शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
3
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
4
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
5
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
6
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
7
तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...?
8
अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
9
'धुरंधर'च्या यशानंतरही रणवीर सिंह गायब? आता दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'पाजी खूप...'
10
बंडखोरी, नाराजी शमविण्यासाठी ठाकरे बंधूंचे नेते आता मैदानात
11
LPG Price Hike: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
12
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
13
घरातील दागिन्यांतून कमवा दरमहा पैसे; नेमके कसे मिळतात? जाणून घ्या...
14
सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
15
Astrology: १००० वर्षांनंतर 'त्रिवेणी योग' पुढची ३ वर्षे मिळेल नशीबाची साथ; आजच करा 'ही' भाग्यसिद्धी मुद्रा
16
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला, निफ्टीत ५० अंकांची तेजी; FMCG, फार्मा शेअर्समध्ये तेजी
17
Ikkis Review: अगस्त्य नंदाचा नव्हे; धर्मेंद्र यांचाच वाटतो 'इक्कीस'; कथा, अभिनय जमेच्या बाजू, पण...; वाचा रिव्ह्यू
18
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
19
Hyundai Cars Price Hike: ह्युंदाई क्रेटा, व्हेन्यू, एक्स्टर... आजपासून ह्युंदाईच्या कार्स महागल्या, किती खिसा रिकामा करावा लागणार?
20
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : सेलू तालुक्यातील बारा गावांतील नळ योजना बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:52 IST

तालुक्यातील विविध गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींनी तळ गाठला आहे. तसेच योजना कालबाह्य झाल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील बारा गावच्या नळ योजना बंद असल्याने आगामी काळात या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

मोहन बोराडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : तालुक्यातील विविध गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींनी तळ गाठला आहे. तसेच योजना कालबाह्य झाल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील बारा गावच्या नळ योजना बंद असल्याने आगामी काळात या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची चिन्हे आहेत.सेलू तालुक्यात ८२ ग्रामपंचायती असून या अंतर्गत वाड्यांची संख्या १९ आहे. ७८ गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेची कामे करण्यात आली आहेत. यातील अनेक गावांमध्ये कोट्यावधी रुपये खर्चून कायमस्वरुपी पाणीपुरवठा व्हावा, या हेतूने योजनांची कामे करण्यात आली. मात्र किरकोळ दुरुस्ती आणि स्त्रोत कोरडे पडल्याने कोट्यावधी रुपये खर्चूनही गावांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.पाणीपुरवठा योजना जुनाट होऊन स्त्रोत कोरडे पडल्याने आहेरबोरगाव आणि डासाळा येथील नळ योजना बंद आहेत. तर किरकोळ दुरुस्तीअभावी डिग्रस खु. येथील पाणीपुरवठा बंद आहे. डिग्रसवाडी येथील पाणीपुरवठा योजना दुरुस्तीअभावी ठप्प असल्याची माहिती आहे. दुधना काठावर असलेल्या कवडधन येथील पाणीपुरवठा योजना स्त्रोत मोडकळीस आल्याने बंद आहे. कुपटा आणि म्हाळसापूर येथील योजना कालबाह्य झाल्या आहेत. तर मालेटाकळी येथील नळ योजना स्त्रोत कोरडे पडल्याने पाणीपुरवठा योजना ठप्प आहे. निपानी टाकळी येथील योजनाही कालबाह्यझाली असून पाण्याचे स्त्रोत कोरडे पडल्याने ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिंदे टाकळी व तांदूळवाडी येथील योजना जुनाट झाल्याने पाण्याची समस्या निर्माण होणार आहे. यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने जमिनीतील पाण्याची पातळी वाढली नाही. आॅक्टोबर महिन्यातच पाणी पातळीत घट होत असल्याने पाण्याचे स्त्रोत झपाट्याने आटत आहेत. ग्रामीण भागातील हातपंप पाण्याअभावी कोरडे पडल्याने पाणी आणण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. दरम्यान, कसुरा व करपरा नदी काठावरील गावांमध्ये आगामी काळात पाणीटंचाई तीव्र होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.आठगाव योजना : बिलाअभावी बंद४आठगाव पाणीपुरवठा योजननेचे वीज बिल थकल्याने महावितरण कंपनीने चार महिन्यांपूर्वीच वीजपुरवठा तोडला आहे. त्यामुळे ही योजना बंद पडली आहे. पंपहाऊस, जलशुद्धीकरण केंद्र येथील लाखो रुपयांचे बिल थकीत आहे. या योजनेला निम्न दुधना प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. टंचाईच्या काळात या योजनेतून कुंडी, म्हाळसापूर, तिडी पिंपळगाव, गुगळी धामणगाव, आहेरबोरगाव, देऊळगाव गात, डासाळा, रवळगाव या गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र वीज बिल थकल्याने या योजनेतून काही दिवसच गावांना पाणी मिळते. प्राप्त माहितीनुसार टंचाईच्या काळात या योजनेच्या थकीत वीज बिलाचा भरणा ग्रामपंचायती व जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणार आहे. त्यानंतर या योजनेतून पाणी मिळणार आहे. तोपर्यंत मात्र ग्रामस्थांचे हाल होत आहेत.कसुरा, करपरा नदीकाठ तहानणारकसुरा व करपरा नदीवर मोठा बंधारा नसल्याने पावसाळ्यातील पाणी वाहून जाते. त्यामुळे उन्हाळ्यात या नदीकाठावरील गावांमध्ये सर्वाधिक पाणीटंचाई निर्माण होते. यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने कसुरा व करपरा नदीकाठावरील अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे. जनावरांच्या चाºयाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही बिकट बनणार ंआहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई