शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

परभणी : पाण्याअभावी गोदावरी कोरडी पडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 12:58 AM

तालुक्याला लाभलेला गोदावरीचा विशाल किनारा म्हणजे सोनपेठ तालुक्याचे पाणीदार वैभव! गोदावरीच्या अथांग पाण्यामुळे परिसरातील विहिरी, बोअर यांना मिळणारे मुबलक पाणी येथील शेत शिवारांना बागायती बनवून बारमाही हिरवा शालु नेसवीत असे. त्यामुळे जुने लोक अवर्जून या भागाला गंगथडी या नावाने ओळखत असत. आजघडीला गोदावरी पूर्णत: आटली आहे़ त्यामुळे तालुक्यात सर्वत्र तीव्र पाणीटंचाई भासत आहे

सुभाष सुरवसे।लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी): तालुक्याला लाभलेला गोदावरीचा विशाल किनारा म्हणजे सोनपेठ तालुक्याचे पाणीदार वैभव! गोदावरीच्या अथांग पाण्यामुळे परिसरातील विहिरी, बोअर यांना मिळणारे मुबलक पाणी येथील शेत शिवारांना बागायती बनवून बारमाही हिरवा शालु नेसवीत असे. त्यामुळे जुने लोक अवर्जून या भागाला गंगथडी या नावाने ओळखत असत. आजघडीला गोदावरी पूर्णत: आटली आहे़ त्यामुळे तालुक्यात सर्वत्र तीव्र पाणीटंचाई भासत आहे.दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडून गोदावरीला पुर येत असे. दुथडी भरुन वाहणाऱ्या गोदावरीतील मोठमोठे डोह भरुन संपूर्ण उन्हाळ्यातही पाणीपातळी टिकून रहात होती. त्यामुळे गोदाकाठासह परिसरातील शेतकरी ऊस, ज्वारी, गहू, मका, भुईमूग, सुर्यफुल, हरभरा आदी पिके घेत असत. उन्हाळ्यात देखील गोदाकाठचा परिसर हिरवागार राहत होता; परंतु, पाच वर्षांपासून सोनपेठ तालुक्यातील पर्जन्यमान घटत चालले आहे. विहीर व बोअरची अनुक्रमे ३० ते १५० फुटावर असलेली पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खालावली असून, पाझर तलाव, बंधारे, शेततळे आदी पाणीसाठे कोरडेठाक पडले आहेत. बारमाही पाण्याचा खळखळाट ऐकू येणाºया गोदावरीला सुद्धा आता उतरती कळा लागली आहे. गोदावरीतील मोठमोठ्या डोहांना मार्च महिन्यातच कोरड पडली होती. यामुळे गोदाकाठच्या नागरिकांना आता पाणीटंचाईचा समाना करावा लागत आहे. बागायती शेतीला आता वाळवंटाचे स्वरुप प्राप्त होत आहे़गोदापात्रातील विहिरी व बोअरची पाणीपातळी खालावली४सोनपेठ शहरासह तालुक्यातील बहुतांश गावांचा पाणीप्रश्न गोदावरीवर अवलंबून असल्याने तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई सुरु झाली आहे. सध्यस्थितीत गोदाकाठच्या अनेक विहीर व बोअरची पाणीपातळी खालावली आहे़४गोदाकाठच्या बाजुच्या झाडा झुडपांमध्ये अनेक प्रकारच्या पशु पक्ष्यांचा वावर होता; परंतु, आज पाण्याच्या शोधात पक्षी, प्राणी ईतरत्र स्थलांतरीत होत आहेत.४एकंदरीत आजची परिस्थीती पहाता सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठाचे पार वाळवंट झाल्याचे पहावयास मिळत आहे.जनावरांचे हाल४गोदावरी नदी कोरडी पडल्याने मुक्या जनावरांचेही पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत़ विशेषत: वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती वाढली आहे़ शेतशिवारांत पाण्याच्या ठिकाणी फिरत असताना त्यांना संकटांना सामोरे जावे लागत आहे़ त्यांच्यासाठी पानवठे करण्याची मागणी होत आहे़या गावांमध्ये : केले अधिग्रहण४तालुक्यातील वंदन, तिवठाना, शेळगाव, आवलगाव, वडगाव स्टे., पोहंडूळ, पारधवाडी, लोकरवाडी या ८ गावांमध्ये १४ विहीर अधिग्रहण व उंदरवाडी, वैतागवाडी, पारधवाडी, नखतवाडी या ४ वाडी तांड्यावर ५ विहिरींचे अधिग्रहण केले असून नरवाडी आणि कोठाळा येथे दोन टँकर चालू आहेत.४मागील तीन महिन्यांपासून तालुक्यात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यासाठी अख्खा दिवस घालावा लागत आहे़ त्यामुळे इतर कामे केव्हा करावीत, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळwater scarcityपाणी टंचाई