शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
2
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
3
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
4
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
5
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
6
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
7
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
8
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
9
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
10
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
11
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
12
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
13
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
14
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
15
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
16
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
17
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
18
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
20
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड

परभणी : शेतकरी कुटुंबातील सदस्यही योजनेस पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 12:23 AM

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये आतापर्यंत केवळ ज्या शेतकऱ्याच्या नावावर सातबारा आहे. त्या शेतकºयाला शेती व्यवसाय करताना झालेल्या अपघातात मदत देण्यात येत होती; परंतु, कृषी व पशू संवर्धन विभागाने ३१ आॅगस्ट रोजी काढलेल्या एका शासन निर्णयानुसार खातेदार शेतकरी व त्याच्या कुटुंबातील एका सदस्यास या योजनेतून आता लाभ दिला जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये आतापर्यंत केवळ ज्या शेतकऱ्याच्या नावावर सातबारा आहे. त्या शेतकºयाला शेती व्यवसाय करताना झालेल्या अपघातात मदत देण्यात येत होती; परंतु, कृषी व पशू संवर्धन विभागाने ३१ आॅगस्ट रोजी काढलेल्या एका शासन निर्णयानुसार खातेदार शेतकरी व त्याच्या कुटुंबातील एका सदस्यास या योजनेतून आता लाभ दिला जाणार आहे.परभणी जिल्ह्यातील जवळपास ६ लाख शेतकरी शेती व्यवसाय करतात. शेती करीत असताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. खरीप व रब्बी हंगामात पिकांची काळजी घेण्यासाठी रात्री-अपरात्री शेतामध्ये राबावे लागते. शेती व्यवसाय करताना वीज पडणे, पूर, संर्प दंश, विंचू दंश, विजेचा शॉक बसणे आदी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकºयांना आपला जीव गमवावा लागतो. त्याच बरोबर रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात किंवा अन्य कारणामुळे शेतकºयांना अपघाताला सामोरे जावे लागते. त्यामुळे त्या शेतकºयाचे कुटुंब उघड्यावर येते. घरातील कर्ता व्यक्ती गेल्यामुळे कुटुंबाचे आर्थिक स्त्रोत बंद होऊन अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे अपघातग्रस्त शेतकºयास व त्याच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरीता राज्य शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना अंमलात आणली. या योजनेच्या माध्यमातून अपघात होऊन जीव गमावलेल्या शेतकºयांना २ लाख रुपयांपर्यंत मदत देण्यात येते; परंतु, या अगोदर शासनाच्या या योजनेतून ज्या शेतकºयांच्या नावावर सातबारा आहे, त्याच शेतकºयाला मदत देण्यात येत होती; परंतु, शेतकºयाच्या कुटुंबातील सदस्याला शेती काम करीत असताना जीव गमवावा लागला तर त्याला मदत मिळत नव्हती. त्यामुळे शेतकºयांसह विविध सामाजिक संघटनांच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. शेतकºयांच्या या मागणीचा विचार करुन राज्य शासनाच्या कृषी, पशूसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाच्या वतीने ३१ आॅगस्ट २०१९ रोजी महाराष्ट्र शासनाच्या अव्वर सचिव निता शिंदे यांच्या स्वाक्षरीने एक शासन निर्णय काढण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत विहित खातेदार शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील १० ते ७५ वयोगटातील एका सदस्यास शेती व्यवसाय करीत असताना मृत्यू ओढावल्यास या योजनेंतर्गत २ लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे.तीन वर्षात : १५७ प्रस्ताव सादर, ७५ प्रस्तावांनाच मिळाली मंजुरी४गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत २०१६ ते २०१९ या तीन वर्षात जिल्हाभरातून १५७ प्रस्ताव कृषी विभागाकडे सादर करण्यात आले होते. त्यापैकी कृषी विभागाने ७५ प्रस्ताव मंजूर केले आहेत. १४ प्रस्ताव नामंजूर करण्यात आले आहेत. यातील काही शेतकºयांना कृषी विभागाने मदतही दिली आहे.४त्यामुळे शेतकºयाच्या कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यानंतर या योजनेच्या माध्यमातून कुटुंबातील सदस्यांची उपजिविका भागविण्यासाठी मदत झाली आहे. त्यामुळे कृषी विभागानेही सादर झालेल्या प्रस्तावावरही तात्काळ कार्यवाही करुन शेतकºयांना न्याय द्यावा, अशी मागणी शेतकºयांतून होत आहे.यावर्षीचे ११ प्रस्ताव मंजुरी अभावी पडून४शेती व्यवसाय करताना शेतकºयांना सर्प दंश, विंचू दंश, वीज पडणे, विजेचा शॉक बसणे आदी कारणास्तव जीव गमवावा लागल्यास कृषी विभागाकडून गोपीनाथ मुंडे विमा योजनेंतर्गत मदत केली जाते.४यावर्षी ७ आॅगस्टपर्यंत पालम कृषी कार्यालयाकडे १, पूर्णा तालुका कृषी कार्यालयाकडे ४, गंगाखेड ४, पाथरी १, सेलू १, जिंतूर अशा ६ तालुका कृषी कार्यालयाकडे ११ प्रस्ताव दाखल झाले आहेत; परंतु, अद्यापही हे प्रस्ताव मंजुरीअभावी त्या त्या कृषी कार्यालयाकडे पडून आहेत.४ याकडे तालुका कृषी अधिकाºयांनी लक्ष देऊन हे प्रस्ताव मंजूर करुन तातडीने शेतकºयांना मदत करावी, अशी मागणी लाभार्थी शेतकºयांतून होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी