शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
2
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
3
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
4
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
5
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
6
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
7
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
8
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
9
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
10
"कोणत्याही महापालिकेत युती तुटलेली नाही, पुढच्या दोन दिवसात...", उदय सामंतांचे विधान, पुणे-संभाजीनगरचं काय?
11
BMC Election 2026: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
12
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
13
जागा शिंदेसेनेला सुटली, धनुष्यबाणावर लढण्याची ऑफरही आली, पण..., भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्तीने घेतला मोठा निर्णय  
14
डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? सावधान! सेबीने दिला इशारा; तुमचे पैसे अडकण्याची भीती
15
Mamata Banerjee : "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप
16
सोलापुरात अभूतपूर्व गोंधळ! भाजपाचे एबी फॉर्म वेळेत न पोहचल्याने संताप, विरोधकांचा दारातच ठिय्या
17
Anjel Chakma : खळबळजनक! बर्थडे पार्टी, शिवीगाळ अन्... एंजेल चकमा हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा
18
सौदी अरेबियानं UAE च्या जहाजांना का केले उद्ध्वस्त?; २४ तासांचा अल्टिमेटम, २ मित्र बनले शत्रू
19
सावधान! 'हॅप्पी न्यू इयर' म्हणण्यापूर्वी १० वेळा विचार करा; एका क्लिकमुळे बँक खातं होईल रिकामं
20
निष्ठवंतांनंतर संभाजीनगर भाजप कार्यालयात रिपाइंचा 'रुद्रावतार'! कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : जलसाठ्याअभावी वाढल्या चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 00:24 IST

जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने प्रकल्पांमध्ये जेमतेम पाणीसाठा जमा झाला असून परतीचा पाऊस झाला नाही तर आगामी उन्हाळ्यात टंचाईच्या चिंता वाढण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने प्रकल्पांमध्ये जेमतेम पाणीसाठा जमा झाला असून परतीचा पाऊस झाला नाही तर आगामी उन्हाळ्यात टंचाईच्या चिंता वाढण्याची शक्यता आहे.यावर्षी परभणी जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविल्यामुळे शेती पिकांबरोबरच सिंचनाचा प्रश्नही उभा टाकला आहे. जिल्ह्यामध्ये सरासरी ७७४ मि.मी. पाऊस होतो. प्रत्यक्षात केवळ ५९ टक्के पाऊस झाला असून जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पांमध्ये असमाधानकारक पाणीसाठा असल्याने जिल्हावासियांच्या चिंता वाढल्या आहेत.येलदरी, मासोळी, करपरा आणि निम्न दुधना हे जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प असून येलदरी प्रकल्पात पाणीसाठा झाल्यानंतर परभणी जिल्ह्यासह शेजारच्या दोन जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटतो. मात्र यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने प्रकल्पांमध्येही पुरेसा पाणीसाठा जमा झाला नाही. सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ३४४ दलघमी एवढी असून त्यात २४२.२०० दलघमी उपयुक्त पाणीसाठा साठविला जाऊ शकतो. प्रत्यक्षात या प्रकल्पामध्ये केवळ ५९.७७० दलघमी पाणीसाठा जमा झाला आहे. २४.६७ टक्के पाणी या प्रकल्पात आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात प्रकल्पात ७०.६२ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मागील वर्षीच्या तुलनेत २६ टक्के पाणीसाठा कमी असल्याने सेलू तालुक्यासह परभणी, मानवत तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.मागील वर्षी निम्न दुधना प्रकल्पात मूबलक प्रमाणात पाणी असल्याने सेलू, परभणी, पूर्णा, मानवत या तालुक्यांना उन्हाळ्यात निम्न दुधना प्रकल्पातूनच पाणी उपलब्ध झाले होते. यावर्षी अर्धा पावसाळा संपला तरी प्रकल्पातील पाणीसाठा वाढत नसल्याची स्थिती आहे. झरी प्रकल्पामध्ये ८६ टक्के पाणीसाठा आहे. तर करपरा मध्यम प्रकल्पामध्ये ८६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पात केवळ १० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. डिग्रस बंधाऱ्यामध्ये ६७ टक्के पाणीसाठा उपलब्ध असला तरी या बंधाºयातील पाणी नांदेडसाठी आरक्षित असल्याने डिग्रस बंधाºयातील पाणीसाठ्याचा जिल्ह्याला काहीही उपयोग होत नाही. पाथरी तालुक्यातील मुद्गल बंधाºयात ८० टक्के, ढालेगाव बंधाºयात ९६ टक्के आणि गंगाखेड तालुक्यातील मुुळी बंधाºयामध्ये केवळ ८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.जिल्ह्यात एक महिन्यापासून पावसाने पाठ फिरविली आहे. सध्या ढगाळ वातावरण निर्माण होत असले तरी पाऊस होत नाही. त्यामुळे प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा होण्यासाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे; परंतु, सध्या तरी पाऊस हुलकावणी देत असून जिल्हावासियांच्या चिंता वाढत आहेत.येलदरी प्रकल्पात ९.२४ टक्के साठाजिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्प जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. ९३४ दलघमी एवढी या प्रकल्पाची साठवण क्षमता असून त्यात ८०९.७७० दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. प्रत्यक्षात या प्रकल्पामध्ये १९९.४६९ दलघमी एकूण पाणीसाठा असून त्यामध्ये केवळ ७४.७९२ दलघमी (९.२४ टक्के ) उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. येलदरी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला नसल्याने धरणामध्ये अजूनही मूबलक पाणीसाठा जमा झाला नाही. परिणामी आगामी उन्हाळ्यात परभणी जिल्ह्यासह हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.गंगाखेड तालुक्यात गंभीर स्थितीगंगाखेड तालुक्याला मासोळी मध्यम प्रकल्प आणि मुळी बंधाºयातून पिण्याचे पाणी उपलब्ध होते. विशेष म्हणजे या दोन्ही प्रकल्पांमधून सिंचनासाठीही पाणी घेतले जाते. मात्र यावर्षी दोन्ही प्रकल्पांत पाणीसाठा उपलब्ध नाही. मासोळी मध्यम प्रकल्पात ३४.०८५ दलघमी पाणीसाठा जमा होतो. त्यामध्ये २७.१४१ दलघमी उपयुक्त पाणीसाठा जमा होऊ शकतो. प्रत्यक्षात या प्रकल्पांमध्ये २.५८७ दलघमी (१० टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. तर मुळी बंधाºयाला गेट बसविले नसल्याने या बंधाºयातही पाणीसाठा जमा झाला नाही. सद्यस्थितीला बंधाºयामध्ये ०.८११ दलघमी पाणीसाठा उपलब्ध असून त्याची टक्केवारी ८ टक्के एवढी आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईDamधरण