शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

परभणी : पाच मंडळांमध्ये अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:20 IST

जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली असून शनिवारी पहाटे पूर्णा तालुक्यातील ३ आणि गंगाखेड तालुक्यातील २ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. महसूल प्रशासनाने पूर्णा तालुक्यात सरासरी ८१ मि.मी. तर गंगाखेड तालुक्यामध्ये सरासरी ४८.७५ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद घेतली. मान्सूनपूर्व झालेल्या या पावसामुळे बळीराजाच्या अपेक्षा मात्र उंचावल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली असून शनिवारी पहाटे पूर्णा तालुक्यातील ३ आणि गंगाखेड तालुक्यातील २ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. महसूल प्रशासनाने पूर्णा तालुक्यात सरासरी ८१ मि.मी. तर गंगाखेड तालुक्यामध्ये सरासरी ४८.७५ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद घेतली. मान्सूनपूर्व झालेल्या या पावसामुळे बळीराजाच्या अपेक्षा मात्र उंचावल्या आहेत.दोन दिवसांपासून जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होत आहे. शनिवारी पहाटे जिल्हाभरात पावसाला प्रारंभ झाला. या पावसामुळे ग्रामीण भागातील ओढे- नाले पहिल्यांदाच वाहू लागले आहेत. जिल्ह्यात सर्वदूर हा पाऊस होता. जिल्हा प्रशासनाने शनिवारी सकाळी ७ वाजेपर्यंत झालेल्या पावसाची नोंद घेतली आहे. त्यात परभणी तालुक्यामध्ये ३०.२५ मि.मी., पालम २४, पूर्णा ८१, गंगाखेड ४८.७५, सोनपेठ ४३, सेलू ९, पाथरी २०, जिंतूर १६.५८ आणि मानवत तालुक्यात ३१ मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्हाभरात सरासरी ३३.७५ मि.मी. पावसाची नोंद झाली.दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत असला तरी हा मान्सूनचा पाऊस नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी मान्सूनच्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.पूर्णा नदीच्या पातळीत अल्पशी वाढपूर्णा- पूर्णा तालुक्यात शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या पावसामुळे तालुक्यातील ओढ्या-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. पूर्णा मंडळात झालेल्या अतिवृष्टीमुळे परिसरातील बरमाल, माटेगाव, आहेरवाडी, चुडावा या भागातील ओढ्यांना पाणी आले होते. हे पाणी पूर्णा नदीपात्रात दाखल झाले असून यावर्षीच्या पावसाळ्यात पूर्णा नदी प्रथमच प्रवाही झाली आहे. नदीच्या पाणीपातळीत अल्पशी वाढ झाली आहे. दरम्यान, पावसामुळे पूर्णा शहरातील व ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरावस्थेत भर पडली.सोनपेठ ४३ मि.मी. पाऊससोनपेठ परिसरात ४३ मि.मी. पाऊस झाला आहे. शनिवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास सुरु झालेला पाऊस सकाळी ७ वाजेपर्यंत कोसळत होता. आवलगाव मंडळात ४२ मि.मी. पाऊस झाला असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत १९.६५ टक्के पाऊस झाला आहे.रस्ता झाला चिखलमयपालम तालुक्यातील जांभूळबेट हा रस्ता खराब झालेला आहे. शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या पावसामुळे संपूर्ण रस्ता चिखलमय झाला असून पाच गावांची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. पालम ते जांभूळबेट हा ३ कि.मी. अंतराचा रस्ता असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. चिखलामुळे वाहनधारकांना आपली वाहने रस्त्याच्या बाजुला लावून चक्क पायपीट करावी लागत आहे. याच रस्त्यावरुन सोमेश्वर, घोडा, आरखेड, सायळा, उमरथडी या गावांची वाहतूक होते. परंतु, रस्ता खराब झाल्याने ग्रामस्थ त्रस्त आहेत. थोडाही पाऊस झाला तरी रस्त्याची दुरावस्था होत असल्याने पावसाळ्याचे चार महिने कसे काढावेत, असा प्रश्न निर्माण होत आहे.पहिल्याच पावसात रस्त्याची दाणादाणचारठाणा- येथील महावीर चौक ते बसस्थानक या रस्त्याची पहिल्याच पावसात दुरावस्था झाली असून वाहतूक करताना ग्रामस्थांना कसरत करावी लागत आहे. गावातील हा मुख्य रस्ता असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. थोड्या पावसातही गजमल किराणा ते देशमुख चौक दरम्यान रस्त्यावर मोठे पाणी साचते. त्यामुळे पायी चालणेही मुश्कील होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊस