शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

परभणी : रेशीम शेतीच्या चारशे प्रस्तावांना मिळेना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 00:37 IST

पारंपरिक शेतीत उत्पन्न मिळत नसल्याने जिल्ह्यात रेशीम योजनेअंतर्गत तुती लागवडीला चालना मिळत असतानाच शेतकऱ्यांना प्रशासकीय उदासिनतेचा फटका सहन करावा लागत आहे. प्रशासनातील दफ्तर दिरंगाईमुळे नोंदणीनंतरही चारशे लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश मिळाले नाहीत. जिल्हा रेशीम उद्योग केंद्रातील मनुष्यबळाचा अभाव रेशीम उत्पादकांच्या पथ्थ्यावर पडत असून, जिल्हा प्रशासनानेच आता या कामी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

विठ्ठल भिसे।लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी  (परभणी) : पारंपरिक शेतीत उत्पन्न मिळत नसल्याने जिल्ह्यात रेशीम योजनेअंतर्गत तुती लागवडीला चालना मिळत असतानाच शेतकऱ्यांना प्रशासकीय उदासिनतेचा फटका सहन करावा लागत आहे. प्रशासनातील दफ्तर दिरंगाईमुळे नोंदणीनंतरही चारशे लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश मिळाले नाहीत. जिल्हा रेशीम उद्योग केंद्रातील मनुष्यबळाचा अभाव रेशीम उत्पादकांच्या पथ्थ्यावर पडत असून, जिल्हा प्रशासनानेच आता या कामी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.रेशीम उत्पादनासाठी मराठवाड्यात अनुकूल वातावरण असून, दर्जेदार कोष निर्मिती होत असल्याने जिल्ह्यातील शेतकºयांचा कल रेशीम कोष उत्पादनाकडे वाढला आहे. तसेच सततचा दुष्काळ, अनियमित पाऊस आणि रोगांचा प्रादुर्भाव यामुळे पारंपरिक शेतीत शाश्वती राहिली नसल्याने रेशीम व्यवसायाचा विस्तार जिल्ह्यात वाढत आहे.केंद्र पुरस्कृत सीडीपी योजना बंद २०१५-१६ पासून झाली. त्यामुळे २०१७-१८ या वर्षापासून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत तुती लागवड आणि कीटक संगोपणगृहासाठी अनुदान योजना सुरू करण्यात आली.पहिल्याच वर्षी जिल्ह्याला २०० एकर तुती लागवडीचे उद्दिष्ट दिले होते. शेतकºयांनी ३०० एकरवर तुती लागवड केली. २०१८-१९ या वषार्साठी शासनाने महारेशीम अभियान राबविले होते. जिल्हाभरात ७६८ एकर तुती लागवडीसाठी नोंदणी झाली. मात्र नोंदणीपैकी केवळ ३५० एकर तुती लागवडीसाठी कार्यारंभ आदेश मिळून कामे सुरू झाली आहेत.जिल्ह्यात रेशीमचा विस्तार झपाट्याने वाढत असतानाच शेतकºयांसमोर समस्याचा डोंगरही वाढत आहे. योजनेची अंमलबजावणी करणाºया जिल्हा रेशीम कार्यालयात मनुष्यबळाचा अभाव असल्याने योजना राबविण्यास हे कार्यलय असमर्थ ठरू लागले आहे. तांत्रिक मान्यता देण्यासाठी नेमलेल्या तांत्रिक सेवा पुरवठादारांवर अतिरिक्त जबाबदारी दिल्याने तेही या योजनेकडे कानाडोळा करीत आहेत. गंभीर बाब म्हणजे, जिल्हा रेशीम कार्यालयात एम.बी. रेकॉर्डच्या मोजमाप पुस्तिकाही उपलब्ध नाहीत. त्यामुळे ज्यांनी रेशीम शेतीची कामे सुरू केली त्यांनाही केवळ प्रशासकीय उदासिनतेमुळे वेळेत अनुदान मिळत नाही. शेतकºयांना आर्थिक प्रगतीच्या वाटेवर नेण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या या योजनेचा जिल्ह्यात पुरता बोजवारा उडाला आहे. शेतकरी पुढाकार घेत असताना प्रशासनातील दफ्तरदिरंगाईमुळे उदासिनतेची कीड रेशीम शेतीही पोखरत असल्याचे दिसत आहे. रेशीम उद्योग योजना राबवित असताना त्यात येणाºया प्रशासकीय अडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकाºयांनीच पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.जिल्हा रेशीम अधिकाºयांसह अनेक पदे रिक्तपरभणी येथील कृषी विद्यापीठातील जिल्हा रेशीम कार्यालयातून ९ तालुक्याचा कारभार चालतो. या कार्यालयातील जिल्हा रेशीम अधिकारी हे प्रमुख पद रिक्त आहे. ९ तालुक्यांसाठी २ क्षेत्र सहायक आणि २ वरिष्ठ तांत्रिक अधिकारी कार्यरत आहेत.४तांत्रिक सेवा पुरवठादाराची (टीएसपी) ५ पदे असली तरी त्यांच्याकडे पंचायत समितीचा मूळ पदभार असून, रेशीमचा अतिरिक्त पदभार सोपविल्याने कामे वेळेत पूर्ण होत नाहीत. त्यामुळे कामांचे हजेरीपत्रक तसेच मूल्यांकन वेळेवर होत नाही.योजनेचे स्वरूपमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत रेशीम उद्योग विकास योजना राबवण्यात येते. तुती लागवड आणि कीटक संगोपणगृह बांधकामासाठी अल्पभूधारक शेतकºयांना त्यांच्याच शेतात एक एकर तुती लागवडीसाठी २ लाख ९५ हजार रुपये मनरेगातून देण्याची तरतूद आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी