शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
3
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
4
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
5
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
6
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
7
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
8
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
9
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
10
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
11
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
12
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
13
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
14
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
15
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
16
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
17
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
18
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
19
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
20
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे

परभणी : जलसाठ्याअभावी वाढल्या चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 00:24 IST

जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने प्रकल्पांमध्ये जेमतेम पाणीसाठा जमा झाला असून परतीचा पाऊस झाला नाही तर आगामी उन्हाळ्यात टंचाईच्या चिंता वाढण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने प्रकल्पांमध्ये जेमतेम पाणीसाठा जमा झाला असून परतीचा पाऊस झाला नाही तर आगामी उन्हाळ्यात टंचाईच्या चिंता वाढण्याची शक्यता आहे.यावर्षी परभणी जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविल्यामुळे शेती पिकांबरोबरच सिंचनाचा प्रश्नही उभा टाकला आहे. जिल्ह्यामध्ये सरासरी ७७४ मि.मी. पाऊस होतो. प्रत्यक्षात केवळ ५९ टक्के पाऊस झाला असून जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पांमध्ये असमाधानकारक पाणीसाठा असल्याने जिल्हावासियांच्या चिंता वाढल्या आहेत.येलदरी, मासोळी, करपरा आणि निम्न दुधना हे जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प असून येलदरी प्रकल्पात पाणीसाठा झाल्यानंतर परभणी जिल्ह्यासह शेजारच्या दोन जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटतो. मात्र यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने प्रकल्पांमध्येही पुरेसा पाणीसाठा जमा झाला नाही. सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ३४४ दलघमी एवढी असून त्यात २४२.२०० दलघमी उपयुक्त पाणीसाठा साठविला जाऊ शकतो. प्रत्यक्षात या प्रकल्पामध्ये केवळ ५९.७७० दलघमी पाणीसाठा जमा झाला आहे. २४.६७ टक्के पाणी या प्रकल्पात आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात प्रकल्पात ७०.६२ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मागील वर्षीच्या तुलनेत २६ टक्के पाणीसाठा कमी असल्याने सेलू तालुक्यासह परभणी, मानवत तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.मागील वर्षी निम्न दुधना प्रकल्पात मूबलक प्रमाणात पाणी असल्याने सेलू, परभणी, पूर्णा, मानवत या तालुक्यांना उन्हाळ्यात निम्न दुधना प्रकल्पातूनच पाणी उपलब्ध झाले होते. यावर्षी अर्धा पावसाळा संपला तरी प्रकल्पातील पाणीसाठा वाढत नसल्याची स्थिती आहे. झरी प्रकल्पामध्ये ८६ टक्के पाणीसाठा आहे. तर करपरा मध्यम प्रकल्पामध्ये ८६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पात केवळ १० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. डिग्रस बंधाऱ्यामध्ये ६७ टक्के पाणीसाठा उपलब्ध असला तरी या बंधाºयातील पाणी नांदेडसाठी आरक्षित असल्याने डिग्रस बंधाºयातील पाणीसाठ्याचा जिल्ह्याला काहीही उपयोग होत नाही. पाथरी तालुक्यातील मुद्गल बंधाºयात ८० टक्के, ढालेगाव बंधाºयात ९६ टक्के आणि गंगाखेड तालुक्यातील मुुळी बंधाºयामध्ये केवळ ८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.जिल्ह्यात एक महिन्यापासून पावसाने पाठ फिरविली आहे. सध्या ढगाळ वातावरण निर्माण होत असले तरी पाऊस होत नाही. त्यामुळे प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा होण्यासाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे; परंतु, सध्या तरी पाऊस हुलकावणी देत असून जिल्हावासियांच्या चिंता वाढत आहेत.येलदरी प्रकल्पात ९.२४ टक्के साठाजिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्प जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. ९३४ दलघमी एवढी या प्रकल्पाची साठवण क्षमता असून त्यात ८०९.७७० दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. प्रत्यक्षात या प्रकल्पामध्ये १९९.४६९ दलघमी एकूण पाणीसाठा असून त्यामध्ये केवळ ७४.७९२ दलघमी (९.२४ टक्के ) उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. येलदरी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला नसल्याने धरणामध्ये अजूनही मूबलक पाणीसाठा जमा झाला नाही. परिणामी आगामी उन्हाळ्यात परभणी जिल्ह्यासह हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.गंगाखेड तालुक्यात गंभीर स्थितीगंगाखेड तालुक्याला मासोळी मध्यम प्रकल्प आणि मुळी बंधाºयातून पिण्याचे पाणी उपलब्ध होते. विशेष म्हणजे या दोन्ही प्रकल्पांमधून सिंचनासाठीही पाणी घेतले जाते. मात्र यावर्षी दोन्ही प्रकल्पांत पाणीसाठा उपलब्ध नाही. मासोळी मध्यम प्रकल्पात ३४.०८५ दलघमी पाणीसाठा जमा होतो. त्यामध्ये २७.१४१ दलघमी उपयुक्त पाणीसाठा जमा होऊ शकतो. प्रत्यक्षात या प्रकल्पांमध्ये २.५८७ दलघमी (१० टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. तर मुळी बंधाºयाला गेट बसविले नसल्याने या बंधाºयातही पाणीसाठा जमा झाला नाही. सद्यस्थितीला बंधाºयामध्ये ०.८११ दलघमी पाणीसाठा उपलब्ध असून त्याची टक्केवारी ८ टक्के एवढी आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईDamधरण