शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

परभणी : भाजप सरकारकडून कामगारांची फसवणूक- चंद्रकांत महाडिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:36 AM

यदा दुरुस्तीच्या नावाखाली भाजप सरकारकडून कामगारांची संख्या घटवून त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आणण्याचे पाप केले जात आहे. त्यामुळे शिवसेना नेत्यांनी सभागृहात आवाज उठवून कामगारांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष चंद्रकांत महाडीक यांनी येथे केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कायदा दुरुस्तीच्या नावाखाली भाजप सरकारकडून कामगारांची संख्या घटवून त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आणण्याचे पाप केले जात आहे. त्यामुळे शिवसेना नेत्यांनी सभागृहात आवाज उठवून कामगारांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष चंद्रकांत महाडीक यांनी येथे केले.भारतीय कामगार सेना वीज युनिटच्या वतीने परभणी शहरातील अक्षदा मंगल कार्यालयात १७ जून रोजी राज्यव्यापी महाअधिवेशन पार पडले. यावेळी महाडीक बोलत होते.अध्यक्षस्थानी शिवसेनेचे नेते तथा खा.चंद्रकांत खैरे यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून राजन भानुशाली, स्वागताध्यक्ष आ.डॉ.राहुल पाटील, डॉ.विवेक नावंदर, माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, नंदू आवचार, ज्ञानेश्वर पवार, अनंत पाटील, अधीक्षक अभियंता यशवंत कांबळे, डॉ.संजय कच्छवे यांची उपस्थिती होती. खा.चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलाने अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले.महावितरणचे प्रादेशिक संचालक तथा भूमिपुत्र सतीश गणपतराव करपे, भारतीय कामगार सेनेचे समन्वयक सल्लागार विठ्ठलसिंह परिहार, मॅरेथॉनपटू ज्योती गवते, शालेय क्रीडा स्पर्धा पदक विजेती सुनीता शिंदे व एव्हरेस्ट वीरांगना मनिषा वाघमारे यांच्या आई-वडिलांचा सत्कार करण्यात आला.या अधिवेशनात संघटनेचे कार्याध्यक्ष राजन भानूशाली, प्रशांत शेंडे, सुभाष आंबवने, मारोतराव टाक यांनी वीज कामगारांच्या अडचणी मांडल्या. खा.चंद्रकांत खैरे म्हणाले, कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना कामगारांसोबत आहे. कामगारांच्या आंदोलनात अग्रभागी राहून कामगार संघटनेला साथ देण्याचे काम शिवसेनेने केले आहे. महावितरणचे वरिष्ठ अधिकारी व खाजगी कंपन्यांचे साटेलोटे असल्यामुळेच महावितरण घाट्यात टाकण्याचे काम होत आहे. त्यामुळे असे प्रकार हाणून पाडण्याचे काम कामगार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले पाहिजे. या अधिवेशनात कामगारांच्या प्रश्नावर झालेले ठराव लोकसभेच्या सभागृहात निश्चित मांडून त्यावर आवाज उठविण्याचे काम केले जाईल, असे आश्वासन खा.खैरे यांनी दिले.आ.डॉ.राहुल पाटील म्हणाले, कामगारांना येणाºया अडचणीसंदर्भात येत्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेच्या सभागृहात ठरावाच्या माध्यमातून आवाज उठवून न्याय देण्याचे काम शिवसेनेच्या वतीने केले जाईल. अभय कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी विकास मिश्रा, प्रसाद सिंगणापूरकर, केशव धर्माधिकारी, प्रसन्न चामणीकर, जीवन मुंगळीकर, ईश्वर परडे, देविदास लांडगे, संतोष भांडारवाड, वैजनाथ कवडी, गजेंद्र राजूरकर, अविनाश चिटणीस, बाबू पुस्सा, योगेश सुदेवाड आदींनी प्रयत्न केले.

टॅग्स :parabhaniपरभणीShiv SenaशिवसेनाBJPभाजपा