शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

परभणी : सेलू तालुक्यातील बारा गावांतील नळ योजना बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:52 IST

तालुक्यातील विविध गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींनी तळ गाठला आहे. तसेच योजना कालबाह्य झाल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील बारा गावच्या नळ योजना बंद असल्याने आगामी काळात या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

मोहन बोराडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : तालुक्यातील विविध गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींनी तळ गाठला आहे. तसेच योजना कालबाह्य झाल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील बारा गावच्या नळ योजना बंद असल्याने आगामी काळात या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची चिन्हे आहेत.सेलू तालुक्यात ८२ ग्रामपंचायती असून या अंतर्गत वाड्यांची संख्या १९ आहे. ७८ गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेची कामे करण्यात आली आहेत. यातील अनेक गावांमध्ये कोट्यावधी रुपये खर्चून कायमस्वरुपी पाणीपुरवठा व्हावा, या हेतूने योजनांची कामे करण्यात आली. मात्र किरकोळ दुरुस्ती आणि स्त्रोत कोरडे पडल्याने कोट्यावधी रुपये खर्चूनही गावांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.पाणीपुरवठा योजना जुनाट होऊन स्त्रोत कोरडे पडल्याने आहेरबोरगाव आणि डासाळा येथील नळ योजना बंद आहेत. तर किरकोळ दुरुस्तीअभावी डिग्रस खु. येथील पाणीपुरवठा बंद आहे. डिग्रसवाडी येथील पाणीपुरवठा योजना दुरुस्तीअभावी ठप्प असल्याची माहिती आहे. दुधना काठावर असलेल्या कवडधन येथील पाणीपुरवठा योजना स्त्रोत मोडकळीस आल्याने बंद आहे. कुपटा आणि म्हाळसापूर येथील योजना कालबाह्य झाल्या आहेत. तर मालेटाकळी येथील नळ योजना स्त्रोत कोरडे पडल्याने पाणीपुरवठा योजना ठप्प आहे. निपानी टाकळी येथील योजनाही कालबाह्यझाली असून पाण्याचे स्त्रोत कोरडे पडल्याने ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिंदे टाकळी व तांदूळवाडी येथील योजना जुनाट झाल्याने पाण्याची समस्या निर्माण होणार आहे. यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने जमिनीतील पाण्याची पातळी वाढली नाही. आॅक्टोबर महिन्यातच पाणी पातळीत घट होत असल्याने पाण्याचे स्त्रोत झपाट्याने आटत आहेत. ग्रामीण भागातील हातपंप पाण्याअभावी कोरडे पडल्याने पाणी आणण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. दरम्यान, कसुरा व करपरा नदी काठावरील गावांमध्ये आगामी काळात पाणीटंचाई तीव्र होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.आठगाव योजना : बिलाअभावी बंद४आठगाव पाणीपुरवठा योजननेचे वीज बिल थकल्याने महावितरण कंपनीने चार महिन्यांपूर्वीच वीजपुरवठा तोडला आहे. त्यामुळे ही योजना बंद पडली आहे. पंपहाऊस, जलशुद्धीकरण केंद्र येथील लाखो रुपयांचे बिल थकीत आहे. या योजनेला निम्न दुधना प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. टंचाईच्या काळात या योजनेतून कुंडी, म्हाळसापूर, तिडी पिंपळगाव, गुगळी धामणगाव, आहेरबोरगाव, देऊळगाव गात, डासाळा, रवळगाव या गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र वीज बिल थकल्याने या योजनेतून काही दिवसच गावांना पाणी मिळते. प्राप्त माहितीनुसार टंचाईच्या काळात या योजनेच्या थकीत वीज बिलाचा भरणा ग्रामपंचायती व जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणार आहे. त्यानंतर या योजनेतून पाणी मिळणार आहे. तोपर्यंत मात्र ग्रामस्थांचे हाल होत आहेत.कसुरा, करपरा नदीकाठ तहानणारकसुरा व करपरा नदीवर मोठा बंधारा नसल्याने पावसाळ्यातील पाणी वाहून जाते. त्यामुळे उन्हाळ्यात या नदीकाठावरील गावांमध्ये सर्वाधिक पाणीटंचाई निर्माण होते. यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने कसुरा व करपरा नदीकाठावरील अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे. जनावरांच्या चाºयाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही बिकट बनणार ंआहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई