शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

परभणी: ८४३ गावांची ५० पेक्षा जास्त हंगामी पैसेवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 23:48 IST

जिल्ह्यातील ४४८ पैकी ४४३ गावांची हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्तीची आढळली असल्याचा अहवाल महसूल विभागाच्या वतीने विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील चार गावांचे संपूर्ण कृषीक्षेत्र धरणासाठी व कृषी विद्यापीठासाठी संपादित झाल्यामुळे ही गावे पैसेवारीसाठी अपात्र ठरविण्यात आली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी :जिल्ह्यातील ४४८ पैकी ४४३ गावांची हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्तीची आढळली असल्याचा अहवाल महसूल विभागाच्या वतीने विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील चार गावांचे संपूर्ण कृषीक्षेत्र धरणासाठी व कृषी विद्यापीठासाठी संपादित झाल्यामुळे ही गावे पैसेवारीसाठी अपात्र ठरविण्यात आली आहेत.जिल्ह्याची हंगामी पैसेवारी ३१ आॅक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली आहे. अंतिम पैसेवारी ही १५ जानेवारीपूर्वी जाहीर होणार आहे. जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या हंगामी पैसेवारीत जिल्ह्यातील ४४८ पैकी ४४३ गावांची हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्तीची आढळून आली आहे. परभणी तालुक्यातील ५ गावांची हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली आहे. परभणी तालुक्यात १३१ गावांमध्ये १ लाख १ हजार ८४८ हेक्टर लागवडीखालील क्षेत्रापैकी ९९ हजार १३८ हेक्टरवर पेरा करण्यात आला होता. या तालुक्याची ६१.२५ पैसे हंगामी पैसेवारी आली आहे. गंगाखेड तालुक्यातील १०५ गावांमध्ये ६१ हजार ५४५ हेक्टर जमीन लागवडीखाली आहे. त्यापैकी ५८ हजार ६७४ हेक्टर जमिनीवर पेरा करण्यात आला होता. या तालुक्याची ५९.५७ पैसे हंगामी पैसेवारी आली आहे. पूर्णा तालुक्यातील ९५ गावांअंतर्गत ५८ हजार २२१ हेक्टर जमीन लागवडीखाली असून त्यापैकी ५७ हजार १०१.६८ हेक्टर जमिनीवर पेरा करण्यात आला होता. या तालुक्याची हंगामी पैसेवारी ६३.२४ पैसे आहे.पालम तालुक्यातील ८२ गावांमधील ४८ हजार ८६७ हेक्टर जमीन लागवडीखाली आहे. त्यापैकी ४५ हजार ६५० हेक्टर जमिनीवर खरीपचा पेरा करण्यात आला. या तालुक्याची ५५.६६ पैसे पैसेवारी आली आहे. पाथरी तालुक्यातील ५८ गावंमधील ५१ हजार ६६८ हेक्टर जमीन लागवडीखाली आहे. त्यापैकी ४७ हजार ३७ हेक्टर जमिनीवर खरीपचा पेरा करण्यात आला होता. या तालुक्याची हंगामी पैसेवारी ४३.४० टक्के आहे. सोनपेठ तालुक्यातील ६० गावांमधील ३४ हजार ७३८.९२ हेक्टर जमीन लागवडीखाली असून ३२ हजार ३०७.१७ हेक्टर जमिनीवर पेरा करण्यात आला होता. या तालुक्याची हंगामी पैसेवारी ५५.५० पैसे आली आहे.मानवत तालुक्यातील ५४ गावांमधील ४५ हजार ७८२ हेक्टर जमीन लागवडीखाली असून त्यातील ४५ हजार १६६ हेक्टर जमिनीवर पेरा करण्यात आला होता. या तालुक्याची पैसेवारी ६०.६४ पैसे आली आहे. सेलू तालुक्यातील ९४ गावांमधील ६९ हजार २५५ हेक्टर जमीन लागवडीखाली असून ६५ हजार २७८ हेक्टर जमिनीवर पेरा करण्यात आला आहे. या तालुक्याची ५५ पैसे पैसेवारी आली आहे. जिंतूर तालुक्यातील १६८ गावांमधील ८६ हजार ९०५ हेक्टर जमीन लागवडीखाली असून त्यातील ८३ हजार ९९६ हेक्टर जमिनीवर पेरा करण्यात आला आहे. या तालुक्याची पैसेवारी ५९.६० पैसे आहे. बलसा, करजखेडा, चौधर्णी व लिंबाळा या चार गावांचे संपूर्ण कृषीक्षेत्र धरणासाठी व कृषी विद्यापीठासाठी संपादित झाल्यामुळे ही गावे हंगामी पैसेवारीतून वगळली आहेत.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याच्या निकष शिथीलता४एखाद्या नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसानीचे प्रमाण ५० टक्के असल्यास शेतकऱ्यांना मदत दिली जात होती. मात्र ५० टक्केपेक्षा कमी नुकसान झालेल्या शेतकºयांना मदत दिली जात नव्हती. आता केंद्रासह राज्य सरकारने पिकांच्या नुकसान भरपाईचे निकष बदलत ५० टक्केऐवजी ३३ टक्के केले आहेत. त्यामुळे ३३ टक्के नुकसान झाले तरी शेतकरी मदतीसाठी पात्र ठरु शकतात. केंद्र सरकारने १४ व्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्यांना २०१५-२०२० या कालावधीत नवीन निकष व वाढीन दराने भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे.४नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांचे किमान ५० टक्के किंवा त्याहून अधिक नुकसान झालेल्यांना मदत देण्यात येत होती. तसेच दुष्काळ ठरविण्यासाठी ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी असणाºया गावांना दुष्काळग्रस्त उपाययोजनांचा लाभ देण्यात येत होता. भरपाईच्या दरात राज्यानेही आता वाढ केली आहे. कोरडवाहू शेतीसाठी ४ हजार ५०० रुपयांवरुन ६ हजार ८०० रुपये, बागायतीसाठी ९ हजारावरुन १३ हजार ५०० रुपये आणि फळबागांसाठी १२ हजारावरुन १८ हजार रुपये भरपाईची कमाल मर्यादा २ हेक्टरपर्यंत ठरवून देण्यात आली आहे....अशी काढली जाते आणेवारी४गावांच्या शिवारात एकूण पेरलेल्या लागवडीखालील एकूण क्षेत्रफळाच्या ८० टक्केपर्यंतची सर्व पिके ही पैसेवारी काढण्यास मान्य करण्यात येतात. १० बाय १० मीटर (एक आर) असा शेतातील चौरस भाग घेऊन त्यात निघणाºया धान्याचे उत्पादन राज्य सरकारच्या सांख्यिकी विभागाने पुरविलेल्या मागील १० वर्षाच्या त्या पिकांच्या सरासरी उत्पन्नाशी ताडून, निघणारा अनुपात यात विविध प्रकारच्या (हालकी, मध्यम, चांगली) जमिनी निवडल्या जातात.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीRevenue Departmentमहसूल विभाग