्यस्थितीत जिवंत विंधन विहिरींच्या संख्येचा विचार करुन नवीन विंधन विहिरीचे काम सुरू करावे.या गावांत होणार विंधन विहीर४मानवत तालुक्यात आंबेगाव (बु), थार, सारंगपूर, गंगाखेड तालुका- मसला, राणीसावरगाव, पाथरी तालुका - पाथरगव्हाण बु. (२), बाबुलतार, पोहेटाकळी, देगाव, विटा, लिंबा बनेवस्ती, बाभळगाव, गुंज खु., ढालेगाव.४पूर्णा तालुका- आवलगाव, कलमुला, एकरुखा, पेनूर, गौर, शिरकळस, हाटकरवाडी, धानोरा मोत्या, कावलगाव वाडी, फुलकळस, खडाळा, परभणी तालुका - पिंपळा, जलालपूर, खानापूर, बाभुळगाव, आंबेटाकळी, ब्रह्मपुरी तर्फे पाथरी, मांडवा, डफवाडी, मोहपुरी, पाथरा.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईdroughtदुष्काळ