शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

परभणी : कापसाच्या अस्थिर दराने उत्पादक अस्वस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:46 IST

उत्पादन कमी झाल्याने कापसाला चांगला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र बाजारपेठेत कापसाचे भाव कमी अधिक होत असल्याने तालुक्यातील शेतकरी अस्वस्थ झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): उत्पादन कमी झाल्याने कापसाला चांगला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र बाजारपेठेत कापसाचे भाव कमी अधिक होत असल्याने तालुक्यातील शेतकरी अस्वस्थ झाले आहेत.यावर्षी खरीप हंगामात तालुक्यातील २२ हजार २२८ हेक्टरवर कापसाची पेरणी झाली होती. गतवर्षी पेक्षा २ हजार हेक्टर जास्त कापसाची लागवड झाली. पावसाळ्यात सुरुवातीला पावसाने कृपा केल्याने शेतकरी समाधानी होते. कापसाचे उत्पादन वाढेल, असे वाटत असताना पावसाने दीड महिना खंड दिल्याने शेतकºयांच्या आशेवर पाणी फेरले गेले.कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली. तसेच रासायनिक खताच्या व कीटकनाशकाच्या वाढलेल्या किंमतीमुुळे त्याचबरोबर कापूस वेचणीच्या वाढत्या मजुरीमुळे शेतकरी आजच्या भावात कापूस विकण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीत बाजार समितीच्या यार्डात म्हणावी तशी कापसाची आवक होत नसल्याचे चित्र आहे. अधिक माहिती घेतली असता कापसाचे भाव कमी, अधिक होत असल्याचा परिणाम यार्डातील कापसाच्या आवकवर होत असल्याचे दिसून येत आहे.आगामी काळात भाव वाढल्यानंतर कापूस विक्री करण्यावर बहुतांश शेतकरी ठाम असले तरी ज्या शेतकºयांना चार ते पाच क्विंटल कापूस झाला आहे, असेच शेतकरी पैशाच्या चणचणीमुळे भाव वाढीची वाट न बघता आपला कापूस विक्री करून मोकळे होत आहेत.दरवाढीच्या : आशेने कापूस घरातआगामी काळात कापसाला चांगला दर मिळेल, या आशेने बहुतांश शेतकºयांनी कापूस विक्रीकडे पाठ फिरविली आहे. सुुरुवातीच्या काळात कापसाचा दर ६ हजारांपर्यंत गेला होता. मात्र आता तो ५७०० पर्यंत घसरला आहे. घसरलेले सरकीचे दर यामुळे भावात चढ-उतार होत असल्याची माहिती मिळत आहे. मात्र भावात चढ-उतार होत असल्याने कापूस उत्पादक शेतकºयांना चिंता लागली आहे.वेचणीसाठी मजूर मिळेनाकापूस वेचणीला दिवाळीच्या अगोदर सुरुवात झाली आहे. दुष्काळामुळे कामाच्या शोधात अनेकांनी शहराकडे धाव घेतल्याने मजूर मिळत नसल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. जे मजूर उपलब्ध आहेत, ते कापूस वेचणीसाठी प्रती किलो ८ ते १० रुपये दर मागत आहेत. त्यामुळे कापूस उत्पादक आर्थिक कोंडीत सापडला आहे.असे राहिले मागील आठवड्यातील दरमानवत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्र्केट यार्डात मागील आठवडाभरात कापसाच्या भावात चढ-उतार पहावयास मिळाला. यामध्ये २१ नोव्हेंबर रोजी ५७०१ रुपये, २२ रोजी ५७५८, २३ रोजी ५७७४, २४ रोजी ५७६१, २६ रोजी ५७११, २७ रोजी ५६५२ तर २८ नोव्हेंबर रोजी ५६९१ रुपयांचा भाव मिळाला.बाजार समितीच्या यार्डात २६ नोव्हेंबरपर्यंत जाहीर लिलावाद्वारे ५९ हजार ६५२ क्विटंल शेतकºयांनी कापसाची विक्री केली आहे.-शिवनारायण सारडा, प्रभारी सचिव कृऊबागठाण, सरकीच्या भावात चढ-उतार होत असल्याने याचा परिणाम म्हणून कापसाचे भाव कमी जास्त होत असल्याची माहिती मिळत आहे.-गंगाधरराव कदम, सभापती, बाजार समिती

टॅग्स :parabhaniपरभणीcottonकापूसFarmerशेतकरी